शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लोकसभेला सॅक्रिफाइस नकोच, आता उमेदवार काँग्रेसचाच हवा; विधानसभा आढावा बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 13:32 IST

अचलपूरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक

अमरावती :अमरावती जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना गेल्या अनेक वर्षांपासून येथे काँग्रेसला लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही, परिणामत: बळजबरीने आमच्यावर उमेदवार लादला जातो आणि त्याला निवडून आणावे लागते. परंतु यामुळे पक्षाचे खच्चीकरण होत आहे. जिल्हा कॉंग्रेसचा हा बालेकिल्ला कायम ठेवायचा असेल तर आता काँग्रेसचाच खासदार हवा, असा एकमुखी सूर पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत उमटला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष निरीक्षक आ. रणजित कांबळे व समन्वयक किशोर गजबिये यांनी रविवारी अचलपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या बैठकीला माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत अचलपूर मतदारसंघाची ही बैठक पार पडली.

अमरावतीमध्ये ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बहुतांश ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे लोकसभेकरिता काँग्रेसला अनुकूल वातावरण असतानादेखील आतापर्यंत अमरावती लोकसभेमध्ये इतर पक्षांचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे आता लोकसभेची उमेदवारी पंजा या चिन्हावर लढवावी, अशा भावना कार्यकर्त्यांनी निरीक्षकांशी संवाद साधताना व्यक्त केल्या. कोणत्याही पक्षाच्या युतीमध्ये अमरावती लोकसभेची उमेदवारी ही काँग्रेसलाच गेली पाहिजे, असा आग्रही कार्यकर्त्यांनी रेटून धरला. आता सॅक्रिफाइस आम्ही करणार नाही. इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला आम्ही स्वीकारणार नाही, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांची दिसून आली.

या बैठकीला राजेंद्र गोरले, दयाराम काळे, गिरीश कराळे, बाबूराव गावंडे, श्रीधर काळे, डॉ.रवींद्र वाघमारे, शिवाजीराव बंड, किशोर देशमुख, श्रीकांत झोडपे, नामदेव तनपुरे, महेरुल्ला खान, राजा टवलारकर, देवेंद्र पेटकर, साजिद फुलारी, सहदेव बेलकर, राहुल येवले, पंकज मोरे, अजीज खान, सचिदानंद बेलसरे आदींची उपस्थिती होती.

आतापर्यंत दुसऱ्या पक्षाचे उमेदवार देखील आम्ही पचविले आहे. परंतु आता खूप झाले. काँग्रेस पक्ष मजबूत करण्याकरिता आणि तो जिल्ह्यात कायम ठेवण्याकरिता आता आम्हाला स्थानिक आणि काँग्रेसचा सक्षम कार्यकर्ताच उमेदवार हवा.

- माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर

जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना काँग्रेसची पकड मजबूत आहे. काँग्रेसचे खासदारकीसाठी वातावरण अनुकूल आहे, त्यामुळे यावेळी पक्षश्रेष्ठीने विचार करून काँग्रेसचा उमेदवार लोकसभेसाठी द्यावा, तो निवडून आणण्याची सर्वस्वी जबाबदारी आमची आहे आणि निवडून आणू.

- बबलू देशमुख जिल्हाध्यक्ष

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाYashomati Thakurयशोमती ठाकूरAmravatiअमरावती