शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेला सॅक्रिफाइस नकोच, आता उमेदवार काँग्रेसचाच हवा; विधानसभा आढावा बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 13:32 IST

अचलपूरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक

अमरावती :अमरावती जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना गेल्या अनेक वर्षांपासून येथे काँग्रेसला लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही, परिणामत: बळजबरीने आमच्यावर उमेदवार लादला जातो आणि त्याला निवडून आणावे लागते. परंतु यामुळे पक्षाचे खच्चीकरण होत आहे. जिल्हा कॉंग्रेसचा हा बालेकिल्ला कायम ठेवायचा असेल तर आता काँग्रेसचाच खासदार हवा, असा एकमुखी सूर पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत उमटला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष निरीक्षक आ. रणजित कांबळे व समन्वयक किशोर गजबिये यांनी रविवारी अचलपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या बैठकीला माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत अचलपूर मतदारसंघाची ही बैठक पार पडली.

अमरावतीमध्ये ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बहुतांश ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे लोकसभेकरिता काँग्रेसला अनुकूल वातावरण असतानादेखील आतापर्यंत अमरावती लोकसभेमध्ये इतर पक्षांचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे आता लोकसभेची उमेदवारी पंजा या चिन्हावर लढवावी, अशा भावना कार्यकर्त्यांनी निरीक्षकांशी संवाद साधताना व्यक्त केल्या. कोणत्याही पक्षाच्या युतीमध्ये अमरावती लोकसभेची उमेदवारी ही काँग्रेसलाच गेली पाहिजे, असा आग्रही कार्यकर्त्यांनी रेटून धरला. आता सॅक्रिफाइस आम्ही करणार नाही. इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला आम्ही स्वीकारणार नाही, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांची दिसून आली.

या बैठकीला राजेंद्र गोरले, दयाराम काळे, गिरीश कराळे, बाबूराव गावंडे, श्रीधर काळे, डॉ.रवींद्र वाघमारे, शिवाजीराव बंड, किशोर देशमुख, श्रीकांत झोडपे, नामदेव तनपुरे, महेरुल्ला खान, राजा टवलारकर, देवेंद्र पेटकर, साजिद फुलारी, सहदेव बेलकर, राहुल येवले, पंकज मोरे, अजीज खान, सचिदानंद बेलसरे आदींची उपस्थिती होती.

आतापर्यंत दुसऱ्या पक्षाचे उमेदवार देखील आम्ही पचविले आहे. परंतु आता खूप झाले. काँग्रेस पक्ष मजबूत करण्याकरिता आणि तो जिल्ह्यात कायम ठेवण्याकरिता आता आम्हाला स्थानिक आणि काँग्रेसचा सक्षम कार्यकर्ताच उमेदवार हवा.

- माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर

जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना काँग्रेसची पकड मजबूत आहे. काँग्रेसचे खासदारकीसाठी वातावरण अनुकूल आहे, त्यामुळे यावेळी पक्षश्रेष्ठीने विचार करून काँग्रेसचा उमेदवार लोकसभेसाठी द्यावा, तो निवडून आणण्याची सर्वस्वी जबाबदारी आमची आहे आणि निवडून आणू.

- बबलू देशमुख जिल्हाध्यक्ष

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाYashomati Thakurयशोमती ठाकूरAmravatiअमरावती