शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

लोकसभेला सॅक्रिफाइस नकोच, आता उमेदवार काँग्रेसचाच हवा; विधानसभा आढावा बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 13:32 IST

अचलपूरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक

अमरावती :अमरावती जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना गेल्या अनेक वर्षांपासून येथे काँग्रेसला लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही, परिणामत: बळजबरीने आमच्यावर उमेदवार लादला जातो आणि त्याला निवडून आणावे लागते. परंतु यामुळे पक्षाचे खच्चीकरण होत आहे. जिल्हा कॉंग्रेसचा हा बालेकिल्ला कायम ठेवायचा असेल तर आता काँग्रेसचाच खासदार हवा, असा एकमुखी सूर पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत उमटला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष निरीक्षक आ. रणजित कांबळे व समन्वयक किशोर गजबिये यांनी रविवारी अचलपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या बैठकीला माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत अचलपूर मतदारसंघाची ही बैठक पार पडली.

अमरावतीमध्ये ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बहुतांश ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे लोकसभेकरिता काँग्रेसला अनुकूल वातावरण असतानादेखील आतापर्यंत अमरावती लोकसभेमध्ये इतर पक्षांचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे आता लोकसभेची उमेदवारी पंजा या चिन्हावर लढवावी, अशा भावना कार्यकर्त्यांनी निरीक्षकांशी संवाद साधताना व्यक्त केल्या. कोणत्याही पक्षाच्या युतीमध्ये अमरावती लोकसभेची उमेदवारी ही काँग्रेसलाच गेली पाहिजे, असा आग्रही कार्यकर्त्यांनी रेटून धरला. आता सॅक्रिफाइस आम्ही करणार नाही. इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला आम्ही स्वीकारणार नाही, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांची दिसून आली.

या बैठकीला राजेंद्र गोरले, दयाराम काळे, गिरीश कराळे, बाबूराव गावंडे, श्रीधर काळे, डॉ.रवींद्र वाघमारे, शिवाजीराव बंड, किशोर देशमुख, श्रीकांत झोडपे, नामदेव तनपुरे, महेरुल्ला खान, राजा टवलारकर, देवेंद्र पेटकर, साजिद फुलारी, सहदेव बेलकर, राहुल येवले, पंकज मोरे, अजीज खान, सचिदानंद बेलसरे आदींची उपस्थिती होती.

आतापर्यंत दुसऱ्या पक्षाचे उमेदवार देखील आम्ही पचविले आहे. परंतु आता खूप झाले. काँग्रेस पक्ष मजबूत करण्याकरिता आणि तो जिल्ह्यात कायम ठेवण्याकरिता आता आम्हाला स्थानिक आणि काँग्रेसचा सक्षम कार्यकर्ताच उमेदवार हवा.

- माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर

जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना काँग्रेसची पकड मजबूत आहे. काँग्रेसचे खासदारकीसाठी वातावरण अनुकूल आहे, त्यामुळे यावेळी पक्षश्रेष्ठीने विचार करून काँग्रेसचा उमेदवार लोकसभेसाठी द्यावा, तो निवडून आणण्याची सर्वस्वी जबाबदारी आमची आहे आणि निवडून आणू.

- बबलू देशमुख जिल्हाध्यक्ष

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाYashomati Thakurयशोमती ठाकूरAmravatiअमरावती