शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून कर्ज पुनर्गठनाचा निधी अप्राप्त

By admin | Updated: June 24, 2016 00:32 IST

सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना पुनर्गठनाचे शासनाने आमिष दिले. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेला मागणीनंतरही पुनर्गठनाचा निधी मिळाला नाही.

बबलू देशमुखांचा आरोप : शेतकरी मात्र कर्जाच्या प्रतीक्षेतअमरावती : सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना पुनर्गठनाचे शासनाने आमिष दिले. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेला मागणीनंतरही पुनर्गठनाचा निधी मिळाला नाही. खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडे बी-बियाण्याकरिता पैसा नाही. अशा परिस्थितीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून शासन शेतकऱ्यांचा बळी घेत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले आहे. मध्यवर्ती जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या पुनर्गठनाकरिता १५३ कोटींची मागणी केली आहे. याकरिता सतत पाठपुरावा करीत आहे. परंतु महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून अद्याप निधी मिळाला नाही. अखेर शासनाला शेतकऱ्यांचे नुकसान करून काय साधायचे आहे, असा प्रश्न जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी उपस्थित केला आहे. बँकेच्या सद्यस्थितीत एकूण ठेवी रु. १३६७ कोटी आहे व चालू हंगामात बँकेने शेतकऱ्यांना ३१७ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज ४६७ कोटी रुपये व इतर कर्ज २५० कोटी असे एकूण १०३४ कोटी कर्ज वाटप केले आहे. नाबार्डचे सूचनेनुसार एकूण ठेवीच्या ३३ टक्के राखीव निधी बँकेला वेगळा ठेवावा लागतो. परंतु या निधीतून सुद्धा काही प्रमाणात कर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे यापूर्वी वाटप केलेल्या पीककर्जाच्या पुनर्गठनासाठी तसेच नवीन सभासदांना कर्जवाटप करण्यासाठी बँकेजवळ पुरेसा निधी उपलब्ध नाही व सद्यस्थतीत वसुली करणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने बँकेला जर ४ टक्के दराने कर्ज उपलब्ध केल्यास बँक शेतकऱ्यांना ६ टक्के दराने कर्जवाटप करू शकते. त्यामुळे जिल्हा बँकेवर बोझा पडणार नाही. शासनाने पुरेसा निधी बँकेला उपलब्ध करून दिल्यास जिल्हा बँकेचा कोणताही सभासद अगर नवीन सभासद पीक कर्जापासून वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी उभ्या राहणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने २० हजार २३७ शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठन करण्याच्या उद्देशाने शासनाकडे १५३ कोटींची मागणी केली आहे. याकरिता सतत पाठपुरावादेखील केला. परंतु शासनाकडून सदर निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेला उपलब्ध करून दिला नाही. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करू, अशी घोषणा दोन महिन्यांपूर्वी शासनाने केली होती. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेला अद्याप निधी प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांना कर्जवाटप करता आले नाही, हे वास्तव आहे. आजपर्यंत ३८ हजार २२४ शेतकऱ्यांना ३१७ कोटींचे वाटप बँकेकडून करण्यात आले आहे. खरे तर पुनर्गठनामुळे बँकेला ४ टक्केचा तोटा सहन करावा लागतो. या तोट्याची परवा न करता बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आणि शासनाकडे कर्जापोटी १५३ कोटींची मागणी केली आहे. बँकेला कर्ज मिळाले नाही तर शेतकऱ्यांना देणार कोठून, अशी खंत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)ही शेतकऱ्यांची फसवणूकभाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शासनाच्या या धोरणामुळे शेतकरी आत्महत्येच्या दाढेत उभा आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी हाच एकमेव पर्याय असताना याला बगल देत शासनाने पुनर्गठनाचे आमिष दाखविले. परंतु तेदेखील शेतकऱ्यांना कर्जमाफी अद्याप केलेली नाही, ही शेतकऱ्यांची चक्क फसवणूक आहे. शेतकऱ्यांचा शासनाला खरच कळकळा असता तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली असती, असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केले.