शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

''राष्ट्रसंतांचे विचार जनसामान्यांपर्यंत साहित्यिकांनी नेले पाहिजे''

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 18:00 IST

साहित्याचा अभ्यास, संशोधन किंवा चिंतन व्हावे, याकरिता साहित्य संमेलनाची आवश्यकता असते.

गुरुकुंज मोझरी : साहित्याचा अभ्यास, संशोधन किंवा चिंतन व्हावे, याकरिता साहित्य संमेलनाची आवश्यकता असते. राष्ट्रसंतांच्या साहित्याचा जेवढा अभ्यास करावा तेवढा तो अभ्यासकाला अंतर्मुख करावयास लावतो. शब्दांचे चिंतन करणे सोपे असते; परंतु साहित्याचे चिंतन करणे कठीण आहे. आजच्या काळातही राष्ट्रसंतांचे विचार प्रेरणादायी असल्यामुळे साहित्य संमेलनातून साहित्यिकांनी राष्ट्रसंतांचे विचार जनसामान्यांपर्यंत नेले पाहिजे, असे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी केले.गुरुकुंज आश्रम येथे आयोजित सातव्या विदर्भस्तरीय वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटनावेळी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देऊळगाव राजा येथील व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, सुभाष लोहे, कार्यकारिणी सदस्य भानुदास कराळे, अरुण मेश्राम, राजेंद्र नाईकवाडे उपस्थित होते. राष्ट्रसंतांच्या संपूर्ण साहित्यात ग्रामोद्धाराचा मार्ग दाखविणारी ग्रामगीता ग्रंथ समाजाला प्रकाश देणारा दीपस्तंभ आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्यात ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य व राष्ट्रभक्ती या सर्वांचा मेळ दिसून येतो. संसार व परमार्थ यांची सांगड घालून समाजाला मानवतेची सेवा करण्याचा सेवाधर्म राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिल्याचे यावेळी जयपूरकर म्हणाले. माणसाला मानव करण्याचे काम राष्ट्रसंतांनी केले असून त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन साहित्यिकांनी माणूस घडविण्याचे काम केले पाहिजे. आध्यात्मिक उन्नती हेच साहित्याचे प्रयोजन आहे.सर्वाधिकारी प्रकाश वाघ यांनी मार्गदर्शन केले. सुभाष लोहे यांनी आपल्या प्रास्ताविकातून आतापर्यंत झालेल्या साहित्य संमेलनाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे संचालन दिलीप कोहळे यांनी केले. यावेळी तुकाराम पाटील बोराडेकर लिखित 'तुकड्या म्हणे लागला रंग भजनाचा' या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. जैविक व सेंद्रीय शेती करणारे शेतकरी सुरेश हरडे (शेंदूरजना मा.), महेंद्र भुयार (कापूसतळणी), बाबाराव डहाके (आष्टी श.) या शेतक-यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साहित्य संमेलनाची सुरुवात गुरुदेव हमारा प्यारा या संकल्पगीताने करण्यात आली. तसेच कार्यक्रमापूर्वी स्वरगुरूकुंजाचे यातील कलाकारांनी राष्ट्रसंतांनी खंजेरी भजने सादर केली.साहित्य संमेलनापूर्वी राष्ट्रसंतांच्या समाधी स्थळावरून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या संमेलनात प्राचार्य अरविंद देशमुख, श्रीराम महाविद्यालय कु-हा यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आला. यामध्ये 'सब का हो विश्वास प्रभूपर' या विषयावर डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल, यवतमाळ, ग्रामगीतेतील मातृशक्ती आणि राष्ट्रनिर्माण या विषयावर शलाखा जोशी नागपूर, राष्ट्रसंतांच्या काव्यातील देशभक्ती या विषयावर कोमल ठाकरे कोराडी यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर रायपूरकर नागपूर यांनी केले. समारोपीय कार्यक्रमाचे मार्गदर्शन ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी केले. अध्यक्षस्थानी हरिभाऊ वेरूळकर होते. या सूत्रसंचालन अरुण मेश्राम यांनी केले. संमेलनासाठी अध्यात्म विभागाचे प्रमुख राजाराम बोथे, मानव सेवा छात्रालयाचे अधीक्षक अमोल बांबल, अरविंद राठोड, भारतीय विचार मंचाचे नीलेश जोशी, जीवन भोंगाडे, सुदर्शन डेहणकर, रूपेश राऊत यांनी सहकार्य केले.