शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

महाराष्ट्रात दारूची दुकाने वाढताहेत, शाळा कमी होताहेत; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाणा

By उज्वल भालेकर | Updated: October 3, 2023 14:53 IST

राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करण्यासाठी सुप्रिया सुळे या अमरावतीमध्ये आल्या होत्या.

अमरावती : महाराष्ट्रात दारूची दुकाने वाढताहेत आणि शाळा कमी होताहेत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हा महाराष्ट्र डॉ. पंजाबराव देशमुख यांचा महाराष्ट्र असल्याचा विसर भाजपला पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांना जर इडी, पक्षफोडीच्या राजकारणातून वेळ मिळाला असेल तर त्यांनी गरीब मायबाप जनतेचे प्रश्न सोडवा, जनतेला आरोग्य सेवा मिळते की नाही याकडे लक्ष द्यावे, असा घणाघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी केला.

अमरावतीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करण्यासाठी सुप्रिया सुळे या अमरावतीमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, नांदेड आणि संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे आरोग्य खात्याच्या मंत्र्यांचा तातडीने राजीनामा सरकारने घेतला पाहिजे. राज्यात बेरोजगारी, महागाई, दुष्काळ अशा अनेक प्रश्न आहेत. परंतु सरकाराचे याकडे दुर्लक्ष आहे. सरकारच्या कंत्राटी नोकरभरतीला राष्ट्रवादी कॉँग्रेसचा पूर्णपणे विरोध आहे. जर कत्राटवरच जर राज्य चालवायचे असेल तर मग सरकार कशासाठी आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राज्यात सध्या दारूची दुकाने वाढत असून शाळा कमी होत असून ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे आयईस सरकार म्हणजेच इन्कमटॅक्स, इडी, आणि सीबीआयचा दुरुपयोग करुन आलेले सरकार आहे. या ट्रिपलइंजिन सरकारमध्ये एकही जनतेच्या हिताचे निर्णय झालेले नाहीत. त्यामुळे जर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जर इडी, सीबीआय, पक्षफोडीतून वेळ मिळाला असेल तर त्यांनी मायबाप जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केला. यावेळी पत्रकार परिषदेला माजीमंत्री अनिल देशमुख, हर्षवर्धन देशमुख सुनिल वऱ्हाडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष हेमंत देशमुख उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेState Governmentराज्य सरकारAmravatiअमरावती