शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

महाराष्ट्रात दारूची दुकाने वाढताहेत, शाळा कमी होताहेत; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाणा

By उज्वल भालेकर | Updated: October 3, 2023 14:53 IST

राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करण्यासाठी सुप्रिया सुळे या अमरावतीमध्ये आल्या होत्या.

अमरावती : महाराष्ट्रात दारूची दुकाने वाढताहेत आणि शाळा कमी होताहेत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हा महाराष्ट्र डॉ. पंजाबराव देशमुख यांचा महाराष्ट्र असल्याचा विसर भाजपला पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांना जर इडी, पक्षफोडीच्या राजकारणातून वेळ मिळाला असेल तर त्यांनी गरीब मायबाप जनतेचे प्रश्न सोडवा, जनतेला आरोग्य सेवा मिळते की नाही याकडे लक्ष द्यावे, असा घणाघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी केला.

अमरावतीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करण्यासाठी सुप्रिया सुळे या अमरावतीमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, नांदेड आणि संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे आरोग्य खात्याच्या मंत्र्यांचा तातडीने राजीनामा सरकारने घेतला पाहिजे. राज्यात बेरोजगारी, महागाई, दुष्काळ अशा अनेक प्रश्न आहेत. परंतु सरकाराचे याकडे दुर्लक्ष आहे. सरकारच्या कंत्राटी नोकरभरतीला राष्ट्रवादी कॉँग्रेसचा पूर्णपणे विरोध आहे. जर कत्राटवरच जर राज्य चालवायचे असेल तर मग सरकार कशासाठी आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राज्यात सध्या दारूची दुकाने वाढत असून शाळा कमी होत असून ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे आयईस सरकार म्हणजेच इन्कमटॅक्स, इडी, आणि सीबीआयचा दुरुपयोग करुन आलेले सरकार आहे. या ट्रिपलइंजिन सरकारमध्ये एकही जनतेच्या हिताचे निर्णय झालेले नाहीत. त्यामुळे जर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जर इडी, सीबीआय, पक्षफोडीतून वेळ मिळाला असेल तर त्यांनी मायबाप जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केला. यावेळी पत्रकार परिषदेला माजीमंत्री अनिल देशमुख, हर्षवर्धन देशमुख सुनिल वऱ्हाडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष हेमंत देशमुख उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेState Governmentराज्य सरकारAmravatiअमरावती