शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

महिनाभरात उष्माघाताच्या ४६ रुग्णांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:27 IST

मे महिन्यात तीव्र उन्हाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील ४६ रुग्णांना शासकीय रुग्णालयांत जीवनदान मिळाले. १०२ जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला.

ठळक मुद्देफटका तापमानाचा

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मे महिन्यात तीव्र उन्हाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील ४६ रुग्णांना शासकीय रुग्णालयांत जीवनदान मिळाले. १०२ जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला.यंदा कोसळलेल्या अल्प पावसामुळे सिंचनाअभावी जमिनीतील आर्द्रता कमी झाली. मार्च एंडिंगपासूनच उन्हाचे चटके लागायला सुरुवात झाली. हवामान खात्याने एप्रिल आणि मेमध्येही अलर्ट जारी केला. लोकसभा निवडणुकीच्या उत्साहामुळे एप्रिलमध्ये उन्हाचे चटके तेवढे जाणवले नाही. मे महिन्याची सुरुवातच ‘हीट वेव्ह’ने झाला. अवघा महिनाभर ४५ ते ४६.६ अंशापर्यंत तापमान राहिले. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या काही नागरिकांना उष्माघाताचा फटका बसला. असे जिल्ह्यातील विविध भागांतून ४६ रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना योग्य औषधोपचाराने बरे करून घरी पाठविण्यात आले. मात्र, काही जण अत्यवस्थेत असताना रुग्णालयात नेण्यात आल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. असे धामणगाव तालुक्यातील पाच रुग्ण, तिवसा तालुक्यातील दोन, चांदूर बाजार तालुक्यातील एक, वरूड तालुक्यातील एक व अमरावती शहरात तीन अशा १२ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालाअंती नेमके कशामुळे मृत्यू झाला, हे स्पष्ट होईल.जिल्ह्यात महिनाभरात १०२ शवविच्छेदनयंदा उच्चांकी तापमानाचा फटका सहन न करू शकल्याने तसेच अपघातात जिल्ह्यातील १०२ जणांचा मृत्यू १ ते ३१ मे दरम्यान झाला. त्यांचा शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात करण्यात आले. मात्र, अहवाल अद्याप अप्राप्त असल्यामुळे यातील किती जण उष्माघाताचे बळी ठरले, हे निश्चत सांगणे अशक्य आहे. उष्णतेची लाट आठवडाभर असल्याने काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन आहे.उष्माघाताच्या ४६ रुग्णांवर शासकीय रुग्णालयांत यशस्वी उपचार झाला. याशिवाय काही जणांचा बाहेरच मृत्यू झाला. अशा रुग्णांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल.- श्यामसुंदर निकमजिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती