शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महिनाभरात उष्माघाताच्या ४६ रुग्णांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:27 IST

मे महिन्यात तीव्र उन्हाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील ४६ रुग्णांना शासकीय रुग्णालयांत जीवनदान मिळाले. १०२ जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला.

ठळक मुद्देफटका तापमानाचा

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मे महिन्यात तीव्र उन्हाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील ४६ रुग्णांना शासकीय रुग्णालयांत जीवनदान मिळाले. १०२ जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला.यंदा कोसळलेल्या अल्प पावसामुळे सिंचनाअभावी जमिनीतील आर्द्रता कमी झाली. मार्च एंडिंगपासूनच उन्हाचे चटके लागायला सुरुवात झाली. हवामान खात्याने एप्रिल आणि मेमध्येही अलर्ट जारी केला. लोकसभा निवडणुकीच्या उत्साहामुळे एप्रिलमध्ये उन्हाचे चटके तेवढे जाणवले नाही. मे महिन्याची सुरुवातच ‘हीट वेव्ह’ने झाला. अवघा महिनाभर ४५ ते ४६.६ अंशापर्यंत तापमान राहिले. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या काही नागरिकांना उष्माघाताचा फटका बसला. असे जिल्ह्यातील विविध भागांतून ४६ रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना योग्य औषधोपचाराने बरे करून घरी पाठविण्यात आले. मात्र, काही जण अत्यवस्थेत असताना रुग्णालयात नेण्यात आल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. असे धामणगाव तालुक्यातील पाच रुग्ण, तिवसा तालुक्यातील दोन, चांदूर बाजार तालुक्यातील एक, वरूड तालुक्यातील एक व अमरावती शहरात तीन अशा १२ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालाअंती नेमके कशामुळे मृत्यू झाला, हे स्पष्ट होईल.जिल्ह्यात महिनाभरात १०२ शवविच्छेदनयंदा उच्चांकी तापमानाचा फटका सहन न करू शकल्याने तसेच अपघातात जिल्ह्यातील १०२ जणांचा मृत्यू १ ते ३१ मे दरम्यान झाला. त्यांचा शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात करण्यात आले. मात्र, अहवाल अद्याप अप्राप्त असल्यामुळे यातील किती जण उष्माघाताचे बळी ठरले, हे निश्चत सांगणे अशक्य आहे. उष्णतेची लाट आठवडाभर असल्याने काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन आहे.उष्माघाताच्या ४६ रुग्णांवर शासकीय रुग्णालयांत यशस्वी उपचार झाला. याशिवाय काही जणांचा बाहेरच मृत्यू झाला. अशा रुग्णांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल.- श्यामसुंदर निकमजिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती