शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

महिनाभरात उष्माघाताच्या ४६ रुग्णांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:27 IST

मे महिन्यात तीव्र उन्हाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील ४६ रुग्णांना शासकीय रुग्णालयांत जीवनदान मिळाले. १०२ जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला.

ठळक मुद्देफटका तापमानाचा

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मे महिन्यात तीव्र उन्हाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील ४६ रुग्णांना शासकीय रुग्णालयांत जीवनदान मिळाले. १०२ जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला.यंदा कोसळलेल्या अल्प पावसामुळे सिंचनाअभावी जमिनीतील आर्द्रता कमी झाली. मार्च एंडिंगपासूनच उन्हाचे चटके लागायला सुरुवात झाली. हवामान खात्याने एप्रिल आणि मेमध्येही अलर्ट जारी केला. लोकसभा निवडणुकीच्या उत्साहामुळे एप्रिलमध्ये उन्हाचे चटके तेवढे जाणवले नाही. मे महिन्याची सुरुवातच ‘हीट वेव्ह’ने झाला. अवघा महिनाभर ४५ ते ४६.६ अंशापर्यंत तापमान राहिले. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या काही नागरिकांना उष्माघाताचा फटका बसला. असे जिल्ह्यातील विविध भागांतून ४६ रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना योग्य औषधोपचाराने बरे करून घरी पाठविण्यात आले. मात्र, काही जण अत्यवस्थेत असताना रुग्णालयात नेण्यात आल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. असे धामणगाव तालुक्यातील पाच रुग्ण, तिवसा तालुक्यातील दोन, चांदूर बाजार तालुक्यातील एक, वरूड तालुक्यातील एक व अमरावती शहरात तीन अशा १२ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालाअंती नेमके कशामुळे मृत्यू झाला, हे स्पष्ट होईल.जिल्ह्यात महिनाभरात १०२ शवविच्छेदनयंदा उच्चांकी तापमानाचा फटका सहन न करू शकल्याने तसेच अपघातात जिल्ह्यातील १०२ जणांचा मृत्यू १ ते ३१ मे दरम्यान झाला. त्यांचा शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात करण्यात आले. मात्र, अहवाल अद्याप अप्राप्त असल्यामुळे यातील किती जण उष्माघाताचे बळी ठरले, हे निश्चत सांगणे अशक्य आहे. उष्णतेची लाट आठवडाभर असल्याने काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन आहे.उष्माघाताच्या ४६ रुग्णांवर शासकीय रुग्णालयांत यशस्वी उपचार झाला. याशिवाय काही जणांचा बाहेरच मृत्यू झाला. अशा रुग्णांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल.- श्यामसुंदर निकमजिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती