शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

जात वैधता प्रमाणपत्राऐवजी आता हमीपत्र ग्राह्य; ४,४१८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 16:10 IST

राज्यात सध्या सुरू असलेल्या ३१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४,१०१ ग्रापंचा पोटनिवडणुकांमध्ये राखीव प्रभागांतील उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ३० जून २०१९ च्या निवडणुकीपर्यंत जातवैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र ग्राह्य धरण्याचा ठराव घेण्यात आला.

अमरावती : राज्यात सध्या सुरू असलेल्या ३१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४,१०१ ग्राम पंचायत पोटनिवडणुकांमध्ये राखीव प्रभागांतील उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ३० जून २०१९ च्या निवडणुकीपर्यंत जातवैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र ग्राह्य धरण्याचा ठराव घेण्यात आला. त्यामुळे  आयोगाद्वारा बुधवारपासून हमीपत्र स्वीकारण्याचे आदेश सर्व जिल्हाधिका-यांना दिले. यामुळे राखीव प्रभागात निवडणूक लढविणा-या उमेदवारांना दिलासा मिळाला.राज्यात सध्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये १० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज दाखल करताना राखीव प्रभागांतील उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत हमीपत्र जोडणे सक्तीचे केले होते. ग्रामविकास विभागाकडून ३१ डिसेंबर २०१७ नंतर मुदतवाढ न दिल्यामुळे हमीपत्राऐवजी जातवैधता प्रमाणपत्र घेण्यात यावे, असे आयोगाने स्पष्ट केले.निवडणूक कार्यक्रमानुसार ५ फेब्रुुवारीपासून उमेदवारी अर्ज आॅनलाईन प्रक्रियेला सुरूवात झाली. ग्रामविकास विभागाद्वारा या निर्णयाविषयी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ द्यावी, याविषयीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येणार असल्याचे आयोगाने मंगळवारी सर्व जिल्हाधिका-यांना स्पष्ट केले. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जाती, अनु. जमाती. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जागा आरक्षित असल्याने या उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास ३० जून २०१९ पर्यंत होणा-या निवडणुकांसाठी मुदतवाढ देण्यात आली व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आयोगाने बुधवारी सर्व जिल्हाधिका-यांना पत्र जारी करून राखीव प्रभागातील उमेदवारांच्या अर्जासोबत हमीपत्र स्वीकारता येईल, असे स्पष्ट केले. उमेदवारांना मात्र विजयी झाल्याच्या सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. अन्यथा निवड अनर्ह ठरविण्यात येणार आहे.

आॅनलाईन प्रक्रियेने उमेदवार त्रस्तउमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली. यावेळी आयोगाने निवडणुकीच्या सर्व टप्प्याची प्रक्रिया आॅनलाईन केलेली आहे. उमेदवारी अर्जासह शपथपत्र सादरीकरणाचे एक दिवसपूर्व हा निर्णय घेण्यात आल्यामुळे इच्छुक उमेदवारांची तारांबळ उडाली, दरम्यान आयोगाचे संकेतस्थळ अनेकदा बंद राहत असल्याने व दुर्गम भागात इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाल्याचे बहुतांश जिल्ह्यात तिस-या दिवशीही उमेदवारी अर्ज निरंक आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAmravatiअमरावती