शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अमरावती शहरात ‘लाख को पाच’, वाहतूक कोंडी आणि जीवघेणे प्रदूषण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 17:38 IST

लोकांनी आपला पाठिंबा बस बूथवर आवडीच्या ब्रीदवाक्यांनी दर्शविला तसेच बस प्रवासादरम्यान अनुभवही सांगितले.

ठळक मुद्देपथनाट्याद्वारे वाहतूक व्यवस्थेचे धडे

अमरावती : कोरोना काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली. त्यानंतर तर खासगी वाहनांचे पेवच फुटले आहे. त्यामुळे वाहतूककोंडी आणि जीवघेणे प्रदूषण यांचा विळखा शहरांना बसत आहे. त्यावर उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकटीकरणाचे धडे अमरावतीकरांना नागपूर स्थित परिसर या संस्थेने दिले. त्यासाठी बुधवारी शहरात बसयात्रा काढण्यात आली होती. नागरिकांकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हवी असल्याबाबत मागणीपत्र भरून घेण्यात आले.

जून २०२० मध्ये परिसर संस्थेने राज्यातील शहरांमध्ये बससेवा सक्षम करण्याच्या हेतूने ‘लाख को ५०’ ही राज्यव्यापी मोहीम सस्टेनेबल अर्बन मोबिलिटी नेटवर्क (सम नेट) अंतर्गत सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत बुधवारी संस्थेच्यावतीने शहरात इर्विन चौक, माल टेकडी, राजकमल चौक, दसरा मैदान या मार्गाने काढण्यात आली. याअंतर्गत इर्विन चौक व दसरा मैदान येथे पथनाट्य करण्यात आले. या पथनाट्याच्या माध्यमातून लोकांच्या सिटी बसविषयीच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.

लोकांनी आपला पाठिंबा बस बूथवर आवडीच्या ब्रीदवाक्यांनी दर्शविला तसेच बस प्रवासादरम्यान अनुभवही सांगितले. याप्रसंगी माजी मंत्री डाॅ. सुनील देशमुख, नॅकच्या सदस्य स्मिता देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते. अमरावतीचे विपीन तातड यांनी रॅपमधून अमरावतीची लोकसंख्या व बसची संख्या याचे गुणोत्तर आणि यामुळे होणारे प्रवाशांचे हाल मांडले.

लाख को ५० केव्हा?

परिसरच्या ‘लाख को ५०’ या संकल्पनेनुसार अमरावतीच्या साडेसहा लाख लोकसंख्येसाठी सुमारे ३२५ बस अमरावती शहरात धावायला हव्यात. तथापि, अवघ्या २५ बस शहरातील शहरातील रस्त्यांवर धावत आहेत. त्या ‘लाख को पाच’च होतात.

टॅग्स :Socialसामाजिकroad transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडीAmravatiअमरावती