शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आठ लाख हेक्टर वनजमिनींचा प्रश्न विधिमंडळात, महालेखाकारांकडून परीक्षणाबाबत माहिती मागविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 17:00 IST

राज्यात आठ लाख हेक्टर वनजमीन महसूल विभागाकडून परत घेण्यासाठी थेट वनसचिवांनी पुढाकार घेतला. मात्र, वरिष्ठ वनाधिका-यांच्या अनास्थेने ती परत मिळू शकली नाही.

गणेश वासनिकअमरावती : राज्यात आठ लाख हेक्टर वनजमीन महसूल विभागाकडून परत घेण्यासाठी थेट वनसचिवांनी पुढाकार घेतला. मात्र, वरिष्ठ वनाधिका-यांच्या अनास्थेने ती परत मिळू शकली नाही. त्यामुळे या अतिमहत्त्वाच्या मुद्द्यावर विधान परिषद सदस्यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न मांडला आहे. यासंदर्भात इत्थंभूत माहिती मागण्यासाठी महसूल व वनविभागाने पुढाकार घेतला आहे.लोकमतने यापूर्वी राज्यातून आठ लाख हेक्टर वनजमीन गायब, वनजमिनींचा शोध सुरू, वनजमिनी परत करण्याचा महसूलला विसर राज्याच्या वनसचिवांची महसूलला तंबी, वनजमिनी परत करा अशा शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करून हा प्रश्न लोकदरबारात मांडला. दरम्यान, वनविभागाचे सचिव विकास खारगे यांनीदेखील महसूलकडे असलेली आठ लाख हेक्टर वनजमीन परत घेण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न चालविले. परंतु, महसूल विभागाची लॉबी वनविभागावर भारी पडल्याने पुन्हा वनजमिनीचा प्रश्न थंडबस्त्यात पडला. मात्र, २६ फेब्रुवारीपासून प्रारंभ झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष बाब म्हणून ख्वाजा बेग, हेमंत टकले, आनंद ठाकूर, राहुल नार्वेकर या विधान परिषद सदस्यांनी तारांकित प्रश्न क्रमांक ४०४०६ नुसार ह्यराज्यात महसूल विभागाकडे असलेल्या वनजमिनींचे महालेखांकाराकडून परीक्षण याबत विधिमंडळात विचारणा केली आहे. त्याअनुषंगाने महसूल व वन विभागाचे कक्ष अधिकारी मा.क. बनसोडे यांनी राज्यात वनविभागाला महसूलकडे असलेल्या वनजमिनींचे परीक्षण प्रधान महालेखाकार करणार काय, आठ लाख हेक्टर वनजमीन ही महसूलकडे असल्याबाबत नुकसानाला कोणते वरिष्ठ वनाधिकारी जबाबदार आहेत, याप्रकरणीे चौकशी केल्यास काही तथ्य आढळून आले काय, दोषींवर कोणती कारवाई केली, चौकशीअंती कारवाई न करण्याची कारणे कोणती अशा स्वरूपाची माहिती शासनाने प्रधान मुख्य वनसंरक्षक, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांना मागविली आहे. सदर माहिती पाठविण्याबाबचे पत्र २८ फेब्रुवारी रोजी वनविभागाकडे पाठविले असून, १ मार्च २०१८ रोजी ई-मेलद्वारे पाठविण्याचे आदेश दिले.महसूलच्या दबावाने वनसचिवांची माघारराज्याचे वनसचिव विकास खारगे यांनी ४ आॅगस्ट २०१६ रोजी आदेश निर्गमित करून महसूलकडे ताब्यात असलेली आठ लाख हेक्टर वनजमीन विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांनी ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत कार्यवाही करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठविण्याचे कळविले होते. मात्र, महसूल विभागाची मोठी लॉबी असल्याने वनजमिनी ताब्यात देण्यासंदर्भात कोणतीही कारवाई केली नाही. वनसचिव खारगे यांनी महसूलकडे वनजमिनीबाबत वारंवार स्मरणपत्र दिलेत; परंतु काहीही झाले नाही. अखेर वर्षभरानंतर वनसचिवांना याप्रकरणी माघार घ्यावी लागली, हे विशेष.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषद