शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

विधानपरिषद म्हणजे शिक्षकांच्या हक्काचे सभागृह

By admin | Updated: April 19, 2016 00:06 IST

राज्य विधिमंडळाचे विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून या सभागृहात शिक्षकांचे सर्वाधिक प्रश्न मांडले जातात.

दिवाकर रावते : शिक्षक आघाडीचा विभागीय मेळावाअमरावती : राज्य विधिमंडळाचे विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून या सभागृहात शिक्षकांचे सर्वाधिक प्रश्न मांडले जातात. या सभागृहात शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य शिक्षकांच्या प्रश्नांसाठी तुटून पडतात. त्यामुळे विधानपरिषद हे शिक्षकांच्या हक्काचे सभागृह होय, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी येथे केले.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिक्षक आघाडीचे दोन दिवसीय विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला असून सोमवारी या मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गृह राज्यमंत्री रणजित पाटील, माजी मंत्री वसुधा देशमुख, आ. श्रीकांत देशपांडे, माजी मंत्री भैय्यासाहेब ठाकूर, माजी आ. सुलभा खोडके, संजय खोडके, माजी खा. अनंत गुढे, माजी आ.नरेशचंद्र ठाकरे, नगरसेवक दिनेश बूब, प्रशांत वानखडे, सैय्यद राजीक, सामेश्वर पुसतकर आदी उपस्थित होते. यावेळी गोविंद देशपांडे आणि मीनाक्षी देशपांडे यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा पार पडला. पुढे बोलताना ना.रावते म्हणाले, विधानपरिषदेत शिक्षकांचे प्रश्न ऐकून थकलो आहे. आता यात तोडगा निघाला पाहिजे. आम्ही सत्तेत असलो तरी शिक्षकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. संस्था चालकांनी शासनाकडून अनुदान मिळवायचे पण; शिक्षकांना पूर्ण वेतन का नाही, असा सवालदेखील रावतेंनी उपस्थित केला. शासनाने शिक्षक भरती करून शिक्षकांना न्याय प्रदान करणे गरजेचे आहे. विनाअनुदानीत शाळांमध्ये शिक्षकांचे हाल झाले असून त्यांची काहीच किंमत उरली नाही. शिक्षकांना संरक्षण मिळाले पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे त्याकरिता सभागृहात लढावे लागेल. भावूक होता कामा नये, असे ना. रावते श्रीकांत देशपांडे यांना म्हणाले. शिक्षकांनी जो विश्वास टाकला तो सार्थकी लावण्याचे काम शिक्षक आमदारांनी करावे. विरोधकांना किंचितही संधी देऊ नका, असा सल्ला रावतेंनी दिला. दरम्यान आ. श्रीकांत देशपांडे, माजी मंत्री वसुधा देशमुख, अनंत गुढे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक विलास राऊत, सैय्यद राजीक यांनी केले.शिक्षकांपासून मध्यान्ह भोजन काढू : पाटीलसमाज आणि शिक्षकांमध्ये निर्माण झालेली दरी दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून येत्या काळात शिक्षकांपासून मध्यान्ह भोजन व्यवस्था काढली जाईल, असे ना. रणजित पाटील यांनी शब्द दिला. मध्यान्ह भोजन व्यवस्थेसाठी केंद्रीय पद्धत अथवा वेगळी व्यवस्था शासन करणार परंतु यापुढे मध्यान्ह भोजनात शिक्षकांचा सहभाग ठेवणार नाही, असे ना. पाटील यांनी स्पष्ट केले. शिक्षकांना आरोग्य सेवा घेताना सुलभता यावी, यासाठी स्मार्ट कार्ड लागू केले जाईल, असे ते म्हणाले.सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याने उपस्थित भारावलेआ. श्रीकांत देशपांडे यांचे वडील गोविंद व आई मीनाक्षी देशपांडे यांचा सोमवारी सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्याला मान्यवरांनी हजेरी लावताना आ. श्रीकांत देशपांडे यांच्या कर्तृत्वाचा आलेख शिक्षकांसमोर मांडला. या सोहळ्याला विभागातील शिक्षकवृंदानी उपस्थिती होती.