शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

वनविभागातील बदल्यांचा घोळ पोहोचला विधिमंडळात

By admin | Updated: July 13, 2015 00:35 IST

राज्य शासनाने वनविभागात बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार विभागस्तरावर दिले आहे.

लक्षवेधी : वीरेंद्र जगताप विचारणार शासनाला जाब अमरावती : राज्य शासनाने वनविभागात बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार विभागस्तरावर दिले आहे. मात्र, अमरावती वनवृत्त स्तरावर नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याच्या पार्श्वभूमीवर आ.वीरेंद्र जगताप यांनी येत्या अधिवेशनात लक्षेवधी दाखल करुन वनविभागाचा कारभार चव्हाट्यावर आणण्याची रणनीती आखली आहे. या बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप पदोन्नत वनपाल संघटनेने यापूर्वीच केला आहे, हे विशेष.वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नियमसंगत बदल्या करताना यापूर्वी दरवर्षी मंत्रालयात वनविभागात बदल्यांचा बाजार भरायचा. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील शासनाने वनविभागात चालणाऱ्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांना बदली करण्याचे अधिकार बहाल केले आहे. स्थानिक वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कर्तव्याची जाणीव त्या परिसरातील वनाधिकाऱ्यांना राहत असल्याने बदली प्रक्रिया राबविताना उत्कृष्ट आणि कर्तव्यशील कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, ही बदली मागील शासन काळातील आहे. परंतु अमरावती येथील मुख्य वनसंरक्षक कार्यायलाने विभागीय स्तरावर वनपरिक्षेत्र अधिकारी, पदोन्नत वनपाल, सरळ सेवेतील वनपालांच्या बदल्या करताना काहींच्या सेवेची तीन वर्षे पूर्ण झाली नाही तरीही त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा प्रताप केला आहे. नेमकी हीच बाब आ. वीरेंद्र जगताप यांनी हेरली असून सेवेचा कार्यकाळ संपला नसताना संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदल्या कशा करण्यात आल्यात, हा सवाल त्यांनी लक्षवेधीमध्ये नमूद केला आहे. काही मर्जीतील वनपाल, वनरक्षकांना मलईदार जागेवर नियुक्ती करण्याची खेळी वन अधिकाऱ्यांनी केल्याचे पुरावे आ. जगताप यांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे अधिवेशनात ही लक्षेवधी प्राधान्याने घ्यावी, अशी विनंती विधानसभा अध्यक्षांना आ. जगताप यांनी केली आहे. त्यामुळे शासनाने येथील वनविभागात या लक्षवेधीच्या अनुषंगाने पत्र पाठवून वनविभागाला माहिती मागविली आहे. युती शासनाच्या कार्यकाळातील वनविभागात पहिल्यांदाच विभागीय स्तरावर बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. अशातच या बदल्यांमध्ये घोळ झाल्याच्या आरोपाचा धूर निघू लागल्याने आ. जगताप विधिमंडळात याविषयी कोणती भूमिका घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)