जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. यामध्ये १६ ग्रामपंचायतींसह इतर ठिकाणी एका सदस्यपदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ४७७ सदस्यपदे अविरोध निवडून आलेली आहेत. त्यामुळे ५३७ ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये ४३९७ सदस्यपदांसाठी १९४८ मतदान केंद्रांवर ७.४० लाख मतदारांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावला.
मतमोजणी पश्चात ज्या गटाचे बहुमत आलेले आहे त्या गटात सरपंचपदासाठी अनेक दावेदार समोर आले आहेत. मात्र, आरक्षण कुण्या प्रवर्गात यावर सर्व अडले आहे. त्यामुळे इच्छुकांकडून सरपंचपदाचे आरक्षणाची सातत्याने विचारणा होत आहे. आता प्रतीक्षा आणखी पाच दिवस ताणल्या जाणार आहे. जिल्हा निवडणूक विभागाद्वारा तालुकास्तरावर २ फेब्रुवारीला सरपंचपदाची सोडत काढण्यात येईल व ४ तारखेला या महिला राखीव सरपंचपदांसाठी तालुकास्तरावरच सोडत काढण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.
बॉक्स
मार्च महिण्यातील आरक्षण स्थिती
जिल्ह्यात मार्च महिण्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली. यानंतर कोरोना संसर्गामुळे ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. यामध्ये ४८७६ सदस्यपदांपैकी २६९२ पदे महिलांसाठी राखीव होती. यामध्ये सर्वसधारणमध्ये २०१० यामध्ये ११७१ महिला राखीव, अनु.जातीमध्ये १०४६ पदे यामध्ये ५५९ महिलांसाठी राखीव, अनु, जमातीसाठी ७३२ पदे यामध्ये ३५० महिलांसाठी व नामाप्रमध्ये ११५७ पदे यामध्ये ६१२ महिलांसाठी राखीव अशी स्थिती होती.