शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

दोन कोटी वृक्ष लागवडीचे रोपटे मोजताहेत अखेरची घटका !

By admin | Updated: September 10, 2016 00:18 IST

राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून दोन कोटी वृक्ष लागवडीचा पल्ला गाठला असला तरी पावसाने अचानक महिनाभराची दडी मारल्याने हे रोपटे जगवावे कसे,...

सामाजिक वनीकरणाला चिंता : रोपटे जगविण्यासाठी उपाययोजना अमरावती : राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून दोन कोटी वृक्ष लागवडीचा पल्ला गाठला असला तरी पावसाने अचानक महिनाभराची दडी मारल्याने हे रोपटे जगवावे कसे, ही चिंता सामाजिक वनीकरणाला लागली आहे. परिणामी वृक्ष लागवड धोक्यात येण्याचे संकेत असून रोपटे शेवटची घटका मोजत आहे. अमरावती जिल्ह्यात दोन कोटी वृक्ष लागवडीत ४ लाख ८७ हजार वृक्षारोपण करण्यात आले आहे. आज, उद्या कधीतरी पाऊस येईल, या प्रतीक्षेत शेतकऱ्यांसह वनाधिकारी देखील आहेत. मात्र पावसाने महिन्याभरापासून दडी मारल्यामुळे वृक्ष लागवडीतील रोपट्यांना जगविणे हे फार अवघड झाले आहे. काही रोपटे सुकू लागल्याने वृक्ष लागवडीवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये वाया तर जाणार नाही, ही चिंता सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना लागली आहे. राज्य शासनाने सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी यावर्षी जलसंधारण, जलयुक्त शिवार योजना राबविली. यंदा मोसमात प्रारंभी आलेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला. नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले. यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असे गृहीत झाले. परंतु महिन्याभरापासून पाऊस अचानक दडी मारुन बसल्याने सततच्या दुष्काळामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. अशातच राज्य शासनाने जंगलाचे क्षेत्र वाढविणे, पर्यावरण संंरक्षण, जंगलाचा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी १ जुलै रोजी दोन कोटी वृक्षलागवड हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविला. दोन कोटी पेक्षा जास्त वृक्ष लागवडीचा पल्ला गाठला. सदर वृक्ष लागवड होताच राज्यभरात पावसाचे दमदार आगमन झाले. त्यामुळे वृक्ष लागवडीतील रोपटे जगतीलच नाही तर ते हिरवेगार होऊन डौलाने उभे राहतील, असे भाकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आदींनी वर्तविले होते. पंरतु गत महिन्याभरापासून पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला असला तरी सामाजिक वनीकरण विभागदेखील कोमात जाण्याच्या स्थितीत आहे. जून, जुलै या महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे रोपट्यांची चांगल्या पद्धतीने वाढ झाली. मात्र महिन्याभरापासून पावसाने उघडीप दिल्याने पाण्याअभावी रोपे सुकू लागली आहेत. डोंगरी भागात झालेल्या वृक्ष लागवडीतील रोपटे पाण्याअभावी सुकू लागली आहेत. डोंगरी भागातील रोपांना कसे जीवंत ठेवावे, हा गंभीर प्रश्न वनविभागासमोर उभा ठाकला आहे. रस्ता दुर्तफा वृक्ष लागवडीतील रोपे जगविण्यासाठी आॅक्टोंबरपासून निधीची तरतूद केली जाते. मात्र वृक्ष लागवड या महत्वकांक्षी प्रकल्पातील रोपटे जगविण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली नसल्याने ते पाण्याअभावी सुकू लागली आहेत.रोपवाटिकेतील रोपटे सुरक्षित आहेत. दोन कोटी वृक्ष लागवडीत जिल्ह्यात ४ लाख ८७ हजारांपैकी वनविभागाने १ लाख ५२ हजार एवढे वृक्षारोपण केले आहे. पावसाअभावी रोपटे जगविणे कठीण होत चालले असले तरी उपाययोजना केल्या जात आहेत.- प्रदीप मसराम,उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, अमरावती.