शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटी वृक्ष लागवडीचे रोपटे मोजताहेत अखेरची घटका !

By admin | Updated: September 10, 2016 00:18 IST

राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून दोन कोटी वृक्ष लागवडीचा पल्ला गाठला असला तरी पावसाने अचानक महिनाभराची दडी मारल्याने हे रोपटे जगवावे कसे,...

सामाजिक वनीकरणाला चिंता : रोपटे जगविण्यासाठी उपाययोजना अमरावती : राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून दोन कोटी वृक्ष लागवडीचा पल्ला गाठला असला तरी पावसाने अचानक महिनाभराची दडी मारल्याने हे रोपटे जगवावे कसे, ही चिंता सामाजिक वनीकरणाला लागली आहे. परिणामी वृक्ष लागवड धोक्यात येण्याचे संकेत असून रोपटे शेवटची घटका मोजत आहे. अमरावती जिल्ह्यात दोन कोटी वृक्ष लागवडीत ४ लाख ८७ हजार वृक्षारोपण करण्यात आले आहे. आज, उद्या कधीतरी पाऊस येईल, या प्रतीक्षेत शेतकऱ्यांसह वनाधिकारी देखील आहेत. मात्र पावसाने महिन्याभरापासून दडी मारल्यामुळे वृक्ष लागवडीतील रोपट्यांना जगविणे हे फार अवघड झाले आहे. काही रोपटे सुकू लागल्याने वृक्ष लागवडीवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये वाया तर जाणार नाही, ही चिंता सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना लागली आहे. राज्य शासनाने सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी यावर्षी जलसंधारण, जलयुक्त शिवार योजना राबविली. यंदा मोसमात प्रारंभी आलेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला. नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले. यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असे गृहीत झाले. परंतु महिन्याभरापासून पाऊस अचानक दडी मारुन बसल्याने सततच्या दुष्काळामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. अशातच राज्य शासनाने जंगलाचे क्षेत्र वाढविणे, पर्यावरण संंरक्षण, जंगलाचा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी १ जुलै रोजी दोन कोटी वृक्षलागवड हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविला. दोन कोटी पेक्षा जास्त वृक्ष लागवडीचा पल्ला गाठला. सदर वृक्ष लागवड होताच राज्यभरात पावसाचे दमदार आगमन झाले. त्यामुळे वृक्ष लागवडीतील रोपटे जगतीलच नाही तर ते हिरवेगार होऊन डौलाने उभे राहतील, असे भाकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आदींनी वर्तविले होते. पंरतु गत महिन्याभरापासून पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला असला तरी सामाजिक वनीकरण विभागदेखील कोमात जाण्याच्या स्थितीत आहे. जून, जुलै या महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे रोपट्यांची चांगल्या पद्धतीने वाढ झाली. मात्र महिन्याभरापासून पावसाने उघडीप दिल्याने पाण्याअभावी रोपे सुकू लागली आहेत. डोंगरी भागात झालेल्या वृक्ष लागवडीतील रोपटे पाण्याअभावी सुकू लागली आहेत. डोंगरी भागातील रोपांना कसे जीवंत ठेवावे, हा गंभीर प्रश्न वनविभागासमोर उभा ठाकला आहे. रस्ता दुर्तफा वृक्ष लागवडीतील रोपे जगविण्यासाठी आॅक्टोंबरपासून निधीची तरतूद केली जाते. मात्र वृक्ष लागवड या महत्वकांक्षी प्रकल्पातील रोपटे जगविण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली नसल्याने ते पाण्याअभावी सुकू लागली आहेत.रोपवाटिकेतील रोपटे सुरक्षित आहेत. दोन कोटी वृक्ष लागवडीत जिल्ह्यात ४ लाख ८७ हजारांपैकी वनविभागाने १ लाख ५२ हजार एवढे वृक्षारोपण केले आहे. पावसाअभावी रोपटे जगविणे कठीण होत चालले असले तरी उपाययोजना केल्या जात आहेत.- प्रदीप मसराम,उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, अमरावती.