शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
3
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
4
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
5
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

विदर्भातील करोडोंच्या भूदान जमिनी शिक्षण संस्थांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:40 AM

आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीदरम्यान दानात मिळालेल्या जमिनींपैकी भूदान यज्ञ मंडळाने विदर्भातील २०.८० हेक्टर जमीन अधिनियमाला हरताळ फासून चक्क शिक्षणसंस्थांना वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देअधिनियमाला बगलभूदान यज्ञ मंडळाला महसूल अधिकाऱ्यांचेही बळ

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीदरम्यान दानात मिळालेल्या जमिनींपैकी भूदान यज्ञ मंडळाने विदर्भातील २०.८० हेक्टर जमीन अधिनियमाला हरताळ फासून चक्क शिक्षणसंस्थांना वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २०१४ ते १८ या काळात आठ शिक्षण संस्थांना वाटप करण्यात आलेल्या या जमिनींचे बाजारमूल्य कोट्यवधी रुपयांचे आहे.विशेष असे की, भूदान मंडळाकडून केली जाणारी नियमबाह्य कामे रोखण्याची जबाबदारी ज्यांच्या शिरावर होती, त्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनीही नियमांचे उल्लंघन करून सदर संस्थांच्या नावे फेरफार नोंदवून घेतले. भूदान यज्ञ मंडळ, लाभार्थी शिक्षण संस्था आणि महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी संगनमताने भूदान कायद्याला मूठमाती दिल्याचे या प्रकरणातून उघड होते. शासनाने यासंबंधाने खोलवर तपास केल्यास अनेक धक्कादायक खुलासे होणार आहेत.

काय म्हणतोे नियम?भूदान यज्ञ अधिनियम १९५३ चे कलम ३ अन्वये शासनाद्वारे गठित भूदान यज्ञ मंडळाला कलम २२ अन्वये स्वत: वाही-पेरी करू शकणाऱ्या भूमिहीन शेतमजुरास भूदान जमिनीचे वाटप करण्याचे अधिकार आहेत. कलम २३ मधील तरतुदीनुसार वाटप केलेल्या शेतजमिनीची गावाच्या अधिकार अभिलेखात संबंधिताच्या नावे भूमिधारी अशी नोंद करण्यात येईल, असे कलम २४ मध्ये नमूद आहे. म्हणजेच वाटप झालेल्या जमिनी भूमिहीन शेतमजुरांच्या नावे नोंद करण्याचे कायद्याने बंधन आहे.

काय आहे भूदान चळवळ?आचार्य विनोबा भावे यांनी ७ मार्च १९५१ रोजी सेवाग्राम येथून  पदयात्रा सुरू केली. १८ एप्रिल १९५१ रोजी पदयात्रा सध्याच्या तेलंगणा राज्यातील नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावी पोहोचली. याच ठिकाणी त्यांनी ‘सब भूमी गोपाल की’ अशी घोषणा करून देशातील जमीनदारांकडे भूमिहिनांसाठी जमिनी मागण्याचा प्रयोग सुरू केला. त्यासाठी विनोबाजींनी तब्बल ४० हजार मैल पदयात्रा केली. दान मिळालेली लाखो हेक्टर जमीन तत्कालीन भूदान समित्यातर्फे भूमिहीन शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिली गेली.

गावाच्या विकासासाठी भूदान जमीन द्यावी, या मताचा मी नाही. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ भूमिहीन शेतमजुरांसाठी उभारली. दानातील जमिनींचा याच माध्यमासाठी उपयोग व्हावा, असे माझे मत आहे.-एकनाथ डगवार, सचिव, भूदान यज्ञ मंडळ, यवतमाळ

टॅग्स :Vinoba Bhaveविनोबा भावे