शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
4
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
5
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
6
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
7
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
8
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
9
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
10
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
11
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
12
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
13
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
14
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
15
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
16
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
17
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
18
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
19
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
20
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध

भूमिहीन शेतकऱ्यांना मिळाली ११ महिने कालावधीसाठी जमीन

By admin | Updated: June 28, 2014 23:19 IST

मोर्शी तालुक्यातील अप्परवर्धा प्रकल्पाशेजारील सिंभोरा आणि नशिरपूर गावातील ६८ भूमिहीन शेतमजुरांना ११ महिन्यांच्या कालावधीसाठी शेतजमिनीचे पट्टे वाहितीसाठी देण्यात आले आहे.

दिलासा : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाशी करारवरुड : मोर्शी तालुक्यातील अप्परवर्धा प्रकल्पाशेजारील सिंभोरा आणि नशिरपूर गावातील ६८ भूमिहीन शेतमजुरांना ११ महिन्यांच्या कालावधीसाठी शेतजमिनीचे पट्टे वाहितीसाठी देण्यात आले आहे.प्रकल्पालगतच्या जमिनीची शेतमजूर वाहिपेरी दरवर्षी करीत होते. मात्र, या वर्षापासून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने संपादित केलेल्या शेतजमीनीचे पट्टे लिलाव पद्धतीने शेतकऱ्यांना देण्यात आले. यामुळे भूमिहीन शेतकरी, शेतमजुरांवर गंडांतर येणार असल्याने सहा वर्षांपासून शेती कसणारे शेतकरी यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर अन्यायग्रस्त भूमिहीन शेतकऱ्यांना शेतीचे पट्टे ११ महिन्यांसाठी मिळाले आहेत. प्रकल्पानजिक असलेल्या संपादित जमिनीच्या पट्ट्यात गत सहा वर्षांपासून सिंभोरा आणि नशितपूरचे ६८ भूमिहीन शेतकरी वाहिपेरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. यंदा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने सिंभोरा व नशिरपूर येथील धरणाच्या भिंतीखालील संपादित व सध्या विनावापर असलेल्या शेतजमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. याकरिता लिलावाची २७ जून ही तारीख ठरविण्यात येऊन बोलीदरांना आमंत्रित केले होते. एकूण ३४ पट्टे प्रत्येकी १.०८ हेक्टर याप्रमाणे एक एक पट्टा लिलाव करणे. असा आदेश काढण्यात आला होता. या निर्णयामुळे सिंभोरा आणि नशितपूर येथील भूमिहीन शेतमजुरांना शेती करण्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊन कुटुंबावर उपासमारी येण्याची शक्यता होती. सहा वर्षांपासून शेतजमिनीची वाहिपेरी करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्यावर अन्याय करणारा प्रकार होता. या संपादित शेतजमिनीचे पट्टे नियमित वाहीपेरी करणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांना मिळावे म्हणून हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वात पाटबंधारे मंत्री सुनील तटकरे यांना निवेदन देण्यात आले होते. या मागणीची दखल घेऊन मंत्रालयाने पुनर्विचार करुन अखेर भूमिहीन शेतकऱ्यांना ११ महिन्यांच्या कालावधीकरिता सदर जमिनी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे भूमिहीन शेतमजूर रामदास मोंढे, सुरेश राऊत, रामदास नेवारे, श्रीकृष्ण नेवारे, संजय ढोक, ज्ञानेश्वर देवताळे, महादेव ठाकरे, रामदास मडावी, ज्ञानेश्वर राऊत, नामदेव वरठी, अशोक भोयर, रामदास वाघाडे, दुगार् शेळके, विठ्ठल ठाकरे, मधुकर उईके, रंगराव ठाकरे, देविदास ठाकरे, सुनील काळे, विलास भोकरे, विजय सहारे, दादाराव टोम्पे,साहेबराव धुर्वे, भागवत धुर्वे, इंदिरा वरठी, दिवाकर मडावी, हरिश्चंद्र नेहारे, साहेबराव दुधकवरे, गजानन मरस्कोल्हे, रंगराव बोंदरे, बाळासाहेब उमरकर, बाबुराव उमरकर, केवल सुर्यवंशी, तुकाराम खडस यांनी स्वागत केले आहे. (तालुका प्रतिनिधी)