शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

पाच हजार किलोमीटरने सरकला भारताचा भूभाग

By admin | Updated: February 28, 2015 00:35 IST

आशिया खंडातील भारत देशाचा भूभाग मूळ जागेवरून तब्बल पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत सरकला असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील

वैभव बाबरेकर अमरावतीआशिया खंडातील भारत देशाचा भूभाग मूळ जागेवरून तब्बल पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत सरकला असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागप्रमुख सय्यद फजल रहेमान खादरी यांनी संशोधनांतून मांडला. खादरी हे भूगर्भशास्त्राचे विभागप्रमुख व भूगर्भ संशोधक आहेत. खादरी यांनी या संशोधनासाठी खंड वाहकाच्या सिध्दांताचा आधार घेतला. ६०० लाख वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीत भारताचा भूगाग १८० डिग्रीने फिरला व भूभागाचे उत्तर-पूर्व दिशेने वहन सुरु झाले. त्यावेळच्या भूभागाची दिशा व आताच्या दिशेशी जुळत नसल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आहे. हिमालयावर आजही आढळतात समुद्रातील अवशेष भारतात विविध ठिकाणी पसरलेला ज्वालामुखी थंड होऊन दगड मातीमध्ये रुपांतरित झाला होता. तेव्हापासून काळे दगड अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर ५० मिलिनियम वर्षांनंतर उलथापालथ झाली व समुद्रालगतची जागा उंचावली. त्यामुळे हिमालयाच्या पर्वतरांगा तयार झाल्या. आजही या पर्वतरांगांच्या टोकावर समुद्रातील अवशेष आढळतात. हिमालय पर्वत श्रुंखलेत सर्वात उंच एव्हरेस्ट पर्वत असून त्याची उंची ८,८४८ मीटर म्हणजे ९ किलोमीटर उंच आहे. तसेच उंचीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर काश्मीर येथील के-२ पर्वत आहे. तापमानावर चुंबकत्वाचे प्रमाण बेसाल्ट या खडकामध्ये ०.५ ते १ टक्के चुंबकीय खनीज आहे. ज्वालामुखीचे तापमान १२०० डिग्री सेंटीग्रेट असल्याने हे खडक वितळतात. तापमान अधिक असतानाच या काळ्या दगडाचे चुंबकत्व बदलू शकते. तापमान वाढले की चुंबकत्व कमी होते व थंड झाले की वाढते. सद्यस्थितीत काळ्या दगडावरील अवशेष आढळले आहे.'अ‍ॅथिनोस्पीअर' पदार्थावर तरंगतोय भूखंड भारताचा भूभाग हा उत्तर-पूर्व दिशेने वढत आहे. तेव्हापासून पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश हे भारताशी जोडलेले आहेत. त्यावेळी ज्वालामुखीतून (हॉटस्पॉट) निघालेला लाव्हा भारतातील १० लाख स्केअर किलोमीटर भूभागात पसरला आहे. जमिनीच्या आत १०० किलोमीटरवर 'अ‍ॅथिनोस्पीअर' हा पदार्थ आहे. त्यावर असणारा हा भूखंड नॉर्थ-ईस्ट दिशेने सरकत गेल्याने भारताचा भूखंड वेगळा झाला. अवघ्या काही वर्षांपूर्वी अंदमान-निकोबार या बेटांवर ज्वालामुखीचा उद्रेक झाला. खडकांच्या नमुन्यावरून त्या ठिकाणी आढळलेल्या खडकाची दिशा व तयार झाल्याचे वर्ष तंतोतंत जुळविता येते, असे सै. फजल रहेमान खादरी यांनी सांगितले.