शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

पाच हजार किलोमीटरने सरकला भारताचा भूभाग

By admin | Updated: February 28, 2015 00:35 IST

आशिया खंडातील भारत देशाचा भूभाग मूळ जागेवरून तब्बल पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत सरकला असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील

वैभव बाबरेकर अमरावतीआशिया खंडातील भारत देशाचा भूभाग मूळ जागेवरून तब्बल पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत सरकला असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागप्रमुख सय्यद फजल रहेमान खादरी यांनी संशोधनांतून मांडला. खादरी हे भूगर्भशास्त्राचे विभागप्रमुख व भूगर्भ संशोधक आहेत. खादरी यांनी या संशोधनासाठी खंड वाहकाच्या सिध्दांताचा आधार घेतला. ६०० लाख वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीत भारताचा भूगाग १८० डिग्रीने फिरला व भूभागाचे उत्तर-पूर्व दिशेने वहन सुरु झाले. त्यावेळच्या भूभागाची दिशा व आताच्या दिशेशी जुळत नसल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आहे. हिमालयावर आजही आढळतात समुद्रातील अवशेष भारतात विविध ठिकाणी पसरलेला ज्वालामुखी थंड होऊन दगड मातीमध्ये रुपांतरित झाला होता. तेव्हापासून काळे दगड अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर ५० मिलिनियम वर्षांनंतर उलथापालथ झाली व समुद्रालगतची जागा उंचावली. त्यामुळे हिमालयाच्या पर्वतरांगा तयार झाल्या. आजही या पर्वतरांगांच्या टोकावर समुद्रातील अवशेष आढळतात. हिमालय पर्वत श्रुंखलेत सर्वात उंच एव्हरेस्ट पर्वत असून त्याची उंची ८,८४८ मीटर म्हणजे ९ किलोमीटर उंच आहे. तसेच उंचीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर काश्मीर येथील के-२ पर्वत आहे. तापमानावर चुंबकत्वाचे प्रमाण बेसाल्ट या खडकामध्ये ०.५ ते १ टक्के चुंबकीय खनीज आहे. ज्वालामुखीचे तापमान १२०० डिग्री सेंटीग्रेट असल्याने हे खडक वितळतात. तापमान अधिक असतानाच या काळ्या दगडाचे चुंबकत्व बदलू शकते. तापमान वाढले की चुंबकत्व कमी होते व थंड झाले की वाढते. सद्यस्थितीत काळ्या दगडावरील अवशेष आढळले आहे.'अ‍ॅथिनोस्पीअर' पदार्थावर तरंगतोय भूखंड भारताचा भूभाग हा उत्तर-पूर्व दिशेने वढत आहे. तेव्हापासून पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश हे भारताशी जोडलेले आहेत. त्यावेळी ज्वालामुखीतून (हॉटस्पॉट) निघालेला लाव्हा भारतातील १० लाख स्केअर किलोमीटर भूभागात पसरला आहे. जमिनीच्या आत १०० किलोमीटरवर 'अ‍ॅथिनोस्पीअर' हा पदार्थ आहे. त्यावर असणारा हा भूखंड नॉर्थ-ईस्ट दिशेने सरकत गेल्याने भारताचा भूखंड वेगळा झाला. अवघ्या काही वर्षांपूर्वी अंदमान-निकोबार या बेटांवर ज्वालामुखीचा उद्रेक झाला. खडकांच्या नमुन्यावरून त्या ठिकाणी आढळलेल्या खडकाची दिशा व तयार झाल्याचे वर्ष तंतोतंत जुळविता येते, असे सै. फजल रहेमान खादरी यांनी सांगितले.