शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

शेतकरी अपघात विम्याबद्दल जनजागृतीचा अभाव

By admin | Updated: May 20, 2016 00:19 IST

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून त्याच्या वारसाला दोेन लाख रूपयांची मदत देण्याचे प्रावधान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत करण्यात आले आहे.

विदारक वास्तव : अनेक लाभार्थी वंचित दर्यापूर : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून त्याच्या वारसाला दोेन लाख रूपयांची मदत देण्याचे प्रावधान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत करण्यात आले आहे. परंतु या लाभदायक योजनेबद्दल पुरेशी जनजागृती नसल्याने या योजनेपासून शेतकरी वंचित राहत आहेत. या योजनेंतर्गत शासनामार्फत विमा संरक्षण दुप्पट करण्यात आले आहे. परंतु योजनेसंदर्भात संबंधित विभागाने जनजागृतीकडे अजिबात लक्ष दिलेले नाही. शहरात योजनेसंदर्भात प्रचार पत्रकांचे पाहिजे त्या प्रमाणात वाटप करण्यात आलेले नाही. तसेच प्रचारासाठी प्रसिध्दी माध्यमांचादेखील पुरेसा वापर झाला नसल्याचे दिसते. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून तालुक्यातून एकही प्रस्ताव आलेला नाही. यावरून शासकीय योजना राबविण्याबाबत अधिकारी किती गंभीर आहेत, हे दिसून येते.अनेकदा शेतीची कामे करताना शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू होतो. कुटुंबातील कर्ता पुरूषच गेल्याने त्याचे कुटुंब वाऱ्यावर येतात. सातत्याने उदभवणारी दुष्काळी स्थिती, नापिकी आणि त्यामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या या बाबी लक्षात घेऊन शासनाने या विमा योजनेच्या लाभाची रक्कम दुप्पट केली आहे. पूर्वी अपंगत्व आल्यास अथवा एखादा अवयव निकामी झाल्यास ५० हजारांचे अनुदान मिळत होते. आता ते एक लाखावर पोहोचले आहे. रक्कम दुप्पट केल्यानंतर योजनेला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा शासनाला होती. मात्र, अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे व सुस्तावलेल्या धोरणामुळे योजनेला पाहिजे तेवढी प्रसिध्दीच मिळालेली नाही. परिणामी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. (प्रतिनिधी)