शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

शेतकरी अपघात विम्याबद्दल जनजागृतीचा अभाव

By admin | Updated: May 20, 2016 00:19 IST

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून त्याच्या वारसाला दोेन लाख रूपयांची मदत देण्याचे प्रावधान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत करण्यात आले आहे.

विदारक वास्तव : अनेक लाभार्थी वंचित दर्यापूर : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून त्याच्या वारसाला दोेन लाख रूपयांची मदत देण्याचे प्रावधान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत करण्यात आले आहे. परंतु या लाभदायक योजनेबद्दल पुरेशी जनजागृती नसल्याने या योजनेपासून शेतकरी वंचित राहत आहेत. या योजनेंतर्गत शासनामार्फत विमा संरक्षण दुप्पट करण्यात आले आहे. परंतु योजनेसंदर्भात संबंधित विभागाने जनजागृतीकडे अजिबात लक्ष दिलेले नाही. शहरात योजनेसंदर्भात प्रचार पत्रकांचे पाहिजे त्या प्रमाणात वाटप करण्यात आलेले नाही. तसेच प्रचारासाठी प्रसिध्दी माध्यमांचादेखील पुरेसा वापर झाला नसल्याचे दिसते. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून तालुक्यातून एकही प्रस्ताव आलेला नाही. यावरून शासकीय योजना राबविण्याबाबत अधिकारी किती गंभीर आहेत, हे दिसून येते.अनेकदा शेतीची कामे करताना शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू होतो. कुटुंबातील कर्ता पुरूषच गेल्याने त्याचे कुटुंब वाऱ्यावर येतात. सातत्याने उदभवणारी दुष्काळी स्थिती, नापिकी आणि त्यामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या या बाबी लक्षात घेऊन शासनाने या विमा योजनेच्या लाभाची रक्कम दुप्पट केली आहे. पूर्वी अपंगत्व आल्यास अथवा एखादा अवयव निकामी झाल्यास ५० हजारांचे अनुदान मिळत होते. आता ते एक लाखावर पोहोचले आहे. रक्कम दुप्पट केल्यानंतर योजनेला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा शासनाला होती. मात्र, अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे व सुस्तावलेल्या धोरणामुळे योजनेला पाहिजे तेवढी प्रसिध्दीच मिळालेली नाही. परिणामी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. (प्रतिनिधी)