शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

मुख्यमंत्र्यांना पडला कोळी समाजाचा विसर

By admin | Updated: September 12, 2015 00:14 IST

कोळी समाजाद्वारे मुंबईत आयोजित मोर्चाच्या वेळी या समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

पूर्तता नाही : नोकरीत सामावण्याची मागणी अमरावती : कोळी समाजाद्वारे मुंबईत आयोजित मोर्चाच्या वेळी या समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, अद्यापही या समस्या सोडविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोळी समाजाच्या मागण्यांची आठवण करून देण्याकरिता कोळी समाजाच्या शिक्षिकेने मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर सोलापूर येथे लोटांगणही घेण्यात आले. यापुढेही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राज्यस्तरीय मागासवर्गीय कृती समितीचे महासचिव उमेश ढोणे यांनी दिला आहे. मुंबई येथील मोर्चाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोळी समाजाच्यावतीने नेते रमेश पाटील, अनंत तरे, उमेश ढोणे, सतीश काळे, संदीप बगाळे यांनी निवेदन दिले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाजप सरकार कोळी समाजावरील अन्याय दूर करुन जात पडताळणीच्या नावावर कमी केलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना पुन्हा शासकीय नोकरीत सामावून घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यांना त्याचा विसर पडल्याचा आरोप मागासवर्गीय कृती समितीचे महासचीव उमेश ढोणे यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने सातत्याने मुख्यमंत्र्यासी भेटुन पत्रव्यवहार करण्यात अले मात्र अद्यापही कार्यवाही झाली नाही. याबाबत राज्यातील कोळी समाज संतप्त असून शासनाबाबत नाराजी व्यक्त करत आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने जातपळताळणीच्या नावाखाली कमी केलेल्या कोळी समाजाच्या कर्मचाऱ्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. प्रत्येक जिल्ह्यात नोकरीतून कमी केलेले हजारो कर्मचारी असून त्यांना आता न्याय हवा आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोळी समाजाच्या मागण्या मंजूर करुन शासन निर्णय काढावा, अशी मागणी राज्यस्तरीय मागासवर्गीय कृती समितीचे महासचिव उमेश ढोणे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)