शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

मुख्यमंत्र्यांना पडला कोळी समाजाचा विसर

By admin | Updated: September 12, 2015 00:14 IST

कोळी समाजाद्वारे मुंबईत आयोजित मोर्चाच्या वेळी या समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

पूर्तता नाही : नोकरीत सामावण्याची मागणी अमरावती : कोळी समाजाद्वारे मुंबईत आयोजित मोर्चाच्या वेळी या समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, अद्यापही या समस्या सोडविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोळी समाजाच्या मागण्यांची आठवण करून देण्याकरिता कोळी समाजाच्या शिक्षिकेने मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर सोलापूर येथे लोटांगणही घेण्यात आले. यापुढेही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राज्यस्तरीय मागासवर्गीय कृती समितीचे महासचिव उमेश ढोणे यांनी दिला आहे. मुंबई येथील मोर्चाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोळी समाजाच्यावतीने नेते रमेश पाटील, अनंत तरे, उमेश ढोणे, सतीश काळे, संदीप बगाळे यांनी निवेदन दिले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाजप सरकार कोळी समाजावरील अन्याय दूर करुन जात पडताळणीच्या नावावर कमी केलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना पुन्हा शासकीय नोकरीत सामावून घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यांना त्याचा विसर पडल्याचा आरोप मागासवर्गीय कृती समितीचे महासचीव उमेश ढोणे यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने सातत्याने मुख्यमंत्र्यासी भेटुन पत्रव्यवहार करण्यात अले मात्र अद्यापही कार्यवाही झाली नाही. याबाबत राज्यातील कोळी समाज संतप्त असून शासनाबाबत नाराजी व्यक्त करत आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने जातपळताळणीच्या नावाखाली कमी केलेल्या कोळी समाजाच्या कर्मचाऱ्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. प्रत्येक जिल्ह्यात नोकरीतून कमी केलेले हजारो कर्मचारी असून त्यांना आता न्याय हवा आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोळी समाजाच्या मागण्या मंजूर करुन शासन निर्णय काढावा, अशी मागणी राज्यस्तरीय मागासवर्गीय कृती समितीचे महासचिव उमेश ढोणे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)