शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

‘किसान सन्मान’ मिशनमोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 21:49 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासनावारा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चार हजारांचा टप्पा आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सोमवारी नवे जिल्हाधिकारी शैलेश नवाल रुजू होतील. त्यानंतर ‘किसान सन्मान’ मिशन मोडवर राहणार आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या हालचाली गतिमान : फेब्रुवारीअखेर शेतकऱ्यांच्या खाती अनुदान

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासनावारा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चार हजारांचा टप्पा आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सोमवारी नवे जिल्हाधिकारी शैलेश नवाल रुजू होतील. त्यानंतर ‘किसान सन्मान’ मिशन मोडवर राहणार आहे.शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू केली आहे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूददेखील केलेली आहे. दोन हजारांचे तीन टप्पे वर्षभºयात अल्पभूधारक शेतकºयांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. या योजनेचा पहिला टप्पा तरी या महिन्याअखेर शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. योजनेची घोषणा केल्याच्या तिसºया दिवशीच राज्य शासनाचे आदेश धडकले व कृषी महसूलसह जिल्हा परिषदेला २६ फेब्रुवारीपर्यंत याद्या तयार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. योजनेसाठी पात्र शेतकºयांचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक व बँक खात्याचा तपशील तत्काळ प्राप्त करून घेण्याची कार्यवाही युद्धस्तरावर सुरू झालेली आहे. नव्या जिल्हाधिकाºयांच्या अजेंड्यावर ही योजना राहणार आहे. कुठल्याही परिस्थितीत या महिन्याअखेर शेतकºयांच्या बँक खात्यावर दोन हजार रूपये जमा झालेच पाहिजे, असा शासनाने चंग बांधला आहे. कुठल्याही परिस्थितीत २० फेब्रुवारीपूर्वी शेतकऱ्यांची माहिती संकलित करून याद्या तयार करण्याचे आदेश शासनस्तरावर देण्यात आलेले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने समित्या गठीतअल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना योजनेत प्रतिशेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार इतके आर्थिक सहाय्य तीन टप्प्यात मिळणार आहे. वनहक्क कायद्यानुसार जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबांचाही योजनेत समावेश होणार आहे. ज्या कुटुंबाचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक कमाल धारणा क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या स्थापण्यात आल्या आहेत. तलाठी ग्राम समितीचे प्रमुख आहेत. सध्या या समितीचे काम जोमात सुरू झालेले आहे.मुख्य सचिवांद्वारा दोन वेळा व्हिसीद्वारे आढावाकेंद्राच्या बजेटनंतर तिसऱ्या दिवशी राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी ‘किसान सन्मान’साठी चार फेब्रुवारीला परिपत्रक जारी केले. पाच तारखेला यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, सीईओ व कृषी विभागाचे अधिकाऱ्यांची व्हिसी घेतली. सात तारखेला पुन्हा विभागीय आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांशी व्हिसीद्वारे संवाद साधला. या योजनेसंदर्भात ६ फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक व दुसऱ्याच दिवसी तालुका स्तरावर तहसीलदारांनी बैठकी घेतल्या. एकंदरीत शासनस्तरावर या योजनेविषयी अत्यंत गांभीर्याने घेतल्या जात आहे. आचारसंहितेपूर्वी या महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा केला जाणार आहे.