शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘किसान सन्मान’ मिशनमोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 21:49 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासनावारा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चार हजारांचा टप्पा आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सोमवारी नवे जिल्हाधिकारी शैलेश नवाल रुजू होतील. त्यानंतर ‘किसान सन्मान’ मिशन मोडवर राहणार आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या हालचाली गतिमान : फेब्रुवारीअखेर शेतकऱ्यांच्या खाती अनुदान

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासनावारा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चार हजारांचा टप्पा आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सोमवारी नवे जिल्हाधिकारी शैलेश नवाल रुजू होतील. त्यानंतर ‘किसान सन्मान’ मिशन मोडवर राहणार आहे.शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू केली आहे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूददेखील केलेली आहे. दोन हजारांचे तीन टप्पे वर्षभºयात अल्पभूधारक शेतकºयांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. या योजनेचा पहिला टप्पा तरी या महिन्याअखेर शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. योजनेची घोषणा केल्याच्या तिसºया दिवशीच राज्य शासनाचे आदेश धडकले व कृषी महसूलसह जिल्हा परिषदेला २६ फेब्रुवारीपर्यंत याद्या तयार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. योजनेसाठी पात्र शेतकºयांचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक व बँक खात्याचा तपशील तत्काळ प्राप्त करून घेण्याची कार्यवाही युद्धस्तरावर सुरू झालेली आहे. नव्या जिल्हाधिकाºयांच्या अजेंड्यावर ही योजना राहणार आहे. कुठल्याही परिस्थितीत या महिन्याअखेर शेतकºयांच्या बँक खात्यावर दोन हजार रूपये जमा झालेच पाहिजे, असा शासनाने चंग बांधला आहे. कुठल्याही परिस्थितीत २० फेब्रुवारीपूर्वी शेतकऱ्यांची माहिती संकलित करून याद्या तयार करण्याचे आदेश शासनस्तरावर देण्यात आलेले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने समित्या गठीतअल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना योजनेत प्रतिशेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार इतके आर्थिक सहाय्य तीन टप्प्यात मिळणार आहे. वनहक्क कायद्यानुसार जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबांचाही योजनेत समावेश होणार आहे. ज्या कुटुंबाचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक कमाल धारणा क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या स्थापण्यात आल्या आहेत. तलाठी ग्राम समितीचे प्रमुख आहेत. सध्या या समितीचे काम जोमात सुरू झालेले आहे.मुख्य सचिवांद्वारा दोन वेळा व्हिसीद्वारे आढावाकेंद्राच्या बजेटनंतर तिसऱ्या दिवशी राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी ‘किसान सन्मान’साठी चार फेब्रुवारीला परिपत्रक जारी केले. पाच तारखेला यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, सीईओ व कृषी विभागाचे अधिकाऱ्यांची व्हिसी घेतली. सात तारखेला पुन्हा विभागीय आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांशी व्हिसीद्वारे संवाद साधला. या योजनेसंदर्भात ६ फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक व दुसऱ्याच दिवसी तालुका स्तरावर तहसीलदारांनी बैठकी घेतल्या. एकंदरीत शासनस्तरावर या योजनेविषयी अत्यंत गांभीर्याने घेतल्या जात आहे. आचारसंहितेपूर्वी या महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा केला जाणार आहे.