शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

'आणखी चार नेत्यांचे घोटाळे उघडकीस आणणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 14:41 IST

ठाकरे सरकारच्या नेत्यांचे घोटाळे उघड करण्याची जबाबदारी जनतेनं मला दिली असून, पुढील काही दिवसात त्या चार नेते, मंत्र्यांची चौकशी होईल, असे भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले.

ठळक मुद्देअमरावती दंगलीवर सोमैयांचे राज्य सरकारवर आरोप१२ तारखेची चौकशी का करत नाही?

अमरावतीठाकरे सरकारच्या नेत्यांचे घोटाळे उघड करण्याची जबाबदारी जनतेनं मला दिली असून, पुढील काही दिवसात ठाकरे सरकारमधील चार नेते, मंत्र्यांची चौकशी होईल, असे भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले. ते आज अमरावती दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या १२ महिन्यात या सरकारचे १०० घोटाळे बाहेर आले. त्यातील २४ घोटाळ्यांचा हिशोब दिला आहे. ठाकरे सरकारचे ६ मंत्री, तुरुंगात किंवा जामीनवर आहेत. तर, ३१ डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकारचे ४० घोटाळे जनतेसमोर आणणार आहे. असे म्हणत, पुढच्या काही दिवसात ठाकरे सरकारचे चार मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार असून या मंत्र्यांविरोधातील तक्रारी व कागदपत्रे तपास यंत्रणांना दिल्या असल्याचेही ते म्हणाले. यातील दोन मंत्री शिवसेनेचे, राष्ट्रवादीचा मंत्री असून विदर्भातील कॅबिनेट मंत्र्यांचादेखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटला आहे.

१२ तारखेबाबत मौन का?

१२ नोव्हेंबरला राज्यात तीन-तीन शहरात मुस्लिमांचे मोर्चे निघाले, हिंदुंना टार्गेट करण्यात आले. हे मोर्चे कोणाच्या प्रेरणेने निघाले, याबाबत ठाकरे सरकार का बोलत नाही. १२ तारखेची चौकशी का करत नाही, असे म्हणत हिंदुना घाबरवण्यासाठी असे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला.

राज्यात एकाच दिवशी तीन-तीन ठिकाणी मोठ्या संख्येने मोर्चे निघाले. अमरावतीत आंदोलनकर्त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, आणि त्याचे पडसाद उमटले. हा अत्याचार हिंदूंना घाबरवण्यासाठी करण्यात आल्याचे आरोप सोमैया यांनी केला. सोबतच, मी अमरावतीकरांना वचन दिलं होतं, त्याप्रमाणे अमरावतीत आपण आलो असल्याचेही ते म्हणाले.

एकाच दिवशी तीन ठिकाणी हजारो लोक रस्त्यावर कसे आले?  १२ तारखेच्या घटनेचा तपास का करत नाही? त्या दिवशी निघालेल्या मिरवणूक या कोणाच्या प्रेरणेने निघाल्या? याची चौकशी झाली पाहिजे असे सोमैया म्हणाले. कोणी अफवा पसरवली, त्रिपुरामध्ये मस्जिद कुठे पडली याची चौकशी का केली जात नाही, याचा तपास ठाकरे सरकार का करत नाही? असाही सवाल त्यांनी उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

ठाकरे सरकार अजब सरकार आहे. अमरावतीमध्ये हिंदुंवर हल्ले झाले, त्यांना टार्गेट केलं गेलं. त्यासाठी मी दौरा काढला तर, मला निर्बंध घातले. ९२-९३ मध्ये झालेल्या हल्ल्यांची पुनरावृती होत आहे. हिंदुंवर जर परत असे हल्ले झाले तर त्याची जबाबदारी ठाकरे सरकारची असेल, असेही सोमैया यावेळी म्हणाले.  

टॅग्स :PoliticsराजकारणKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाAmravatiअमरावतीTripuraत्रिपुराMahavikas Aghadiमहाविकास आघाडी