शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

'आणखी चार नेत्यांचे घोटाळे उघडकीस आणणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 14:41 IST

ठाकरे सरकारच्या नेत्यांचे घोटाळे उघड करण्याची जबाबदारी जनतेनं मला दिली असून, पुढील काही दिवसात त्या चार नेते, मंत्र्यांची चौकशी होईल, असे भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले.

ठळक मुद्देअमरावती दंगलीवर सोमैयांचे राज्य सरकारवर आरोप१२ तारखेची चौकशी का करत नाही?

अमरावतीठाकरे सरकारच्या नेत्यांचे घोटाळे उघड करण्याची जबाबदारी जनतेनं मला दिली असून, पुढील काही दिवसात ठाकरे सरकारमधील चार नेते, मंत्र्यांची चौकशी होईल, असे भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले. ते आज अमरावती दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या १२ महिन्यात या सरकारचे १०० घोटाळे बाहेर आले. त्यातील २४ घोटाळ्यांचा हिशोब दिला आहे. ठाकरे सरकारचे ६ मंत्री, तुरुंगात किंवा जामीनवर आहेत. तर, ३१ डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकारचे ४० घोटाळे जनतेसमोर आणणार आहे. असे म्हणत, पुढच्या काही दिवसात ठाकरे सरकारचे चार मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार असून या मंत्र्यांविरोधातील तक्रारी व कागदपत्रे तपास यंत्रणांना दिल्या असल्याचेही ते म्हणाले. यातील दोन मंत्री शिवसेनेचे, राष्ट्रवादीचा मंत्री असून विदर्भातील कॅबिनेट मंत्र्यांचादेखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटला आहे.

१२ तारखेबाबत मौन का?

१२ नोव्हेंबरला राज्यात तीन-तीन शहरात मुस्लिमांचे मोर्चे निघाले, हिंदुंना टार्गेट करण्यात आले. हे मोर्चे कोणाच्या प्रेरणेने निघाले, याबाबत ठाकरे सरकार का बोलत नाही. १२ तारखेची चौकशी का करत नाही, असे म्हणत हिंदुना घाबरवण्यासाठी असे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला.

राज्यात एकाच दिवशी तीन-तीन ठिकाणी मोठ्या संख्येने मोर्चे निघाले. अमरावतीत आंदोलनकर्त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, आणि त्याचे पडसाद उमटले. हा अत्याचार हिंदूंना घाबरवण्यासाठी करण्यात आल्याचे आरोप सोमैया यांनी केला. सोबतच, मी अमरावतीकरांना वचन दिलं होतं, त्याप्रमाणे अमरावतीत आपण आलो असल्याचेही ते म्हणाले.

एकाच दिवशी तीन ठिकाणी हजारो लोक रस्त्यावर कसे आले?  १२ तारखेच्या घटनेचा तपास का करत नाही? त्या दिवशी निघालेल्या मिरवणूक या कोणाच्या प्रेरणेने निघाल्या? याची चौकशी झाली पाहिजे असे सोमैया म्हणाले. कोणी अफवा पसरवली, त्रिपुरामध्ये मस्जिद कुठे पडली याची चौकशी का केली जात नाही, याचा तपास ठाकरे सरकार का करत नाही? असाही सवाल त्यांनी उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

ठाकरे सरकार अजब सरकार आहे. अमरावतीमध्ये हिंदुंवर हल्ले झाले, त्यांना टार्गेट केलं गेलं. त्यासाठी मी दौरा काढला तर, मला निर्बंध घातले. ९२-९३ मध्ये झालेल्या हल्ल्यांची पुनरावृती होत आहे. हिंदुंवर जर परत असे हल्ले झाले तर त्याची जबाबदारी ठाकरे सरकारची असेल, असेही सोमैया यावेळी म्हणाले.  

टॅग्स :PoliticsराजकारणKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाAmravatiअमरावतीTripuraत्रिपुराMahavikas Aghadiमहाविकास आघाडी