शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

'आणखी चार नेत्यांचे घोटाळे उघडकीस आणणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 14:41 IST

ठाकरे सरकारच्या नेत्यांचे घोटाळे उघड करण्याची जबाबदारी जनतेनं मला दिली असून, पुढील काही दिवसात त्या चार नेते, मंत्र्यांची चौकशी होईल, असे भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले.

ठळक मुद्देअमरावती दंगलीवर सोमैयांचे राज्य सरकारवर आरोप१२ तारखेची चौकशी का करत नाही?

अमरावतीठाकरे सरकारच्या नेत्यांचे घोटाळे उघड करण्याची जबाबदारी जनतेनं मला दिली असून, पुढील काही दिवसात ठाकरे सरकारमधील चार नेते, मंत्र्यांची चौकशी होईल, असे भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले. ते आज अमरावती दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या १२ महिन्यात या सरकारचे १०० घोटाळे बाहेर आले. त्यातील २४ घोटाळ्यांचा हिशोब दिला आहे. ठाकरे सरकारचे ६ मंत्री, तुरुंगात किंवा जामीनवर आहेत. तर, ३१ डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकारचे ४० घोटाळे जनतेसमोर आणणार आहे. असे म्हणत, पुढच्या काही दिवसात ठाकरे सरकारचे चार मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार असून या मंत्र्यांविरोधातील तक्रारी व कागदपत्रे तपास यंत्रणांना दिल्या असल्याचेही ते म्हणाले. यातील दोन मंत्री शिवसेनेचे, राष्ट्रवादीचा मंत्री असून विदर्भातील कॅबिनेट मंत्र्यांचादेखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटला आहे.

१२ तारखेबाबत मौन का?

१२ नोव्हेंबरला राज्यात तीन-तीन शहरात मुस्लिमांचे मोर्चे निघाले, हिंदुंना टार्गेट करण्यात आले. हे मोर्चे कोणाच्या प्रेरणेने निघाले, याबाबत ठाकरे सरकार का बोलत नाही. १२ तारखेची चौकशी का करत नाही, असे म्हणत हिंदुना घाबरवण्यासाठी असे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला.

राज्यात एकाच दिवशी तीन-तीन ठिकाणी मोठ्या संख्येने मोर्चे निघाले. अमरावतीत आंदोलनकर्त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, आणि त्याचे पडसाद उमटले. हा अत्याचार हिंदूंना घाबरवण्यासाठी करण्यात आल्याचे आरोप सोमैया यांनी केला. सोबतच, मी अमरावतीकरांना वचन दिलं होतं, त्याप्रमाणे अमरावतीत आपण आलो असल्याचेही ते म्हणाले.

एकाच दिवशी तीन ठिकाणी हजारो लोक रस्त्यावर कसे आले?  १२ तारखेच्या घटनेचा तपास का करत नाही? त्या दिवशी निघालेल्या मिरवणूक या कोणाच्या प्रेरणेने निघाल्या? याची चौकशी झाली पाहिजे असे सोमैया म्हणाले. कोणी अफवा पसरवली, त्रिपुरामध्ये मस्जिद कुठे पडली याची चौकशी का केली जात नाही, याचा तपास ठाकरे सरकार का करत नाही? असाही सवाल त्यांनी उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

ठाकरे सरकार अजब सरकार आहे. अमरावतीमध्ये हिंदुंवर हल्ले झाले, त्यांना टार्गेट केलं गेलं. त्यासाठी मी दौरा काढला तर, मला निर्बंध घातले. ९२-९३ मध्ये झालेल्या हल्ल्यांची पुनरावृती होत आहे. हिंदुंवर जर परत असे हल्ले झाले तर त्याची जबाबदारी ठाकरे सरकारची असेल, असेही सोमैया यावेळी म्हणाले.  

टॅग्स :PoliticsराजकारणKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाAmravatiअमरावतीTripuraत्रिपुराMahavikas Aghadiमहाविकास आघाडी