शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

खरिपातील पिके ‘कोमा’त

By admin | Updated: August 18, 2014 23:14 IST

जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस पडला. परंतु तब्बल २१ दिवस पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाची दीर्घ दडी व अगोदरच उशिरा

जितेंद्र दखणे/अमरावती : जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस पडला. परंतु तब्बल २१ दिवस पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाची दीर्घ दडी व अगोदरच उशिरा पेरण्या झाल्यामुळे पिकांची वाढही खुंटली आहे. परिणामी पिके पूर्णत: कोमेजली आहेत. आधीच उत्पादनात घट येण्याची शक्यता असताना आता पावसाने तब्बल तीन आठवड्यांपासून दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदाचा खरीप हंगामही हातचा जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन बसले आहेत. गेल्या हंगामापासूनच शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा जबर फटका सोसावा लागतोय. यंदा त्यात भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पाऊस लांबला. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून निघाल्या. त्यांच्यावर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. जून महिन्यांत पावसाचा पत्ताच नव्हता. परिणामी उडिद, मूग पिकाचा कालावधी निघून गेला. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातून उडिद, मूगाचे पिक गेले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीनला फटकासोयाबीन हे तेलबिया वर्गातील पीक असल्यामुळे भरपूर पावसाची आवश्यकता असते. त्यातही फुलोराच्या दिवसांत पाऊस गरजेचा आहे. मात्र, ऐन याच कालावधीत पावसाने दडी मारली तर उत्पादन घटते. जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी ही प्रमुख पिके असून सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे.