शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

खरिपातील पिके ‘कोमा’त

By admin | Updated: August 18, 2014 23:14 IST

जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस पडला. परंतु तब्बल २१ दिवस पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाची दीर्घ दडी व अगोदरच उशिरा

जितेंद्र दखणे/अमरावती : जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस पडला. परंतु तब्बल २१ दिवस पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाची दीर्घ दडी व अगोदरच उशिरा पेरण्या झाल्यामुळे पिकांची वाढही खुंटली आहे. परिणामी पिके पूर्णत: कोमेजली आहेत. आधीच उत्पादनात घट येण्याची शक्यता असताना आता पावसाने तब्बल तीन आठवड्यांपासून दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदाचा खरीप हंगामही हातचा जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन बसले आहेत. गेल्या हंगामापासूनच शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा जबर फटका सोसावा लागतोय. यंदा त्यात भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पाऊस लांबला. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून निघाल्या. त्यांच्यावर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. जून महिन्यांत पावसाचा पत्ताच नव्हता. परिणामी उडिद, मूग पिकाचा कालावधी निघून गेला. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातून उडिद, मूगाचे पिक गेले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीनला फटकासोयाबीन हे तेलबिया वर्गातील पीक असल्यामुळे भरपूर पावसाची आवश्यकता असते. त्यातही फुलोराच्या दिवसांत पाऊस गरजेचा आहे. मात्र, ऐन याच कालावधीत पावसाने दडी मारली तर उत्पादन घटते. जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी ही प्रमुख पिके असून सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे.