शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

८३ हजार शेतकऱ्यांचा खरीप पीक विमा

By admin | Updated: September 23, 2015 00:29 IST

नैसर्गिक आपत्तीपासून शेती पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी खरीप हंगामासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात आली.

८० हजार हेक्टरला संरक्षण : शेतकऱ्यांनी भरले साडेतीन कोटीची रक्कमअमरावती : नैसर्गिक आपत्तीपासून शेती पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी खरीप हंगामासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात आली. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांव्यतिरिक्त जिल्हा सहकारी बँकेत ८२ हजार ९१५ शेतकऱ्यांनी ७९ हजार ७११ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी ३ कोटी ५६ लाख ६३ हजार ७०४ रूपये रकमेचा भरणा केला आहे. शासनाने ३ कोटी ३९ लाख ३ हजार ६०० रुपयांचे अनुदान दिले आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैयक्तिक स्तरावर निश्चित करण्यासाठी राज्यातील सर्व अधिसूचित पिकासाठी खरीप २०१५ हंगामात अधिसूचित पिकासाठी पीक विमा लागू करण्यात आला आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे भारतीय कृषी विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत सहभाग घेतला आहे, त्या संबंधित वित्तीय कंपनीस किंवा भारतीय कृषी विमा कंपनीस कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून ४८ तासांत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीने जिल्हा महसूल तसेच कृषी विभागाच्या मदतीने नुकसान भरपाईचे प्रमाण निश्चित करण्यास येणार आहे या योजनेची अंतिम तारीख ३० जून २०१५ ही होती त्यानंतर शासनाने योजनेला ८ दिवसांची मुदतवाढ दिलेली होती. या योजनेत जिल्ह्यातील ४५ हजार ७६३ शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेत ५० हजार ७५० हेक्टर सोयाबीन क्षेत्रासाठी विमा काढला आहे. विम्याची संरक्षित रक्कम ९२ कोटी ७ लाख ३१ हजार ४०५ रूपये एवढी आहे. १५ हजार ४६८ शेतकऱ्यांनी तूर, ७ हजार ३५६ शेतकऱ्यांनी कापूस, १ हजार १४८ शेतकऱ्यांनी ज्वारी, ११ हजार ९८३ शेतकऱ्यांनी मूग, ११४ शेतकऱ्यांनी भात, २५ शेतकऱ्यांनी तीळ व १ हजार ५६ शेतकऱ्यांनी उडीद पिकासाठी विमा काढलेला आहे. (प्रतिनिधी)