शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
6
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
7
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
8
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
9
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
10
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
11
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
12
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
13
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
14
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
15
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
16
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
17
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
18
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
19
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
20
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत

८३ हजार शेतकऱ्यांचा खरीप पीक विमा

By admin | Updated: September 23, 2015 00:29 IST

नैसर्गिक आपत्तीपासून शेती पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी खरीप हंगामासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात आली.

८० हजार हेक्टरला संरक्षण : शेतकऱ्यांनी भरले साडेतीन कोटीची रक्कमअमरावती : नैसर्गिक आपत्तीपासून शेती पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी खरीप हंगामासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात आली. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांव्यतिरिक्त जिल्हा सहकारी बँकेत ८२ हजार ९१५ शेतकऱ्यांनी ७९ हजार ७११ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी ३ कोटी ५६ लाख ६३ हजार ७०४ रूपये रकमेचा भरणा केला आहे. शासनाने ३ कोटी ३९ लाख ३ हजार ६०० रुपयांचे अनुदान दिले आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैयक्तिक स्तरावर निश्चित करण्यासाठी राज्यातील सर्व अधिसूचित पिकासाठी खरीप २०१५ हंगामात अधिसूचित पिकासाठी पीक विमा लागू करण्यात आला आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे भारतीय कृषी विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत सहभाग घेतला आहे, त्या संबंधित वित्तीय कंपनीस किंवा भारतीय कृषी विमा कंपनीस कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून ४८ तासांत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीने जिल्हा महसूल तसेच कृषी विभागाच्या मदतीने नुकसान भरपाईचे प्रमाण निश्चित करण्यास येणार आहे या योजनेची अंतिम तारीख ३० जून २०१५ ही होती त्यानंतर शासनाने योजनेला ८ दिवसांची मुदतवाढ दिलेली होती. या योजनेत जिल्ह्यातील ४५ हजार ७६३ शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेत ५० हजार ७५० हेक्टर सोयाबीन क्षेत्रासाठी विमा काढला आहे. विम्याची संरक्षित रक्कम ९२ कोटी ७ लाख ३१ हजार ४०५ रूपये एवढी आहे. १५ हजार ४६८ शेतकऱ्यांनी तूर, ७ हजार ३५६ शेतकऱ्यांनी कापूस, १ हजार १४८ शेतकऱ्यांनी ज्वारी, ११ हजार ९८३ शेतकऱ्यांनी मूग, ११४ शेतकऱ्यांनी भात, २५ शेतकऱ्यांनी तीळ व १ हजार ५६ शेतकऱ्यांनी उडीद पिकासाठी विमा काढलेला आहे. (प्रतिनिधी)