अचलपुरात वाढते अतिक्रमण : प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्तसुनील देशपांडे अचलपूरअचलपूर-परतवाडा शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. रस्त्यावरील दुकानांचे अतिक्रमण कायम असून शासकीय जागेत कित्येकांनी भव्य इमारती उभारल्या आहेत. अतिक्रमित जागेची खरेदी-विक्रीही आपसात केली जात आहे. पालकमंत्र्यांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश देऊनसुद्धा नझूल विभाग, महसूल,बांधकाम विभाग व पालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे कार्यक्रमानिमित्त ज्या ज्या वेळी परतवाड्यात आले त्यावेळी त्यांचेसमोर जुळ्या शहरातील अतिक्रमणाचा विषय आला त्यांनीही बऱ्याच बैठका अतिक्रमण हटविण्याचे ठोसपणे सांगितले व संबंधित अधिकाऱ्यांना आदेशही दिले होते. गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी शहरात झालेल्या एका कार्यक्रमात अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या. प्रशासन या सूचना गांभिर्याने घेत असल्याने जनतेत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. जुळ्या शहरातील मुख्य रस्त्यांसह सर्वत्र अतिक्रमणाचा विळखा पडल्याने विकासाला खिळ बसली आहे. हे वाढते अतिक्रमण काढण्याचे अनेकदा प्रयत्न झाले कारवाईला सुरुवातही झाली. परंतु दुसऱ्याच दिवशी ती बंद पडली आता तर सुरूवातही झालेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या अतिक्रमण हटाव आदेशाला संबंधित अधिकारी जुमानत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे.परतवाड्यात मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी पक्के बांधकाम केले आहे तर गुजरीबाजार लोटगाड्यांच्या विळख्यात आहे तर सदर बाजारातील काही दुकानदार दुकानातील माल रस्त्यापर्यंत आणून ठेवत आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना आपली वाहने रस्त्यातच उभी करावी लागतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून पादचाऱ्यालाही रस्त्यावरून चालणे कठीण होत आहे. शहर विकासाला अतिक्रमण फार मोठा अडसर आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
By admin | Updated: September 21, 2015 00:04 IST