शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आगारात अस्वच्छतेचा कहर !

By admin | Updated: September 5, 2016 00:26 IST

येथील मध्यवर्ती बस आगारात अस्वच्छेतेने कहरच केला आहे. यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आगरप्रमुखांचे दुर्लक्ष : प्रवाशांच्या जीवाशी खेळ संदीप मानकर अमरावतीयेथील मध्यवर्ती बस आगारात अस्वच्छेतेने कहरच केला आहे. यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे नेहमीत स्वच्छता करण्यात येत नसल्यामुळे व्हॉयरल आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावती आगारात एकूण ७० च्यावर बसेस धावतात. त्यांच्या दिवसभर अंदाजे येथून ४०० पेक्षा अधिक फेऱ्या होतात. तसेच इतर आगाराच्याही हजारो बसफेऱ्या येथून होतात. त्यामुळे नागरिक खाद्यपदार्थ खाल्यानंतर यथेच्छ घाण करतात. अनेक नागरिक आपल्याजवळील प्लॅस्टिकच्या वस्तूसुद्धा येथेच टाकून देतात. त्यामुळे आगारात सर्वत्र घाण साचते. लहान मुले फळे खातात. केळीची सालसुध्दा येथेच टाकून देतात. गुटखा बहादूरही येथेच खर्रा, पानाच्या पिचकाऱ्या भिंतीवर व परिसरात मारतात. त्यामुळे सर्वत्र घाण होते. येथे कंत्राटी सफाई कामगार नेमण्यात आले आहे. पण ते नियमित स्वच्छता राहत नसल्याने ही परिस्थती निर्माण झाली आहे. अधिकारी झोपेत ? येथील मध्यवर्ती आगार परिसरात अस्वच्छतेचा कहर असतानाही कुणालाही घेणेदेणे नाही. येथे कचरा कचरा पेटीसुध्दा नाही. नागरिकांनाही स्वच्छेतेचे भान नसते. वाटेल तसे ते वागतात. परिणामी त्यांच्याही जीविताला धोका निर्माण होतो. लहान मुलेही प्रवास करतात. त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना लवकरच आजार जडण्याची शक्यता असते. मात्र एकीकडे देशात भारत स्वच्छता अभियान राबविले जात असताना अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय धोरणामुळे येथे अस्वच्छेतेचे साम्राज्य वाढत आहे. अधिकारी झोपेत तर नाही ना, असा प्रश्नही नागरिकांच्यावतीने विचारला जात आहे.आडोशाला जाऊन लघुशंकायेथे अधिकृत प्रसाधनगृह आहे. पण या प्रसाधनगृहातही प्रचंड घाण असते. त्यामुळे अनेक नागरिका येथे न जाता. ज्या ठिकाणी आगाराच्या भिंतीजवळ बसेस उभ्या राहतात. य ाठिकाणी अळोशाला जाऊन राजोरोसपणे लघुशंका करतात. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरते. यातूनच अनेक आजाराला आमंत्रण मिळते. या प्रकाराला आगार व्यवस्थापकाने आळा घालावा, अशी मागणी होत आहे.आगारात शिरतात दुचाकी आधी सुरक्षितेच्या दुष्टीकोणातून आगार परिसरात खासगी नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांना बंदी करण्यात आली होती. या ठिकाणी सुरक्षा रक्षकही लावण्यात आले होते. परंतू काही दिवसातच हा नियम स्थिील करण्यात आला आहे. य ा ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या डोळयादेखत नागरिक राजोरसपणे आपली वाहने या ठिकाणी परिसरात फिरवितात. येथे पोलिस चौक ी असतानाही कुठल्याच वाहन चालकांविरुध्द कारवाई होताना दिसत नाही.