शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

जनआरोग्य योजनेचे कार्ड 'ईएसआयसी'मध्येही चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:04 IST

सार्वजनिक आरोग्यसेवेचा होणार विस्तार; अनेकांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ७ एप्रिल रोजी राज्यातील कामगार विमा योजना (ईएसआयसी) अंतर्गत कार्यरत रुग्णालयांमध्ये महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता केवळ नोकरी करणाऱ्या कामगारांपुरतीच मर्यादित असलेली ईएसआयसी रुग्णालये सर्वसामान्य गरीब जनतेसाठीदेखील खुली झाली आहेत.

नव्या व्यवस्थेमुळे जनआरोग्य योजनेच्या कार्डधारकांना १३५६ प्रकारच्या गंभीर आजारांवर मोफत उपचार, शस्त्रक्रिया व औषधोपचार मिळणार आहेत. प्रारंभी काही ईएसआयसी रुग्णालयात स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यानंतर सर्वांनाच ही सुविधा मिळणार असल्याची माहिती आहे. 

प्रारंभी स्त्री रुग्णांना प्राधान्यया योजनेंतर्गत प्रारंभिक टप्प्यात स्त्री रुग्णांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने अन्य रुग्णांनाही आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य कार्ड आवश्यकमहात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा कार्ड हे योजनेचा घेण्यासाठी आवश्यक आहे. या योजनेंतर्गत, वैध रेशन कार्ड, (पिवळे, केसरी, अंत्योदय, अन्नपूर्णा) आणि छायाचित्रासह ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना) असणे आवश्यक आहे.

१३५६ आजारांवर मोफत उपचारराज्य शासनाच्या या निर्णयामुळे आरोग्य सुविधा आता अधिक सुलभ आणि सामर्थ्यवान होणार आहेत. गंभीर आजारांवर मोफत उपचारांसह हृदयविकार, कॅन्सर, मेंदुविकार, डायलिसिस, सर्जरी, प्रसूती, शस्त्रक्रियादेखील करून घेता येणार आहेत. त्यामुळे उपेक्षित घटकाला मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये १ हजार ३५६ आजारांवर या योजनेंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत. 

गरिबांचा वेळ, पैसा वाचणारखासगी रुग्णालयांपेक्षा कमी गर्दी, अधिक सुविधा आणि दर्जेदार आरोग्यसेवा गोरगरिबांना थेट मिळणार आहेत. यामुळे गोरगरीब रुग्णांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे

जागतिक आरोग्य दिनी घोषणाजागतिक आरोग्य दिनानिमित्त ७ एप्रिल रोजी शासनातर्फे ही योजना राबविण्याबाबची घोषणा करण्यात आली आहे.

कामगार रुग्णालय आता सर्वांसाठी खुलेकर्मचारी राज्य विमा निगमच्या वैद्यकीय लाभ परिषदेने या योजनेत सहभागी होण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कामगार विमा रुग्णालय सर्वच घटकांना सेवा पुरविणार आहेत. दरवर्षी पात्र कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा सेवा हे उद्दिष्ट आहे.

"एकीकृत आयुष्मान, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतून राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे असंख्य गरीब घटकांना आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत."- डॉ. अंकिता मटाले, जिल्हा समन्वयक

टॅग्स :AmravatiअमरावतीHealthआरोग्य