शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

जनआरोग्य योजनेचे कार्ड 'ईएसआयसी'मध्येही चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:04 IST

सार्वजनिक आरोग्यसेवेचा होणार विस्तार; अनेकांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ७ एप्रिल रोजी राज्यातील कामगार विमा योजना (ईएसआयसी) अंतर्गत कार्यरत रुग्णालयांमध्ये महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता केवळ नोकरी करणाऱ्या कामगारांपुरतीच मर्यादित असलेली ईएसआयसी रुग्णालये सर्वसामान्य गरीब जनतेसाठीदेखील खुली झाली आहेत.

नव्या व्यवस्थेमुळे जनआरोग्य योजनेच्या कार्डधारकांना १३५६ प्रकारच्या गंभीर आजारांवर मोफत उपचार, शस्त्रक्रिया व औषधोपचार मिळणार आहेत. प्रारंभी काही ईएसआयसी रुग्णालयात स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यानंतर सर्वांनाच ही सुविधा मिळणार असल्याची माहिती आहे. 

प्रारंभी स्त्री रुग्णांना प्राधान्यया योजनेंतर्गत प्रारंभिक टप्प्यात स्त्री रुग्णांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने अन्य रुग्णांनाही आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य कार्ड आवश्यकमहात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा कार्ड हे योजनेचा घेण्यासाठी आवश्यक आहे. या योजनेंतर्गत, वैध रेशन कार्ड, (पिवळे, केसरी, अंत्योदय, अन्नपूर्णा) आणि छायाचित्रासह ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना) असणे आवश्यक आहे.

१३५६ आजारांवर मोफत उपचारराज्य शासनाच्या या निर्णयामुळे आरोग्य सुविधा आता अधिक सुलभ आणि सामर्थ्यवान होणार आहेत. गंभीर आजारांवर मोफत उपचारांसह हृदयविकार, कॅन्सर, मेंदुविकार, डायलिसिस, सर्जरी, प्रसूती, शस्त्रक्रियादेखील करून घेता येणार आहेत. त्यामुळे उपेक्षित घटकाला मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये १ हजार ३५६ आजारांवर या योजनेंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत. 

गरिबांचा वेळ, पैसा वाचणारखासगी रुग्णालयांपेक्षा कमी गर्दी, अधिक सुविधा आणि दर्जेदार आरोग्यसेवा गोरगरिबांना थेट मिळणार आहेत. यामुळे गोरगरीब रुग्णांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे

जागतिक आरोग्य दिनी घोषणाजागतिक आरोग्य दिनानिमित्त ७ एप्रिल रोजी शासनातर्फे ही योजना राबविण्याबाबची घोषणा करण्यात आली आहे.

कामगार रुग्णालय आता सर्वांसाठी खुलेकर्मचारी राज्य विमा निगमच्या वैद्यकीय लाभ परिषदेने या योजनेत सहभागी होण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कामगार विमा रुग्णालय सर्वच घटकांना सेवा पुरविणार आहेत. दरवर्षी पात्र कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा सेवा हे उद्दिष्ट आहे.

"एकीकृत आयुष्मान, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतून राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे असंख्य गरीब घटकांना आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत."- डॉ. अंकिता मटाले, जिल्हा समन्वयक

टॅग्स :AmravatiअमरावतीHealthआरोग्य