शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

गणोजा देवी येथील पूरग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन, दोन तास वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 14:48 IST

पेढी नदीवर पूल व रस्त्यासह विविध मागण्यांसाठी गणोजा देवी येथील लोकांनी जलसमाधी आंदोलन केले. यामुळे भातकुली-अमरावती रस्ता दोन तास ठप्प होता. आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्दे३०० जणांचा सहभाग, जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनंतर आंदोलन मागे

अमरावती : भातकुली तालुक्यातील गणोजा देवी येथील पुलासह विविध मागण्यांसाठी पूरग्रस्तांनी पेढी नदीच्या पात्रात बुधवारी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. मात्र, पोलीस प्रशासनाने मोर्चा अडविल्याने मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या देऊन आंदोलन सुरू केले. यामुळे भातकुली-अमरावती रस्ता दोन तास ठप्प होता. आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गणोजा येथे पेढी नदीच्या पलीकडील काठावर सुमारे पन्नास वर्षांपासून ३०० लोकांची वस्ती आहे. या वस्तीतील लोकांना पावसाळ्यात पूर आल्यास दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पेढी नदीवर पूल व रस्त्यासह विविध मागण्यांसाठी युवा लायन्सच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी ११ वाजता जलसमाधी आंदोलनासाठी हे आंदोलनकर्ते सज्ज झाले होते. बसस्थानक चौकातून निघालेला मोर्चा पोलिसांनी पेढी नदीच्या पुलाच्या अलीकडेच अडवला. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देऊन आंदोलन केले. यावेळी तणाव निर्माण झाला होता.

वाहतुकीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. अखेर उपविभागीय अधिकारी विजय व्यवहारे, तहसीलदार नीता लबडे, सहायक पोलीस आयुक्त गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून समस्यांबाबत शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासन सज्ज

पोलीस बंदोबस्तगणोजा येथील सुमारे तीनशे पुरग्रस्त जलसमाधी आंदोलनात सहभागी होणार असल्याने सकाळीच अमरावती येथून रेस्क्यू ऑपरेशन टीम सर्व साहित्यानिशी पेढी नदीच्या काठावर सज्ज झाली होती. पूरग्रस्तांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता. पोलिसांनी आंदोलकांचा मोर्चा अडविल्याने शांततेत आंदोलन पार पडले.

सुमारे दोन तास वाहतूक ठप्प

पुरग्रस्तांचे जलसमाधी आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाने भातकुली ते अमरावती राज्य मार्गावर पेढी नदीच्या पुलाजवळ दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावले होते. सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :agitationआंदोलनfloodपूर