शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

गणोजा देवी येथील पूरग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन, दोन तास वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 14:48 IST

पेढी नदीवर पूल व रस्त्यासह विविध मागण्यांसाठी गणोजा देवी येथील लोकांनी जलसमाधी आंदोलन केले. यामुळे भातकुली-अमरावती रस्ता दोन तास ठप्प होता. आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्दे३०० जणांचा सहभाग, जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनंतर आंदोलन मागे

अमरावती : भातकुली तालुक्यातील गणोजा देवी येथील पुलासह विविध मागण्यांसाठी पूरग्रस्तांनी पेढी नदीच्या पात्रात बुधवारी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. मात्र, पोलीस प्रशासनाने मोर्चा अडविल्याने मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या देऊन आंदोलन सुरू केले. यामुळे भातकुली-अमरावती रस्ता दोन तास ठप्प होता. आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गणोजा येथे पेढी नदीच्या पलीकडील काठावर सुमारे पन्नास वर्षांपासून ३०० लोकांची वस्ती आहे. या वस्तीतील लोकांना पावसाळ्यात पूर आल्यास दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पेढी नदीवर पूल व रस्त्यासह विविध मागण्यांसाठी युवा लायन्सच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी ११ वाजता जलसमाधी आंदोलनासाठी हे आंदोलनकर्ते सज्ज झाले होते. बसस्थानक चौकातून निघालेला मोर्चा पोलिसांनी पेढी नदीच्या पुलाच्या अलीकडेच अडवला. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देऊन आंदोलन केले. यावेळी तणाव निर्माण झाला होता.

वाहतुकीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. अखेर उपविभागीय अधिकारी विजय व्यवहारे, तहसीलदार नीता लबडे, सहायक पोलीस आयुक्त गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून समस्यांबाबत शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासन सज्ज

पोलीस बंदोबस्तगणोजा येथील सुमारे तीनशे पुरग्रस्त जलसमाधी आंदोलनात सहभागी होणार असल्याने सकाळीच अमरावती येथून रेस्क्यू ऑपरेशन टीम सर्व साहित्यानिशी पेढी नदीच्या काठावर सज्ज झाली होती. पूरग्रस्तांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता. पोलिसांनी आंदोलकांचा मोर्चा अडविल्याने शांततेत आंदोलन पार पडले.

सुमारे दोन तास वाहतूक ठप्प

पुरग्रस्तांचे जलसमाधी आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाने भातकुली ते अमरावती राज्य मार्गावर पेढी नदीच्या पुलाजवळ दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावले होते. सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :agitationआंदोलनfloodपूर