शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बंद रेल्वे फाटकाखालून दुचाकी काढणे गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 05:00 IST

नागपूर-मुबंई या मध्य रेल्वे मार्गावर पुलगाव ते बडनेरा अशा ७० किमीवर अंतरावर चिंचोली, धामणगाव, दीपोरी, चांदूररेल्वे, मालखेड, टिमटाळा असे सहा रेल्वे फाटक येतात. दत्तापूर-धामणगाव हे जुळे शहर दोन भागात विभागल्याने सायकलधारक असो की दुचाकीचालक वा पादचारी, समोर रेल्वे गाडी येत असताना फाटक ओलांडण्याची शर्यत लागलेली असते. हीच स्थिती  चांदूर रेल्वे, चिंचोली रेल्वे फाटकाची आहे

मोहन राऊतलोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : बंद रेल्वे फाटकाखालून दुचाकी, सायकल काढणे व पादचारी यापुढे जात असेल तर गुन्हा दाखल होणार आहे. सहा महिन्यात अशा १०७ कारवाया झाल्या. ७० किमीच्या अंतरात असलेल्या  सहा रेल्वे फाटकांनजीक चार वर्षांत पाच लोकांचा जीव गेला आहे. नागपूर-मुबंई या मध्य रेल्वे मार्गावर पुलगाव ते बडनेरा अशा ७० किमीवर अंतरावर चिंचोली, धामणगाव, दीपोरी, चांदूररेल्वे, मालखेड, टिमटाळा असे सहा रेल्वे फाटक येतात. दत्तापूर-धामणगाव हे जुळे शहर दोन भागात विभागल्याने सायकलधारक असो की दुचाकीचालक वा पादचारी, समोर रेल्वे गाडी येत असताना फाटक ओलांडण्याची शर्यत लागलेली असते. हीच स्थिती  चांदूर रेल्वे, चिंचोली रेल्वे फाटकाची आहे

दुचाकी होऊ शकते जप्तदुचाकी रेल्वे फाटकाच्या खाली तथा जवळ उभी केली वा रेल्वे फाटक ओलांडताना रेल्वे पोलिसांच्या लक्षात आले, तर रेल्वे अधिनियम १५९ आणि १४७ नुसार कारवाई करण्यात येते. अशा वेळी आपली दुचाकी जप्त होऊ शकणार आहे.

१०७ जणांवर कारवाई रेल्वे फाटक बंद असताना खालून जाण्यास अनेकांची चढाओढ असते. रेल्वे पोलिसांनी अशा लोकांवर बारीक लक्ष ठेवत आतापर्यंत १०७ जणांवर कारवाई केली आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत आहे. 

आतापर्यंत पाच जणांचा गेला बळीनागपूर-मुंबई या मध्य रेल्वे मार्गावर दर पाऊण ते एक तासात दोन ते तीन प्रवासी तथा मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे संबंधित सहा रेल्वे फाटक किमान आठ ते दहा मिनिटे बंद असतात. एखाद्या पानठेल्यावर दहा मिनिटे फालतू वेळ घालविणाऱ्यांना रेल्वे फाटक कमी वेळेसाठीही होऊ द्यायचे नसते. लगेच दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी अतिघाई करतात. पायी, सायकलने रेल्वे फाटक ओलांडताना  मागील चार वर्षात पाच जणांचा बळी या सहा रेल्वे फाटकांनी घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

रेल्वे फाटक बंद असताना दुचाकीधारक तथा पादचारी यांच्याकडून रेल्वे फाटक ओलांडणे धोकादायक तथा कायद्याने गुन्हा आहे. यात आपला जीव जाऊ शकतो. त्यामुळे कोणीही रेल्वे फाटक बंद असताना क्रॉस करू नये.  - सी.एल. कनोजिया, निरीक्षक, आरपीएफ रेल्वे स्थानक, धामणगाव रेल्वे

 

टॅग्स :railwayरेल्वे