शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा मुद्दा कुपोषणावर भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

पूर्णा ते अकोला आणि अकोला ते अकोट या नॅरोमीटर गेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाले असून, त्यावर पूर्ण भार असणारी रेल्वे लाईन तपासणीसुद्धा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच करून घेतली आहे. परंतु आकोट ते खंडवा दरम्यानची रेल्वेलाईन व्याघ्र प्रकल्पाच्या ३५ किलोमीटर जंगलामुळे आणि त्यातही ते २३ किलोमीटर अति संरक्षित जंगलाच्या आत गेल्याने वादात अडकली आहे.

ठळक मुद्देअकोट-खंडवा रेल्वे वादात : रेल्वेलाईनचा भाग शिवसेनेचा गड

श्यामकांत पाण्डेय ।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाटात सध्या पावसाळ्याच्या दिवसांत रेल्वे लाईनचा प्रश्न अन्य सर्व मुद्यांना झाकोळणारा ठरला आहे. मेळघाटात कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यू आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था यासारखे महत्त्वाचे मुद्दे सध्या बाजूला सारले गेले आहेत. अकोट ते खंडवा जाणारी ब्रॉडगेज रेल्वे वाहतूक मार्ग हा एकमेव विषय राजकारणात पुढे असल्याचे चित्र आहे.अकोला ते खंडवा मीटर गेज लाईन चार वर्षांपासून ब्रॉड गेजच्या विस्तारीकरणासाठी प्रलंबित आहे. पूर्णा ते अकोला आणि अकोला ते अकोट या नॅरोमीटर गेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाले असून, त्यावर पूर्ण भार असणारी रेल्वे लाईन तपासणीसुद्धा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच करून घेतली आहे. परंतु आकोट ते खंडवा दरम्यानची रेल्वेलाईन व्याघ्र प्रकल्पाच्या ३५ किलोमीटर जंगलामुळे आणि त्यातही ते २३ किलोमीटर अति संरक्षित जंगलाच्या आत गेल्याने वादात अडकली आहे. नेमक्या या भागातून विस्तारित मोठी रेल्वे लाईन हिवरखेड जामोदमार्गे परिवर्तीत करण्याचे प्रस्तावित आहे. हिवरखेड ते तुकाईथड हा मार्ग परिवर्तीत मार्गावर गेल्यास मेळघाटातील जनता रेल्वे लाईनपासून आणि त्याच्या सुविधेपासून पूर्णपणे वंचित राहणार आहे. त्यामुळे पूर्ववत टाकण्यात आलेल्या मीटरगेजचे रुपांतरण ब्रॉडगेजमध्ये करण्यात यावे, याकरिता मेळघाटवासीयांची जनजागृती तत्कालीन भाजपा तालुकाध्यक्ष आप्पा पाटील यांनी केली. त्यानंतर या प्रकरणात माजी आमदार प्रभूदास भिलावेकर आणि माजी उपायुक्त रमेश मावस्कर यांनी उडी घेतली. सर्वांचे दौरे प्रभावित रेल्वेमार्गावरील गावांच्या नागरिकांशी संवाद साधण्यात व्यस्त आहेत. मात्र त्यात राजकारणही शिरले आहे. त्यात शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसुळ यांनी उडी घेतली आहे.सर्व गावे राणीगाव सर्कलमध्येज्या भागातून जुनी लाईन जात होती, त्या मार्गावरील सर्व गावे ही राणीगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये येतात. राणीगाव सर्कलमध्ये राण्ीगाव आणि सावलीखेडा असे दोन पंचायत समिती मतदारसंघात येतात. या दोन्ही पंचायत समिती तसेच राणीगाव जिल्हा परिषद सर्कलवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे गेंदालाल मावस्कर आणि त्यांच्यानंतर सुधीर सूर्यवंशी यांनी प्रतिनिधित्व केले. हा गण आता ओबीसी वर्गाकरिता राखीव असणार असल्यामुळे यावर अनेकांचा डोळा लागलेला आहे. त्यामुळेही राजकारणाने वेग घेतला आहे.माजी खासदारांचे फेसबुक लाईव्हजिल्ह्याचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर अकोट खंडवा रेल्वे लाईनबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मेळघाटवासीयांना रेल्वे सुविधांपासून वंचित ठेवणार नाही आणि प्रस्तावित ब्रॉडगेज मेळघाटातूनच जाईल, असा निर्धार बोलून दाखविला. त्यामुळे माजी खासदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यात परस्परविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की आनंदराव अडसूळ शिवसेनेची नेमकी भूमिका काय, असा नवा वादसुद्धा निर्माण झालेला आहे. या सर्व प्रकरणात पुढे काय घडते, याकडे त्यांचे लक्ष लागले आहेत.म्हणून आला प्रस्तावव्याघ्रप्रकल्पातील अति संरक्षित जंगलामुळे वाघांचे व वन्य प्राण्यांचे वास्तव्यात धोका निर्माण होईल या उद्देशाने गैर शासकीय संघटनेमार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे मेळघाटातून जाणाºया रेल्वे लाईनचे काम तूर्तास थांबविण्यात आले. जळगाव जामोद वरून परिवर्तित रेल्वेमार्गाचा नवीन प्रस्ताव आहे. या प्रस्तावामुळे मेळघाट वासियांना रेल्वेपासून वंचित राहावे लागणार आहेआघाडी सरकारविरुद्ध रोषजंगल संवर्धनाला महत्त्व देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच हिवरखेड ते खंडवा हे मार्ग जंगल वगळता परिवर्तीत मार्गावरुन जाण्यास मान्यता दिली. तेव्हापासून मेळघाटातील जनतेत आघाडी सरकारविरुद्ध असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे