शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

तुम्ही पिता ते पाणी शुद्ध आहे काय? जिल्ह्यात ५९८ ठिकाणी दुषित पाणी

By जितेंद्र दखने | Updated: April 9, 2024 22:17 IST

जिल्हा परिषद : पाणी नमून्याची केली तपासणी

अमरावती:जिल्ह्यात पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करून देण्यात जलस्त्रोतातील पाणी नमून्याची तपासणी केली जाते. गत एप्रित ते फेब्रुवारी या दरम्यान जिल्हाभरातील १५२३ गावांतील १९ हजार १२४ पाणी नमूने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ५९८ पाणी नमूने दूषित आढळून आले आहेत. त्यामुळे जलस्त्राेताचे पाणी शुध्द करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतीकडून तातडीने उपाययोजना केल्या जात आहे.

प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात १६८७ गावे,८३९ ग्रामपंचायतीमध्ये आहेत.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत १५२३ गावातील पाणी नमूने घेण्यात आले होते. या पाणी नमून्याची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात आली. एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या दरम्यान जिल्ह्यातील १९ हजार १२४ पाणी नमूने तपासणीसाठी घेतले होते.पाणी नमूने तपासणीत ५९८ ठिकाणचे पाणी नमूने दुषित आढळून आले आहेत. जलस्त्रोतांचे पाणी पिण्या योग्य नसल्यामुळे या जलस्त्रोतातील पाणी शुध्दीकरण करणासाठीची प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश पाणी नमूने तपासणीचा अहवाल येताच जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पंचायत समिती मार्फत संबंधित ग्रामपंचायींना दिलेत.

तालुकानिहाय दुषित पाणी नमूने संख्याअमरावती ७६,अंजनगाव सुर्जी १४,अचलपुर १३,चांदुर रेल्वे १५,धामणगाव रेल्वे ७८,चांदुर बाजार १२,तिवसा ८०,दर्यापुर ०५,नांदगाव खंडेश्वर १९,वरुड़ ५५,माेर्शी १०६,भातकुली ५०,चिखलदरा ६९,धारणी ०६एकूण ५९८दर्यापूर तालुक्यात सर्वात कमी पाणी नमूने दुषितजिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील २१२४ जलस्त्रोतातील पाणी नमूने घेण्यात आले होते. यापैकी १०६ पाणी नमूने दुषित आढळून आले आहेत. तर दर्यापूर तालुक्यात ६६९ पाणी नमूने तपासणीसाठी घेतले होते.यापैकी केवळ ५ ठिकाणचे पाणी नमूने दुषित आढळून आलेत.जिल्ह्यात या ठिकाणी तपासणीत सर्वाधिक कमी पाणी नमूने दुषित आढळून आले आहेत. तर धारणी तालुक्यात २१९२ पाणी नमूने तपासणीकरीता घेतले होते. यापैकी ६ ठिकाणीच पाणी नमूने दुषित असल्यात तपासणीत आढळून आले.

टॅग्स :Waterपाणीwater pollutionजल प्रदूषणAmravatiअमरावती