शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दहा कोटी वृक्ष लागवडीत रेशीम विभागाला प्राधान्य दिल्याने वनविभागच 'साइड ट्रॅक'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:57 IST

Amravati : जिवंत झाडे तेवढी ऑनलाइन, हजारो मृत रोपांचे खड्डेही उरले नाहीत

गणेश वासनिक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामात राज्यात १० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र, यातील चार कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य रेशीम विभागाला दिले असून पारंपरिकपणे वृक्षलागवडीशी संबंधित असलेल्या वन विभागाला 'साईड ट्रॅक' करण्यात आले आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यात ३३ टक्के वृक्ष आच्छादन गाठण्यासाठी किमान १५ वर्षांचा कालावधी लागू शकतो. राष्ट्रीय वनधोरणानुसार राज्यात किमान ३३ टक्के भूभाग वृक्ष आच्छादित असणे आवश्यक आहे. मात्र महाराष्ट्रातील सध्याचे वनक्षेत्र केवळ २१.२५ टक्के असून, हे चित्र आंतरराष्ट्रीय पातळीवर समाधानकारक मानले जात नाही. गत तीन वर्षापासून अभिसरण योजनेमुळे वृक्ष लागवड ही हजारोंच्या आत सीमित झाली आहे. वनक्षेत्र वाढविण्यात वन विभाग कमालीचा माघारला आहे. ग्रामपंचायत स्तरावर लागवड करण्यात आलेल्या हजारो रोपांपैकी मोठ्या प्रमाणात रोपे मृतप्राय झाली आहेत. जिवंत रोपांचा आकडा केवळ ऑनलाईन दिसत आहे. याचे मूल्यांकन होणे तेवढेच गरज व्यक्त केली जात आहे.

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्रमहसूल व वन विभागाने ११ जून रोजी काढलेल्या 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' या अभियानांतर्गत यंदाच्या पावसाळ्यात १० कोटी वृक्ष लागवड राबविण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यानुसार उद्दिष्टाप्रमाणे वृक्ष लागवड करावी लागणार आहे. अद्यापपर्यंत कुठेही खड्डे खोदले नाही. त्यामुळे रोपे केव्हा लावणार हा सवाल आहे. गेल्या १० वर्षात केवळ ३.२५ टक्के वृक्ष आच्छादन वाढले, ही बाब अत्यंत गंभीर आहे.

असे आहे विभागनिहाय वृक्षलागवडीचे टार्गेट१० कोटी वृक्ष लागवड अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या २५ विभागाला वृक्ष लागवड करावी लागणार आहे. यात रेशीम विभाग ४ कोटी, वन विभाग २ कोटी, ग्राम विकास १ कोटी, नगर विकास १ कोटी, शालेय शिक्षण २० लाख, सार्वजनिक बांधकाम १५ लाख, जलसंपदा ५ लाख, महसूल ५ लाख, उद्योग विभाग ५ लाख, गृह विभाग ५ लाख, उच्च व तंत्र शिक्षण ५ लाख, मृद व जलसंधारण ५ लाख, सहकार व पणन ५ लाख, आरोग्य विभाग ३ लाख, ऊर्जा विभाग ३ लाख, आदिवासी विकास ३ लाख, पशुसंवर्धन व दुग्ध विकास २ लाख, महिला व बालकल्याण २ लाख, वैद्यकीय शिक्षण २ लाख, पर्यटन विकास २ लाख, राज्य रस्ते विकास महामंडळ २० लाख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण २० लाख, रेल्वे २० लाख, संरक्षण विभाग ५० लाख यासह 'एक पेड माँ के नाम' अंतर्गत ५० लाख अशी एकूण १० कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावती