शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तिवस्याच्या तीन माजी सरपंचांकडून पाणीपुरवठ्याची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:17 IST

नगरपंचायतीवर ओढले ताशेरे, गढूळ पाणीपुरवठ्याकडे द्या लक्ष तिवसा : शहरात डेंग्यूने अक्षरशः प्रकोप केला आहे. सहा दिवसांमध्ये तिघांचा डेंग्यूने ...

नगरपंचायतीवर ओढले ताशेरे, गढूळ पाणीपुरवठ्याकडे द्या लक्ष

तिवसा : शहरात डेंग्यूने अक्षरशः प्रकोप केला आहे. सहा दिवसांमध्ये तिघांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने नगरपंचायत प्रशासन टीकेचे धनी झाले आहे. याच मुद्यावर रविवारी दुपारी तत्कालीन ग्रामपंचायतीच्या तीन माजी सरपंचांंनी आनंदवाडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केली. त्यांनी यावेळी काढलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तिवसा शहरात डेंग्यूसह साथरोगांनी थैमान घातले आहे. यात सर्वाधिक बालके डेंग्यूसह तापाने फणफणू लागले आहेत. त्यामुळे शहरात अस्वच्छता व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप होत आहे. तर नगरपंचायत प्रशासनाने या कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे, याच परिस्थितीवर नगरपंचायतचे माजी नगरसेवक व माजी सरपंच असलेले प्रदीप गौरखेडे, अनिल थुल व भूषण यावले यांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली. यात त्यांनी पाहणीचे दोन व्हिडिओ व काही मजकूर लिहित ते सोशल मीडियावर व्हायरल केले. यात त्यांनी पाणी दूषित होत आहे. पाणी पुरवठावर स्वच्छता नाही, असा आरोप केला. मजीप्रा विभागाने स्वतः पाहणी करावी. तिवसा नगरपंचायतच्या पाणीपुरवठा फिल्टर्स प्लांटवर ब्लिचिंग पावडर टाण्यासाठी स्वतंत्र रूम नसल्याने हजारो रुपयांची ब्लिचिंग पावडर व पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीसह एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे ब्लिचिंग पावडर असते. ते जागीच पडून असल्याने खराब होत आहे, असा आरोपही करण्यात आला. नगरपंचायतच्या गलथान व भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे तिवसेकरांना अशुद्ध व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. तिवसा शहरात आठवड्यापासून अनेकांना ''डेंग्यूने डँख "मारल्याने परिणामी ३ मुलांचा व १ महिलेचा मृत्यू झाला असेही यात मजकूर आहे. यात मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओची चांगलीच चर्चा पसरली असून यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्यात.

कोट

तिवसा शहरातील गलिच्छपणा-अस्वच्छतेमुळे व गढूळ पाणीपुरवठा'' या मुख्य कारणामुळे ''तिवसा शहर आजारी पडलेलं आहे.. पण निगरगट्ट प्रशासन व त्यांचा ढिसाळ नियोजनामुळे व नगरपंचायतचा बेजबाबदारपणाचा कळस झाला आहे आता तरी लक्ष द्यावे पाणीपुरवठाची प्रत्यक्ष पाहणी केली. यात धक्कादायक वास्तव दिसून आले.

- अनिल थूल, माजी सरपंच व माजी नगरपंचायत नगरसेवक