शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

पेढी नदी पात्रालगतच्या १३ गावांची पाहणी

By admin | Updated: August 6, 2016 00:07 IST

राज्यात नद्यांनी रौद्रावतार धारण केले असून जिल्ह्यातील नद्या ओसंडून वाहत आहे.

रवि राणा यांचा पुढाकार : पूर संरक्षण भिंतीसाठी ५ कोटी देणारअमरावती : राज्यात नद्यांनी रौद्रावतार धारण केले असून जिल्ह्यातील नद्या ओसंडून वाहत आहे. या पार्श्वभूमिवर आ.रवि राणा यांनी पेढी नदी पात्रालगतच्या १३ गावांना भेटी देऊन ग्रामस्थांना रविवारी दिलासा दिला. पूर संरक्षण भिंत उभारणी करण्यासह क्षतीग्रस्त नागरिकांना घरकूल दिले जाईल. त्याकरिात ५ कोटी रुपयांचा निधी उभारु, अशी ग्वाही त्यांनी दिली.गत आठवड्यात जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आले आहे. त्यामुळे नाल्याच्या काठावरील घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भातकुली तालुक्यात वाहणाऱ्या पेढी नदीच्या पात्रालगत असलेल्या १३ गावांना पुराचा फटका बसला. पूरग्रस्तांना न्याय मिळावा, यासाठी आ. रवि राणा यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. घरांचे नुकसान, जीवनावश्यक वस्तुची हानी, रस्ते, नाल्याची पाहणी करून आपद्ग्रस्तांना शासकीय मदत देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आ. राणा यांनी गावकऱ्यांना सांगितले. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, भातकुलीचे ठाणेदार आदींना सर्वेक्षण करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना दिली. यावेळी भातकुलीचे उपसभापती संगीता चुनकीकर, नगराध्यक्ष महानंदा पवार, उपाध्यक्ष गिरीश कासट, गटनेता प्रवीण पवार, अ. शफीक अ. शरीफ, लता रायबोले, रेखा पवार, अश्विनी काळबांडे, शुद्धोधन सिरसाट, हरिदास मिसाळ, इरफान शहा, अनिल तिडके, शंकर डोंगरे, गणेश पाचकवडे, हर्षद वाचासुंदर, विनोद अबर्ते, प्रवीण मोहोड, पोलीस पाटील रवीेंद्र खांडेकर, सतीश मंत्री, प्रकाश खर्चान, विजय रायबोले आदी उपस्थित होते. दरम्यान नदी पात्रातून होत असलेल्या अवैध उत्खनाकडे आ. राणांनी महसूल विभागाचे लक्ष वेधले.गणोरी येथील दारुबंदीवर वेधले ठाणेदारांचे लक्षभातकुली पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या गणोरी येथील महिलांना अवैध दारु विक्रीसाठी पोलीस आयुक्तांकडे दाद मागावी लागते. त्यामुळे ठाणेदार साहेब, काही तरी कर्तव्यावर जागा. महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून गणोरीतील दारुबंदी झाली नाही तर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, अशी तंबी आ. रवि राणा यांनी ठाणेदार राऊत यांना दिली.