शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

कपाशीवर लाल्या रोगाची लागण, मिरचीवर करपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

कापसाला चांगला हमीभाव मिळत नसला तरी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे दिसत आहे. महागडे बियाणे, रासायनिक खते, वाढती मजुरी अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली अन् आता दुष्काळात तेरावा महिना अशी गत निर्माण झाली आहे. मिरचीची रोपेही करपू लागली आहेत. नगदी पीक असलेली कपाशी दुरून हिरवी दिसत असली तरी लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची चिंता वाढली : पंचनामे करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, तर मिरचीवर करपा जाणवू लागल्याने पुन्हा एकदा तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदा सततच्या संकटांतून सावरण्यास निसर्गाने शेतकऱ्यांना वेळच दिलेला नाही. कृषी विभागाने रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.गेल्या दोन वर्षांत कापसाला चांगला हमीभाव मिळत नसला तरी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे दिसत आहे. महागडे बियाणे, रासायनिक खते, वाढती मजुरी अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली अन् आता दुष्काळात तेरावा महिना अशी गत निर्माण झाली आहे. मिरचीची रोपेही करपू लागली आहेत. नगदी पीक असलेली कपाशी दुरून हिरवी दिसत असली तरी लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. मिरचीवर करपा व ज्वारीवर चिकट्या (मावा) चा प्रादुर्भाव झाला, तर तुरीची झाडेही करपत असल्याने यावर्षी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.तालुक्यात चार वर्षांच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात वेळेवर पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. हातात दमडी शिल्लक नसतानादेखील मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली. अनेकांनी कमी खर्चाचे पीक म्हणून सोयाबीनसह तूर , उडीद, मूग, मिरची, ज्वारीची सुद्धा पेरणी मोठ्या प्रमाणात केली. परंतु, मध्येच दीड महिना पावसाने संताधार लावल्यामुळे ज्वारी, उडीद, मिरची, कपाशी, तूर, सोयाबीनसह अन्य पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद काढणीसाठी आले तेव्हा पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने लागलेल्या शेंगांना व ज्वारीला कोंब फुटले आणि सोयाबीन, ज्वारीचे दाणे काळे झाले. काही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकात रोटाव्हेटर फिरवावे लागले. आता शेतकऱ्यांच्या आशा कपाशी आणि तुरीवर केंद्रित झाल्या असताना, फूल व बोंडांवर रस शोषण करणाºया किडींचा प्रादुर्भाव झाला. कापसावर लाल्या रोगाने प्रहार केला. यापासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकºयांनी तीन ते पाच वेळा महागडी औषधे फवारली. तरीही पात्या, बोंडे कमी प्रमाणात लागल्याने कपाशीच्या बोंडाचे प्रमाणही घटू लागले. यामुळे शेतकरी वर्ग पूर्णत: धास्तावला आहे.

टॅग्स :agricultureशेती