शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भारतीय संविधान देशाचा आत्मा, ते कोणीही बदलू शकत नाही-दिनेश शर्मा

By उज्वल भालेकर | Updated: April 15, 2024 20:41 IST

विरोधकांच्या दृष्ट प्रचाराला जनता बळी पडणार नाही

अमरावती: भारतीय संविधानाचा सर्वाधिक अपमान करण्याचे काम काॅंग्रेसने सत्तेत असताना केले आहे, परंतु तेच आता स्वत:ला संविधान रक्षक सांगत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, भारतीय संविधान हा देशाचा आत्मा आहे आणि आत्मा कोणीही बदलू शकत नाही. त्यामुळे विरोधकांच्या दृष्ट प्रचाराला जनता बळी पडणार नाही, असे मत भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी दिनेश शर्मा यांनी सोमवारी अमरावतीमध्ये व्यक्त केले.

उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्याकडे भाजपच्या वतीने महाराष्ट्र निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. त्याअनुषंगाने ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत असून, उमेदवरांच्या, तसेच पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकी घेत आहेत. सोमवारी ते अमरावतीमध्ये असताना, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले संविधानाचा सर्वाधिक अपमान करण्याचे काम काॅंग्रेसने केले आहे, मग ते मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना पारीत करण्यात आलेला राहुल गांधी यांनी फाडलेला अध्यादेश असो किंवा इंदिरा गांधी यांनी लावलेली देशात आणीबाणी असो, हे संविधान विरोधी कृत होते, परंतु काॅंग्रेस पक्ष सध्या भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर संविधान बदलवेल, असा दृष्ट प्रचार महाविकास आघाडीतील पक्ष करत आहेत. महाविकास आघाडी हे विकास आणि सनातन दोघांच्याही विरोधी आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात दोन जागा निवडून आणण्यासाठीदेखील मोठा संघर्ष करावा लागेल. हनुमान चालिसा वाचल्याने खासदार, आमदाराला जेलमध्ये टाकण्याचे काम महाविकास आघाडी सरकारमध्ये झाले आहे. देशातील संविधान कोणीही बदलू शकत नाही, त्यामुळे जनता महाविकास आघाडीच्या दृष्ट प्रचाराला बळी पडणार नाही, असे दिनेश शर्मा म्हणाले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे, दिनेश सूर्यवंशी, निवेदिता दिघाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाAmravatiअमरावती