शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भारतीय संविधान देशाचा आत्मा, ते कोणीही बदलू शकत नाही-दिनेश शर्मा

By उज्वल भालेकर | Updated: April 15, 2024 20:41 IST

विरोधकांच्या दृष्ट प्रचाराला जनता बळी पडणार नाही

अमरावती: भारतीय संविधानाचा सर्वाधिक अपमान करण्याचे काम काॅंग्रेसने सत्तेत असताना केले आहे, परंतु तेच आता स्वत:ला संविधान रक्षक सांगत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, भारतीय संविधान हा देशाचा आत्मा आहे आणि आत्मा कोणीही बदलू शकत नाही. त्यामुळे विरोधकांच्या दृष्ट प्रचाराला जनता बळी पडणार नाही, असे मत भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी दिनेश शर्मा यांनी सोमवारी अमरावतीमध्ये व्यक्त केले.

उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्याकडे भाजपच्या वतीने महाराष्ट्र निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. त्याअनुषंगाने ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत असून, उमेदवरांच्या, तसेच पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकी घेत आहेत. सोमवारी ते अमरावतीमध्ये असताना, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले संविधानाचा सर्वाधिक अपमान करण्याचे काम काॅंग्रेसने केले आहे, मग ते मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना पारीत करण्यात आलेला राहुल गांधी यांनी फाडलेला अध्यादेश असो किंवा इंदिरा गांधी यांनी लावलेली देशात आणीबाणी असो, हे संविधान विरोधी कृत होते, परंतु काॅंग्रेस पक्ष सध्या भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर संविधान बदलवेल, असा दृष्ट प्रचार महाविकास आघाडीतील पक्ष करत आहेत. महाविकास आघाडी हे विकास आणि सनातन दोघांच्याही विरोधी आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात दोन जागा निवडून आणण्यासाठीदेखील मोठा संघर्ष करावा लागेल. हनुमान चालिसा वाचल्याने खासदार, आमदाराला जेलमध्ये टाकण्याचे काम महाविकास आघाडी सरकारमध्ये झाले आहे. देशातील संविधान कोणीही बदलू शकत नाही, त्यामुळे जनता महाविकास आघाडीच्या दृष्ट प्रचाराला बळी पडणार नाही, असे दिनेश शर्मा म्हणाले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे, दिनेश सूर्यवंशी, निवेदिता दिघाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाAmravatiअमरावती