शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

‘नवसंजीवनी’मुळे राज्यातील दीड लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 15:43 IST

राज्यात निधीअभावी अर्धवट रखडलेल्या १०४ प्रकल्पांचा समावेश आता बळीराजा जलसंजीवनी योजनेत करण्यात आला आहे. यासाठी ७,१७५ कोटींचा निधी आवश्यक आहे. यापैकी २५ टक्क्यांचा निधी केंद्र शासन उपलब्ध करणार आहे.

ठळक मुद्दे१०४ प्रकल्पांचा समावेश, ६,५११ कोटींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात निधीअभावी अर्धवट रखडलेल्या १०४ प्रकल्पांचा समावेश आता बळीराजा जलसंजीवनी योजनेत करण्यात आला आहे. यासाठी ७,१७५ कोटींचा निधी आवश्यक आहे. यापैकी २५ टक्क्यांचा निधी केंद्र शासन उपलब्ध करणार आहे. याद्वारे एक लाख ४६ हजार ३५ हेक्टर सिंचन क्षेत्रवाढ प्रस्तावित आहे. योजनेतील ८१ प्रकल्प विदर्भातील आहेत. यावर ६,५९१ कोटी ७८ लाखांचा निधी खर्च होणार असल्याने सलग दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या विदर्भाला या योजनेमुळे संजीवनीच मिळणार आहे.शेतकरी आत्महत्याप्रवण व सलग दुष्काळाच्या छायेत असलेल्या जिल्ह्यात निधीअभावी अर्धवट रखडलेले प्रकल्प आता राज्य शासनाने बळीराजा नवसंजीवनी योजनेच्या कक्षात आणले आहे. यामध्ये राज्यातील ८३ लघु प्रकल्प, व २१ मुख्य व मध्यम अशा एकूण १०४ प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी २५ टक्के निधी हा केंद्रीय सहाय्यता योजनेतून उपलब्ध करण्यात येणार आहे. पर्यावरण व अन्य वैज्ञानिक मान्यता असलेल्या तसेच केंद्रीय जल आयोग व नीती आयोगाची मान्यताप्राप्त प्रकल्पांची रखडलेली कामे याद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने ३१ मे २०१६ मध्ये केंद्राला प्रस्ताव पाठविला होता, तो आता मार्गी लागला आहे.यामध्ये राज्यातील ८३ लघु व २१ मुख्य प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांची किंमत १६,०२६ कोटींची आहे. प्रकल्पाच्या पूर्णतेसाठी ७,११५.९४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. विदर्भातील ६९ लघु, १२ मुख्य व मध्यम अशा एकूण ८१ प्रकल्पांची किंमत १३,६४६.७१ कोटींची आहे व उर्वरित कामांसाठी ६,५९१.७८ कोटींचा खर्च येणार आहे, तर अमरावती जिल्ह्यातील ६६ लघु व ११ मुख्य व मध्यम प्रकल्पांची किंमत ५,७३४.५४ कोटींच्या घरात आहे. यातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी २,८१३.१२ कोटींचा निधी खर्च होणार आहे. २५ टक्क्यांना निधी आता केंद्र शासन उपलब्ध करून देणार असल्याने प्रकल्पांच्या रखडललेल्या कामांना गती येऊन राज्यात किमान दीड लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ होणार आहे.विदर्भात एक लाख हेक्टर सिंचन क्षेत्रवाढबळीराजा नवसंजीवनी योजनेमुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांत १,०६,३२९ हेक्टर सिंचनक्षेत्रवाढ प्रस्तावित आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४२,४३० हेक्टर, अकोला २९,६२५ हेक्टर, वाशिम ११,०७५ हेक्टर, यवतमाळ १३,६५९ हेक्टर, बुलडाणा ५,४२४ हेक्टर व वर्धा जिल्ह्यात ४,१३० हेक्टरचा समावेश असून ४४४.६८ मीटर प्रकल्प साठ्यात वाढ होणार आहे.मराठवाड्यात ४० हजार हेक्टर सिंचन क्षेत्रवाढया प्रकल्पामुळे मराठवाड्यात ३९,७०६ हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ प्रस्तावित आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात १६,९६६ हेक्टर, जालना ४,२८५ हेक्टर, परभणी २१०० हेक्टर, नांदेड ७,७७८ हेक्टर, लातूर ६,३५० हेक्टर, उस्मानाबाद १,७८५ हेक्टर, व बीड जिल्ह्यात ४४२ हेक्टरवाढ प्रस्तावित आहे, तर प्रकल्प साठ्यात १८९.८५ मीटरने वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती