शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

‘नवसंजीवनी’मुळे राज्यातील दीड लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 15:43 IST

राज्यात निधीअभावी अर्धवट रखडलेल्या १०४ प्रकल्पांचा समावेश आता बळीराजा जलसंजीवनी योजनेत करण्यात आला आहे. यासाठी ७,१७५ कोटींचा निधी आवश्यक आहे. यापैकी २५ टक्क्यांचा निधी केंद्र शासन उपलब्ध करणार आहे.

ठळक मुद्दे१०४ प्रकल्पांचा समावेश, ६,५११ कोटींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात निधीअभावी अर्धवट रखडलेल्या १०४ प्रकल्पांचा समावेश आता बळीराजा जलसंजीवनी योजनेत करण्यात आला आहे. यासाठी ७,१७५ कोटींचा निधी आवश्यक आहे. यापैकी २५ टक्क्यांचा निधी केंद्र शासन उपलब्ध करणार आहे. याद्वारे एक लाख ४६ हजार ३५ हेक्टर सिंचन क्षेत्रवाढ प्रस्तावित आहे. योजनेतील ८१ प्रकल्प विदर्भातील आहेत. यावर ६,५९१ कोटी ७८ लाखांचा निधी खर्च होणार असल्याने सलग दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या विदर्भाला या योजनेमुळे संजीवनीच मिळणार आहे.शेतकरी आत्महत्याप्रवण व सलग दुष्काळाच्या छायेत असलेल्या जिल्ह्यात निधीअभावी अर्धवट रखडलेले प्रकल्प आता राज्य शासनाने बळीराजा नवसंजीवनी योजनेच्या कक्षात आणले आहे. यामध्ये राज्यातील ८३ लघु प्रकल्प, व २१ मुख्य व मध्यम अशा एकूण १०४ प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी २५ टक्के निधी हा केंद्रीय सहाय्यता योजनेतून उपलब्ध करण्यात येणार आहे. पर्यावरण व अन्य वैज्ञानिक मान्यता असलेल्या तसेच केंद्रीय जल आयोग व नीती आयोगाची मान्यताप्राप्त प्रकल्पांची रखडलेली कामे याद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने ३१ मे २०१६ मध्ये केंद्राला प्रस्ताव पाठविला होता, तो आता मार्गी लागला आहे.यामध्ये राज्यातील ८३ लघु व २१ मुख्य प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांची किंमत १६,०२६ कोटींची आहे. प्रकल्पाच्या पूर्णतेसाठी ७,११५.९४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. विदर्भातील ६९ लघु, १२ मुख्य व मध्यम अशा एकूण ८१ प्रकल्पांची किंमत १३,६४६.७१ कोटींची आहे व उर्वरित कामांसाठी ६,५९१.७८ कोटींचा खर्च येणार आहे, तर अमरावती जिल्ह्यातील ६६ लघु व ११ मुख्य व मध्यम प्रकल्पांची किंमत ५,७३४.५४ कोटींच्या घरात आहे. यातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी २,८१३.१२ कोटींचा निधी खर्च होणार आहे. २५ टक्क्यांना निधी आता केंद्र शासन उपलब्ध करून देणार असल्याने प्रकल्पांच्या रखडललेल्या कामांना गती येऊन राज्यात किमान दीड लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ होणार आहे.विदर्भात एक लाख हेक्टर सिंचन क्षेत्रवाढबळीराजा नवसंजीवनी योजनेमुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांत १,०६,३२९ हेक्टर सिंचनक्षेत्रवाढ प्रस्तावित आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४२,४३० हेक्टर, अकोला २९,६२५ हेक्टर, वाशिम ११,०७५ हेक्टर, यवतमाळ १३,६५९ हेक्टर, बुलडाणा ५,४२४ हेक्टर व वर्धा जिल्ह्यात ४,१३० हेक्टरचा समावेश असून ४४४.६८ मीटर प्रकल्प साठ्यात वाढ होणार आहे.मराठवाड्यात ४० हजार हेक्टर सिंचन क्षेत्रवाढया प्रकल्पामुळे मराठवाड्यात ३९,७०६ हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ प्रस्तावित आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात १६,९६६ हेक्टर, जालना ४,२८५ हेक्टर, परभणी २१०० हेक्टर, नांदेड ७,७७८ हेक्टर, लातूर ६,३५० हेक्टर, उस्मानाबाद १,७८५ हेक्टर, व बीड जिल्ह्यात ४४२ हेक्टरवाढ प्रस्तावित आहे, तर प्रकल्प साठ्यात १८९.८५ मीटरने वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती