शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST

यंदा सुरूवातीला कापूस व सोयाबिन पीक उत्तमप्रकारे आले. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही पिकांवर खोडकिडा, खोडमाशी, बोंडअळी, यॅलो मोझॅक अशा विविध किड व रोगांनी अटॅक केला. त्यामुळे कपाशीची बोंडे गळू लागली. सडू लागली. पातेही गळाली. सोयाबिन पिवळे पडले. त्यामुळे हंगामाच्या शेवटी हाती कातय येणार? हा प्रश्न शेतकऱ्यांना सयावतो आहे.

ठळक मुद्देकिडींचा प्रादुर्भाव: शेतमालाच्या आधारभूत किमतींमुळे शेती व्यवसाय तोट्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार: शेतमाल विक्रीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये तसेच शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आधारभूत किंमत ठरवून दिली आहे. मात्र ज्या मूल्यांकनाने शेतीमालाची आधारभूत किंमत ठरविण्यात आली, ते शासनाचे गणित प्रत्यक्षात चुकीचे ठरत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय हा ‘आमदनी अठन्नी खर्चा रूपय्या’ या म्हणीप्रमाणे झाला आहे. यामुळेच शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली अडकला आहे. यंदा सुरूवातीला कापूस व सोयाबिन पीक उत्तमप्रकारे आले. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही पिकांवर खोडकिडा, खोडमाशी, बोंडअळी, यॅलो मोझॅक अशा विविध किड व रोगांनी अटॅक केला. त्यामुळे कपाशीची बोंडे गळू लागली. सडू लागली. पातेही गळाली. सोयाबिन पिवळे पडले. त्यामुळे हंगामाच्या शेवटी हाती कातय येणार? हा प्रश्न शेतकऱ्यांना सयावतो आहे.आजच्या घडीला शेतमालाला देण्यात येणारे भाव म्हणजे ‘किस गली मे खसखस’ ज्या भावात शेतकऱ्याला आपला शेतमाल विक्री करावा लागते ते परवडण्यासारखे नाही. त्यामुळे शेतकरी उलट कर्जबाजारी होत चालला आहे. घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला आणि त्यांच्या कुटुंबाला दिवसासाठी रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्या मजुराच्या तुलनेत मजुरी सुद्धा मिळत नाही. एकंदरीत शेतीव्यवसायला आधारभूत किंमतही नुकसान दायक ठरली आहे. शेतकरी खरीप हंगामात जवळपास तीन महिने कुटुंबासह दिवसभर राबतो. मात्र हाती काहीही येत नाही. यंदाही तिच परिस्थिती उद्भवली आहे.शेतकरी कर्जाच्या डोंगराखालीशेतकरी कर्जामुळे मृत्यूलाही कवटाळत आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात कुटुंबातील कमीत कमी तीन व्यक्ती शेतकामात व्यस्त असतात. एकंदरीत शेतकरी कुटुंबाला दिवसाकाठी ६० ते ७० रुपये मजुरी पडत आहे. म्हणजेच रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्या मजुरापेक्षा कितीतरी कमी पटीने मजुरी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सातत्याने अडचणीत येत आहेत. अनेकदा कर्जाच्या डोंगराखाली सापडलेला शेतकरी मृत्यूला सुद्धा कवटाळत आहे. यासाठी शासनाची शेतमालावर अवलंबून असलेली ा मूल्यांकन पद्धतच कारणीभूत ठरत आहे. हे उघडपणे दिसून येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती