शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

शेतकऱ्यांचे कुटुंबासह बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 22:27 IST

चिखलदरा तालुक्यातील गांगरखेडा येथे दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या आमपाटी प्रकल्पात शेतजमिनी गेलेल्या शेतकºयांना मोबदला मिळालाच नाही. त्यामुळे त्यांनी मंगळवारपासून धरणस्थळावर कुटुंबासह बेमुदत उपोषण सुरू केले.

ठळक मुद्देसातबारा दुरुस्त करा : दशकापूर्वी प्रकल्पासाठी भूसंपादित जमिनीचा मोबदलाच नाही

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : चिखलदरा तालुक्यातील गांगरखेडा येथे दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या आमपाटी प्रकल्पात शेतजमिनी गेलेल्या शेतकºयांना मोबदला मिळालाच नाही. त्यामुळे त्यांनी मंगळवारपासून धरणस्थळावर कुटुंबासह बेमुदत उपोषण सुरू केले. धरणात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा तसेच प्रकल्पाचे काम बंद करण्यासह सातबारा दुरुस्तीची मागणी त्यांनी केली आहेगांगरखेडा येथे २००८ मध्ये आमपाटी धरणाच्या कामाला सुरुवात झाली. तेव्हापासून रखडलेला हा प्रकल्प अजूनही अर्धवटच आहे. या प्रकल्पात येथील शेतकºयांच्या जमिनी गेल्या. मात्र, शासनाने त्यांना कुठल्याच प्रकारचा मोबदला दिलेला नाही. परिणामी या शेतकºयांवर दहा वर्षांपासून उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात त्यांनी तालुक्यातील जिल्हा प्रशासनापर्यंत शेकडो तक्रारी आणि मोबदला मागणीचे अर्ज दिले. परंतु, तरीही कुठल्याच प्रकारचा मोबदला त्यांना मिळालेला नाही. प्रत्येकवेळी आश्वासनांची खैरात वाटण्यात आली. वारंवार पत्र आणि निवेदने देऊन थकलेल्या शेतकºयांनी मंगळवारपासून थेट प्रकल्पस्थळावर कुटुंबासह उपोषणाला सुरुवात केली. उपोषणकर्त्यांमध्ये जगधन छोटे पथोटे, जानकी बिसन बघाये, शिवदास मैकू ब्राह्मणे, मोहन विनोद ब्राह्मणे, मीराय शंकर कासदेकर, इमरती मंगल्या घोरपडे या शेतकºयांचा कुटुंबासह समावेश आहे.उपोषणात ८० वर्षांची आजीबाईआमपाटी धरणात रजनीकुंड, कोरडा, गांगरखेडा, कोटमी, कोयलारी, पाचडोंगरी या खेड्यांतील जवळपास पंचवीस शेतकºयांची जमीन गेली. त्यामध्ये सर्वाधिक संख्या गांगरखेडा येथील १५ पैकी काही शेतकºयांना मोबदला देण्यात आला. मात्र, भूमिअभिलेख कार्यालयात आवश्यक दस्तावेज पूर्वजांच्या नावाने असल्यामुळे वंशजांना वंचित ठेवण्यात आले. उपोषणकर्त्यांमध्ये ८० वर्षीय जानकी बिसन बघाये यांचाही समावेश आहे.प्रशासन राहणार जबाबदारप्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी गांगरखेडा येथून चिखलदरा, अमरावती येथील कार्यालयांच्या वाºया करून थकलेल्या आदिवासींनी उपोषणाचा मार्ग पत्करला. उपोषणादरम्यान जिवांचे बरे-वाईट झाल्यास, शासन-प्रशासन त्याला पूर्णत: जबाबदार राहील, असे पत्र दिले आहे.दहा वर्षांपूर्वी आमची शेतजमीन प्रकल्पात गेली. काडीचाही मोबदला देण्यात आला नाही. परिणामी कुटुंबावर उपासमार आली आहे. निवेदने देऊन थकल्याने आता शेवटच्या लढाईचा निर्धार केला आहे.- जानकी बिसन बघाये, प्रकल्पग्रस्त शेतकरी, गांगरखेडा