शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

सहा महिन्यात शासकीय रक्तपेढीने १०३ बॉटल दूषित रक्त केले नष्ट 

By उज्वल भालेकर | Updated: July 17, 2024 19:54 IST

एचआयव्ही, हिपॅटायटीस बी, सी रुग्णांनी केले होते रक्तदान

अमरावती: रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे आहे; परंतु रुग्णांना रक्त चढविण्यापूर्वी रक्त सुरक्षित आहे का, याची चाचणी केली जाते. जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीमध्ये सहा महिन्यांमध्ये ४ हजार ४०९ जणांनी रक्तदान केले. यामध्ये १०३ रक्तदात्यांचे रक्त हे दूषित आढळून आले आहे. यामध्ये ९ जणांना एचआयव्ही असल्याचे आढळून आले आहे. या सर्व दूषित रक्ताची वेळीच विल्हेवाट लावून ते नष्टदेखील करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात वर्षभरात हजारो गरजू रुग्णांना रक्ताची गरज पडते. यामध्ये अपघातग्रस्त, गर्भवती महिला, सिकलसेल, थॅलेसेमिया, तसेच इतरही अनेक गरजू रुग्णांना रक्त आवश्यक असते. त्यामुळे रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात शासकीय रक्तपेढीबरोबरच काही खासगी रक्तपेढ्याही कार्यरत आहेत. इर्विन रुग्णालयातील रक्तपेढी ही जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी आहे. या रक्तपेढीमधून जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये रक्तपुरवठा केला जातो. त्यामुळे या ठिकाणी रक्तदान केल्यानंतर ते रक्त सुरक्षित आहे का, याची चाचणी केली जाते आणि त्यानंतर सुरक्षित रक्त संबंधित रुग्णांना चढविले जाते. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये इर्विन रक्तपेढीमध्ये ४ हजार ४०९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात १०३ पिशव्या रक्त हे दूषित आढळून आले आहे.

या आजाराचे आहे दूषित रक्तशासकीय रक्तपेढीमध्ये सहा महिन्यांत संकलित झालेल्या रक्ताच्या चाचणीमध्ये ०९ रक्तदात्यांचे रक्त हे एचआयव्ही पॉझिटिव्ह, १५ पिशव्या रक्त हे हिपॅटायटिस-बी, तर ७९ पिशव्या रक्त हे हिपॅटायटिस- सी विषाणू दूषित आढळून आले.

रक्तदान करताना घ्या काळजी?रक्तदान करण्यापूर्वी रक्तदाता हा निरोगी आहे की नाही याची तपासणी करणे गरजेचे आहे. रक्तदाता जर रक्तदान करण्यापूर्वी काही दिवस आजारी असेल तर त्याने रक्तदान करणे टाळावे. रक्तदान केल्यानंतरही ते रक्त सुरक्षित आहे की नाही याची चाचणी करूनच संबंधित रुग्णांना द्यावे.इर्विन येथे रक्त संकलित केल्यानंतर त्या रक्ताचे एचआयव्ही, मलेरिया, गुप्तरोग, हिपॅटायटिस-बी व सी या विषाणूंची चाचणी केली जाते. यामध्ये जे रक्त दूषित आढळले त्याची योग्य विल्हेवाट लावून सुरक्षित रक्तच रुग्णांना दिले जाते. सहा महिन्यांत १०३ बॉटल रक्त दूषित आढळले. - डॉ. आशिष वाघमारे, रक्तपेढी प्रमुख, इर्विन

टॅग्स :AmravatiअमरावतीBlood Bankरक्तपेढी