शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

भीषण; दर आठ तासांनी एक शेतकरी करतोय आत्महत्या; सहा महिन्यांत ५४८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 08:15 IST

अस्मानी व सुलतानी संकटाने पिचलेल्या तब्बल ५४८ शेतकऱ्यांनी मागील सहा महिन्यांत मृत्यूला कवटाळले आहे. यंदा दर आठ तासांत एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे दाहक वास्तव आहे.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील वास्तव, दर आठ तासांत एक शेतकरी आत्महत्या

गजानन मोहोड

अमरावती : अस्मानी व सुलतानी संकटाने पिचलेल्या तब्बल ५४८ शेतकऱ्यांनी मागील सहा महिन्यांत मृत्यूला कवटाळले आहे. यंदा दर आठ तासांत एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे दाहक वास्तव आहे.

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी शासनाने अनेक योजना दिल्या. जागतिक बँकेच्या सहकार्यानेही काही प्रकल्प राबविले. यामध्ये खऱ्या व गरजू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेलाच नाही, कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडल्याने या सर्व योजना आत्महत्या रोखण्यात कुचकामी ठरल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाचे अहवालानुसार यंदा जानेवारी महिन्यात ९५, फेब्रुवारीत १११, मार्च महिन्यात १००, मेमध्ये ८० व जून महिन्यात ६२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्यांचे वाढते सत्र वाढल्याने चिंतेत भर पडली आहे.

सन २००१ पासून १८,२०८ आत्महत्या

शेतकरी आत्महत्याग्रस्त ११ जिल्ह्यांमध्ये १ जानेवारी २००१ पासून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. या कालावधीत पश्चिम विदर्भात ३० जून २०२२ पर्यंत १८,२०८ शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आहे. यापैकी अर्धेअधिक म्हणजेच ९,६४३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली तर ८,२९६ प्रकरणांमध्ये शासन मदत देण्यात आली. अद्याप २६९ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या