शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पश्चिम विदर्भात रान करपलं; ४० वर मंडळांत २१ दिवसांपासून पावसाचा ‘खो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 13:59 IST

पिकांची वाढ खुंटली, समितीकडून पाहणी

अमरावती : जुलैअखेरपासून काही तालुक्यांमध्ये पावसाचा खंड असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात चिंतेचे ढग दाटले आहे. अशा स्थितीत पश्चिम विदर्भातील ४० पेक्षा अधिक महसूल मंडळांमध्ये पावसाचा २१ दिवसांपासून खंड असल्याने तालुका समितीद्वारा पाहणी सुरू झाली आहे. या मंडळांमधील सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास संबंधित जिल्हाधिकारी अधिसूचना काढणार आहेत. ती पीकविमा कंपनीसाठी बंधनकारक आहे.

पेरणीच्या सुरुवातीला पावसाचा विलंब, त्यानंतर जुलैमध्ये अतिवृष्टीने आठ लाख हेक्टरमध्ये नुकसान व त्यानंतर ऑगस्ट महिन्यांपासून पावसात खंड यामुळे यंदाच्या खरिपाची वाट लावली आहे. पिकांची वाढ खुंटली. पिके करपायला लागल्याने उत्पादन खर्च निघणार की नाही, अशी स्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

स्थानिक प्रतिकूल परिस्थिती या निकषामध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास शेतकऱ्यांना पीकविम्याचा अग्रीम मिळतो. यासाठी पीकविमा कंपनीचा प्रतिनिधी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक यांची समिती बाधित मंडळात पिकांचे नजर अंदाज सर्वेक्षण करीत आहेत. समितीच्या अहवालानंतर ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महसूल मंडळात पीकविम्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

या मंडळांत पावसाचा खंड

यवतमाळ जिल्ह्यात अकोला बाजार, बोरी, शिवनी, कुरली, अमरावती जिल्ह्यांत भातकुली, निंभा, आसरा, पापळ, लोणी, दर्यापूर, थिलोरी, विहीगाव, बुलडाणा जिल्ह्यात जळगाव, जामोद, आसलगाव, संग्रामपूर, बावनबीर, पातुर्डा, जवळा, अकोला जिल्ह्यात आसेगाव, मालेगाव, पाथर्डी, बाळापूर, उरळ, निंभा, हातरुण, पातूर, घुसर, बोरगाव, पळसो, सांगळूद, कुरणखेड, धाबा, मूर्तिजापूर, हातगाव, निंभा, माना, जामठी, तर वाशिम जिल्ह्यात कामरगाव मंडळात पावसाचा २१ दिवसांचा खंड आहे.

पावसाचा खंड असल्याने काही भागांत पिकांना ताण आलेला आहे. त्या मंडळांमध्ये समितीद्वारा पीकपाहणी सुरू आहे. दरम्यान, आता काही भागांत पाऊस झालेला आहे.

- किसनराव मुळे, सहसंचालक (कृषी)

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCropपीकRainपाऊस