शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पश्चिम विदर्भात रान करपलं; ४० वर मंडळांत २१ दिवसांपासून पावसाचा ‘खो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 13:59 IST

पिकांची वाढ खुंटली, समितीकडून पाहणी

अमरावती : जुलैअखेरपासून काही तालुक्यांमध्ये पावसाचा खंड असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात चिंतेचे ढग दाटले आहे. अशा स्थितीत पश्चिम विदर्भातील ४० पेक्षा अधिक महसूल मंडळांमध्ये पावसाचा २१ दिवसांपासून खंड असल्याने तालुका समितीद्वारा पाहणी सुरू झाली आहे. या मंडळांमधील सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास संबंधित जिल्हाधिकारी अधिसूचना काढणार आहेत. ती पीकविमा कंपनीसाठी बंधनकारक आहे.

पेरणीच्या सुरुवातीला पावसाचा विलंब, त्यानंतर जुलैमध्ये अतिवृष्टीने आठ लाख हेक्टरमध्ये नुकसान व त्यानंतर ऑगस्ट महिन्यांपासून पावसात खंड यामुळे यंदाच्या खरिपाची वाट लावली आहे. पिकांची वाढ खुंटली. पिके करपायला लागल्याने उत्पादन खर्च निघणार की नाही, अशी स्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

स्थानिक प्रतिकूल परिस्थिती या निकषामध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास शेतकऱ्यांना पीकविम्याचा अग्रीम मिळतो. यासाठी पीकविमा कंपनीचा प्रतिनिधी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक यांची समिती बाधित मंडळात पिकांचे नजर अंदाज सर्वेक्षण करीत आहेत. समितीच्या अहवालानंतर ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महसूल मंडळात पीकविम्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

या मंडळांत पावसाचा खंड

यवतमाळ जिल्ह्यात अकोला बाजार, बोरी, शिवनी, कुरली, अमरावती जिल्ह्यांत भातकुली, निंभा, आसरा, पापळ, लोणी, दर्यापूर, थिलोरी, विहीगाव, बुलडाणा जिल्ह्यात जळगाव, जामोद, आसलगाव, संग्रामपूर, बावनबीर, पातुर्डा, जवळा, अकोला जिल्ह्यात आसेगाव, मालेगाव, पाथर्डी, बाळापूर, उरळ, निंभा, हातरुण, पातूर, घुसर, बोरगाव, पळसो, सांगळूद, कुरणखेड, धाबा, मूर्तिजापूर, हातगाव, निंभा, माना, जामठी, तर वाशिम जिल्ह्यात कामरगाव मंडळात पावसाचा २१ दिवसांचा खंड आहे.

पावसाचा खंड असल्याने काही भागांत पिकांना ताण आलेला आहे. त्या मंडळांमध्ये समितीद्वारा पीकपाहणी सुरू आहे. दरम्यान, आता काही भागांत पाऊस झालेला आहे.

- किसनराव मुळे, सहसंचालक (कृषी)

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCropपीकRainपाऊस