शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कसला अमृतकाळ? मेळघाटात ऑगस्टमध्ये ३६ पैकी १९ बालकांचा मृत्यू रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2022 10:35 IST

पाच महिन्यांत ११० मृत्यू; धक्कादायक वास्तव आले समोर

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत दोन माता व शून्य ते सहा वयोगटातील ७७ व ३३ उपजत अशा ११० बालकांचा मृत्यू झाला. धारणी उपजिल्हा रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात ३६ पैकी १९ बालकांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

आदिवासी नागरिकांनी बालकांचा उपचार कुठे करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुपोषणाच्या तीव्र श्रेणीत २३२ बालके असताना १४ ‘ब’ गट डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचा संतापजनक प्रकार आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, न्यायालयाचे ताशेरे पाहता मृत्यूची आकडेवारी कमी होत नसल्याचे चित्र आहे.

या ११० मृत्यूंपैकी सर्वाधिक ३६ बालकांचा मृत्यू ऑगस्ट महिन्यात झालेला आहे. या कालावधीत दोन माता मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे आहे. आदिवासी बांधवांवर अंधश्रद्धेचा पगडा असल्याचे वारंवार सांगितले जाते. आता रुग्णालयातही बालमृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे वास्तव आहे.

शून्य ते सहा वयोगटात ७७ बालकांचा मृत्यू

मेळघाटात पाच महिन्यांत शून्य ते सहा वयोगटातील ७७ बालकांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्यात २,५२५ बालकांचा जन्म झाला. त्यापैकी शून्य ते सहा वयोगटातील २७ बालके दगावली आहेत. धारणी येथे उपजिल्हा रुग्णालयात १९ व टेब्रुसोंडा आरोग्य केंद्र अंतर्गत शून्य ते सहा वयोगटातील सहा बालके दगावली आहेत.

पाच महिन्यात ३३ बालके मृत जन्मली

आरोग्य विभाग शून्य ते सहा वयोगटातील आकडेवारी सांगत असला तरी मृत जन्मलेल्या बालकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. पाच महिन्यात ती ३३ आहे. ऑगस्ट महिन्यात नऊ बालके मृत जन्मल्याने राज्य शासनाचा पोषण आहार व इतर योजना कुचकामी ठरल्या आहेत.

मागील वर्षाच्या तुलनेत बालमृत्यूची संख्या कमी आहे. ऑगस्ट महिन्यात ० ते ६ वयोगटातील २७ व उपजत नऊ बालकांचा मृत्यू झाला. आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. ‘ब’ गट डॉक्टरांची १४ पदे रिक्त आहेत. शासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे

दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

टॅग्स :Healthआरोग्यMelghatमेळघाटAmravatiअमरावती