शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कसला अमृतकाळ? मेळघाटात ऑगस्टमध्ये ३६ पैकी १९ बालकांचा मृत्यू रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2022 10:35 IST

पाच महिन्यांत ११० मृत्यू; धक्कादायक वास्तव आले समोर

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत दोन माता व शून्य ते सहा वयोगटातील ७७ व ३३ उपजत अशा ११० बालकांचा मृत्यू झाला. धारणी उपजिल्हा रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात ३६ पैकी १९ बालकांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

आदिवासी नागरिकांनी बालकांचा उपचार कुठे करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुपोषणाच्या तीव्र श्रेणीत २३२ बालके असताना १४ ‘ब’ गट डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचा संतापजनक प्रकार आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, न्यायालयाचे ताशेरे पाहता मृत्यूची आकडेवारी कमी होत नसल्याचे चित्र आहे.

या ११० मृत्यूंपैकी सर्वाधिक ३६ बालकांचा मृत्यू ऑगस्ट महिन्यात झालेला आहे. या कालावधीत दोन माता मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे आहे. आदिवासी बांधवांवर अंधश्रद्धेचा पगडा असल्याचे वारंवार सांगितले जाते. आता रुग्णालयातही बालमृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे वास्तव आहे.

शून्य ते सहा वयोगटात ७७ बालकांचा मृत्यू

मेळघाटात पाच महिन्यांत शून्य ते सहा वयोगटातील ७७ बालकांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्यात २,५२५ बालकांचा जन्म झाला. त्यापैकी शून्य ते सहा वयोगटातील २७ बालके दगावली आहेत. धारणी येथे उपजिल्हा रुग्णालयात १९ व टेब्रुसोंडा आरोग्य केंद्र अंतर्गत शून्य ते सहा वयोगटातील सहा बालके दगावली आहेत.

पाच महिन्यात ३३ बालके मृत जन्मली

आरोग्य विभाग शून्य ते सहा वयोगटातील आकडेवारी सांगत असला तरी मृत जन्मलेल्या बालकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. पाच महिन्यात ती ३३ आहे. ऑगस्ट महिन्यात नऊ बालके मृत जन्मल्याने राज्य शासनाचा पोषण आहार व इतर योजना कुचकामी ठरल्या आहेत.

मागील वर्षाच्या तुलनेत बालमृत्यूची संख्या कमी आहे. ऑगस्ट महिन्यात ० ते ६ वयोगटातील २७ व उपजत नऊ बालकांचा मृत्यू झाला. आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. ‘ब’ गट डॉक्टरांची १४ पदे रिक्त आहेत. शासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे

दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

टॅग्स :Healthआरोग्यMelghatमेळघाटAmravatiअमरावती