शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माता न तू वैरिणी; दुधातून दिले चिमुकलीला विष!

By प्रदीप भाकरे | Updated: May 24, 2023 14:23 IST

आईविरूद्ध खुनाचा गुन्हा : अक्षराची मृत्युशी झुंज अयशस्वी 

अमरावती : चक्क आईने दुधातून दिलेले विष विश्वासाने पिणाऱ्या ११ वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ११ मे रोजी मृत्यूशी सुरू झालेली तिची झुंज १९ मे रोजी सायंकाळी नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये संपुष्टात आली. चिमुकलीच्या मृत्युनंतर तिला दुधातून विष देणाऱ्या तिच्या आईविरूद्ध कुऱ्हा पोलिसांनी २३ मे रोजी रात्री ११ च्या सुमारास खून, खुनाचा प्रयत्न तथा आत्महत्येचा प्रयत्न आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

मुलांचा बाप असताना आपल्यानंतर कोण, असा विचार करून मुलांना विष पाजणाऱ्या प्रिया हिच्याबाबत समाजात माता न तू वैरिणी’ अशी प्रतिक्रिया उमटली आहे. अक्षरा अमोल जयसिंगकार (११, रा. अंजनसिंगी) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. आपल्याला पोटाचा त्रास असल्याने आपल्या मृत्युनंतर मुलांचे काय होणार, या भीतीपोटी आपण अक्षरा व लहानग्या मुलाला बोर्नव्हिटा टाकलेल्या दुधात विष कालवले होते. ते विषयुक्त दुध दोन्ही मुलांना देऊन स्वत: देखील घेतल्याची कबुली अक्षराची आई प्रिया अमोल जयसिंगकार (२८, रा. अंजनसिंगी) हिने कुऱ्हा पोलिसांना दिली आहे. ११ मे रोजी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास अंजनसिंगी येथे ती धक्कादायक घटना घडली होती. घटनेवेळी चिमुकल्यांचे वडिल अमोल जयसिंगकार हे कामासाठी घराबाहेर गेले होते.

काय घडले नेमके?

रोजप्रमाणे आईच्याच हातचे दुध घेऊन त्या चिमुकल्यांची पहाट व्हायची. नेहमीप्रमाणे अक्षरा व जय (७) यांनी ११ मे रोजी सकाळी ९.४५ च्या सुमारास आईकडून दूध घेतले. मात्र त्यादिवशी प्रिया हिने मुलांना बोर्वव्हिटा घातलेल्या दुधात उंदिर मारण्याचे विषारी औषध मिसळविले. ते दूध मुलांना प्यायला दिले. स्वत:देखील घेतले. हा प्रकार शेजाऱ्यांना माहिती होताच त्यांनी तिघा मायलेकांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हुलविले. तेथे प्रिया जयसिंगकार व अक्षराचे बयान देखील झाले.

नागपूरला हलविले

सुरुवातीला अक्षराच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र दोन दिवसांनी तिची प्रकृती बिघडल्याने तिला नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र आईने दुधातून दिलेले विष सर्वांगात भिनल्याने ती उपाचारास दाद देऊ शकली नाही. परिणामी, १९ मे रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास अक्षराने तेथे शेवटचा श्वास घेतला. त्याबाबत कुऱ्हा पोलिसांना माहिती देण्यात आली.

असा आहे प्रियावरील आरोप

आपल्याला पोटाचा असह्य त्रास होत असल्याने आपल्या मृत्युनंतर मुलांचे काय होईल, या भीतीपोटी आपण ते कृत्य केल्याचे प्रिया हिचे बयाण आहे. तर, ११ मे रोजी अक्षरा हिचे देखील बयान नोंदविण्यात आले होते. विषयुक्त दुध पिण्यास दिल्याने मुलांचा जीव जाऊ शकतो, याची जाणीव असताना देखील तिने मुलांना विष दिल्याने व स्वत:ही घेतल्याने तिच्याविरूद्ध मुलीचा खून, चिमुकल्या जयच्या खुनाचा प्रयत्न व स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती