शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

अधिग्रहणातील १०९ बोअर, विहिरींवर ९४ गावांची तहान; पाणीटंचाईची तीव्रता वाढली

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 12, 2024 20:34 IST

१३ गावांमध्ये १७ टँकरने पाणीपुरवठा, मागच्या हंगामात सरासरीपेक्षा ३२ टक्के कमी पावसाने जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही.

अमरावती : पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. सद्य:स्थितीत ९४ गावांची तहान अधिग्रहित केलेल्या ४१ बोअर व खासगी ६८ विहिरींवर भागविली जात आहे. याशिवाय तहानलेल्या गावांसाठी १७ टँकर सुरू आहेत.

मागच्या हंगामात सरासरीपेक्षा ३२ टक्के कमी पावसाने जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे मार्चपश्चात सर्व तालुक्यातील भूजलात मोठी तूट आलेली आहे. अशा परिस्थितीत अनेक गावांंमधील जलस्रोत कोरडे पडल्याने पाणीपुरवठ्याच्या योजना कुचकामी ठरल्या आहे. त्यातच पाणीटंचाई निवारणार्थ योजना आचारसंहितेत रखडल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. त्यावर तात्पुरत्या उपाययोजनांची मात्रा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे देण्यात आली आहे. शिवाय जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एसडीओ यांना टँकर लावण्याचे अधिकार दिले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या सोमवारच्या अहवालानुसार अमरावती तालुक्यात १०, नांदगाव खंडेश्वर १७, मोर्शी १४, धारणी १०, चिखलदरा १९, तिवसा ७, भातकुली १, चांदूर रेल्वे ३, धामणगाव रेल्वे २ व अचलपूर तालुक्यात ३ गावांमध्ये अधिग्रहण केलेल्या ६८ विहिरी व ४१ बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

चिखलदरा तालुक्यात १६ टँकर सुरूजिल्ह्यात सर्वाधिक १६ टँकर चिखलदरा तालुक्यात सुरू आहेत. यामध्ये खडीमल गावात ४, आलाडोह २, बेला, मोथा, धरमडोह, आकी, बहादरपूर, गौरखेडा बाजार, लवादा, गवळी ढाणा, स्कूल ढाणा व कालापेंढरी गावात प्रत्येकी एक टँकर सुरू आहेत. याशिवाय चांदूर रेल्वे तालुक्यात सावंगी मग्रापूर येथे १ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई