शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

योजनांमध्ये सुधारणा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

विधान भवनातील मंत्रिपरिषद सभागृहात अमरावती जिल्ह्याच्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, बच्चू कडू, रवि राणा, देवेंद्र भुयार, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, बळवंत वानखडे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी संजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्याद्वारे जिल्हा आढावा : लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांसह सध्याच्या जलसंधारणासह विविध योजनांमध्ये लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुधारणा करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिली.विधान भवनातील मंत्रिपरिषद सभागृहात अमरावती जिल्ह्याच्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, बच्चू कडू, रवि राणा, देवेंद्र भुयार, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, बळवंत वानखडे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी संजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांमध्ये नव्या उपाययोजनांचा समावेश करावा लागेल. त्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नव्या योजनांची भर घालण्यात येईल. अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विम्याचा आधार असतो. त्यामुळे विमा धोरणात सुधारणा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.अवेळी पावसाने बाधित झालेल्या जाहीर क्षेत्रात वरूड, मोर्शी या तालुक्यांचा समावेश नसल्याची बाब समोर आल्यानंतर, ही बाब जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून शासकीय नियमाप्रमाणे मदत करण्यात येईल, असे मेहता यांनी सांगितले. वन्यप्राण्यांमुळे  होणाºया अपघातानंतर मदतीच्या निकषांमध्ये रोही (नीलगाय) या प्राण्याचा समावेश करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. कृषी विभागातील ४७ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात मृद् व जलसंधारणाच्या १०५ योजना पूर्ण होऊन २८ हजार ५९४ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. जिल्ह्यात जलशक्ती अभियानात चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी व वरूड तालुक्यात ३,६५३ छतांवरील पाणी संकलन योजना पूर्ण झाल्या. रोहयोत जलसंधारण प्रकारातील २४,४९५ कामे हाती घेण्यात आली. त्यातील १६,६७८ कामे पूर्ण झाल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. जिल्ह्यातील विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांद्वारे कामांचे सादरीकरणजिल्ह्यात २०१९ मध्ये खरीपाचे क्षेत्र ६ लाख ८२ हजार हेक्टर व प्रत्यक्ष पडलेला पाऊस ७७८.८४ मिमी होता. अवेळी पावसाने ३ लाख ७३ हजार ५५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले, तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ७५ हजार ३९८ आहे. ऑक्टोबरमधील अवेळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने ९१ हजार २७८ शेतक-यांना ७२ कोटी २६ लाख अनुदान वाटप करण्यात आले. जिल्ह्याला २३० कोटी ६२ लाख रुपयांचे अनुदान वाटप होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय पवार यांनी दिली.

टॅग्स :Socialसामाजिक