शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

योजनांमध्ये सुधारणा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

विधान भवनातील मंत्रिपरिषद सभागृहात अमरावती जिल्ह्याच्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, बच्चू कडू, रवि राणा, देवेंद्र भुयार, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, बळवंत वानखडे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी संजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्याद्वारे जिल्हा आढावा : लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांसह सध्याच्या जलसंधारणासह विविध योजनांमध्ये लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुधारणा करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिली.विधान भवनातील मंत्रिपरिषद सभागृहात अमरावती जिल्ह्याच्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, बच्चू कडू, रवि राणा, देवेंद्र भुयार, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, बळवंत वानखडे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी संजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांमध्ये नव्या उपाययोजनांचा समावेश करावा लागेल. त्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नव्या योजनांची भर घालण्यात येईल. अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विम्याचा आधार असतो. त्यामुळे विमा धोरणात सुधारणा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.अवेळी पावसाने बाधित झालेल्या जाहीर क्षेत्रात वरूड, मोर्शी या तालुक्यांचा समावेश नसल्याची बाब समोर आल्यानंतर, ही बाब जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून शासकीय नियमाप्रमाणे मदत करण्यात येईल, असे मेहता यांनी सांगितले. वन्यप्राण्यांमुळे  होणाºया अपघातानंतर मदतीच्या निकषांमध्ये रोही (नीलगाय) या प्राण्याचा समावेश करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. कृषी विभागातील ४७ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात मृद् व जलसंधारणाच्या १०५ योजना पूर्ण होऊन २८ हजार ५९४ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. जिल्ह्यात जलशक्ती अभियानात चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी व वरूड तालुक्यात ३,६५३ छतांवरील पाणी संकलन योजना पूर्ण झाल्या. रोहयोत जलसंधारण प्रकारातील २४,४९५ कामे हाती घेण्यात आली. त्यातील १६,६७८ कामे पूर्ण झाल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. जिल्ह्यातील विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांद्वारे कामांचे सादरीकरणजिल्ह्यात २०१९ मध्ये खरीपाचे क्षेत्र ६ लाख ८२ हजार हेक्टर व प्रत्यक्ष पडलेला पाऊस ७७८.८४ मिमी होता. अवेळी पावसाने ३ लाख ७३ हजार ५५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले, तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ७५ हजार ३९८ आहे. ऑक्टोबरमधील अवेळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने ९१ हजार २७८ शेतक-यांना ७२ कोटी २६ लाख अनुदान वाटप करण्यात आले. जिल्ह्याला २३० कोटी ६२ लाख रुपयांचे अनुदान वाटप होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय पवार यांनी दिली.

टॅग्स :Socialसामाजिक