शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

कर्जमाफीची अंमलबजावणी सोमवारपासून संस्था, बँक स्तरावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 22:30 IST

गावांतील सोसायटी व बँकस्तरावर सोमवारपासून योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : राज्य शासनाने शेतक-यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. याच अनुषंगाने सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला व सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी शनिवारी राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधकांची बैठक घेऊन योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात निर्देश दिले. गावांतील सोसायटी व बँकस्तरावर सोमवारपासून योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

योजनेच्या अनुषंगाने जिल्हा बँका व राष्ट्रीयीकृत बँका तसेच सेवा सोसायटी स्तरावर दिलेल्या नमुन्यानुसार पात्र शेतक-यांच्या याद्या तयार करण्यात येतील. जिल्हा लेखापरीक्षक त्या याद्या प्रमाणित करतील. या बँक खात्यांना आधार लिंक अनिवार्य आहे. ज्या खात्यांना आधार लिंक आहे, अशा खात्याची  एक यादी तयार करण्यात येणार आहे तसेच ज्या खात्यांना आधार लिंक नाही, अशा खात्यांची अन्य यादी करण्यात येऊन ती संस्थास्तरावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार ज्या बँक खात्याला आधार लिंक नाही, ती यादी प्रसिद्ध करण्यात येऊन यादीतील अपात्र नावे वगळण्यात येऊन पात्र लाभार्थींची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 शेतक-यांना यादीनुसार त्यांच्या खात्यातील रक्कम, व्याज आकारणी बरोबर आहे काय, याची पडताळणी करावी लागेल. सर्व माहिती जुळत असल्यास संबंधित शेतकºयाला तसा शेरा द्यावा लागणार आहे. या योजनेसाठी बँकांचे निरीक्षक, संस्था सचिव, लेखापरीक्षक यांना सहकार आयुक्त कार्यालयाकडून प्रशिक्षण मिळेल. येत्या आठवड्यात यासंदर्भात आणखी एक शासनादेश निघणार आहे. त्यामध्ये विस्तृत माहिती दिली जाणार आहे. या कर्जमाफीत शेतकºयांची अर्जापासून सुटका केली आहे. 

 जिल्हास्तरावर तक्रार निवारण समितीशेतक-यांना त्यांच्या खात्यासंदर्भात माहिती योग्य वाटत नसल्यास, त्यांना तसे कळवावे लागणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व सचिव जिल्हा उपनिबंधक तसेच जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा बँकेचे एमडी, राष्ट्रीयीकृत बँकांचे जिल्हा समन्वयक हे सदस्य आहेत. ही समिती निर्णय घेणार आहे. त्यानुसार दुरुस्ती यादीत केली जाईल. 

कर्जमाफीसंदर्भात सोमवारपासून अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे. शेतकºयांची तक्रार असल्यास जिल्हास्तरावर समितीद्वारे निर्णय घेतली जाईल.- संदीप जाधव,  जिल्हा उपनिबंधक, अमरावती

टॅग्स :Farmerशेतकरी