शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

नेरपिंगळाई येथील ऐतिहासिक श्रीगणेशाचे जल्लोषात विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST

लोटांगण प्रथा कायम, मुस्लिम बांधवांकडून स्वागत नेरपिंगळाई : येथील पौराणिक व पारंपरिक गुरू गंगाधर स्वामी मठाच्या गणपतीचे सोमवारी विसर्जन ...

लोटांगण प्रथा कायम, मुस्लिम बांधवांकडून स्वागत

नेरपिंगळाई : येथील पौराणिक व पारंपरिक गुरू गंगाधर स्वामी मठाच्या गणपतीचे सोमवारी विसर्जन झाले. दरवर्षी ढोल-ताशांच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण, यंदा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने गणरायाला निरोप दिला.

रविवारी रात्री १२ वाजता सुरू झालेला विसर्जन सोहळा सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत मंगलमय शांततेच्या वातावरणात पूर्ण झाला. या वर्षी कोरोनामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे विसर्जन करण्यात आले. दरवर्षी ढोल-ताशे व तृतीयपंथीयांच्या नृत्यासाठी प्रसिद्ध असणारा हा सोहळा मिरवणुकीशिवाय पार पडला. धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक व सर्वधर्म समभावाची भूमिका असणाऱ्या मठाच्या गणपतीचे मुस्लिम बांधवांकडून पूजा करून स्वागत करण्यात आले. मानाच्या गणपतीसोबतच गुलाबपुरी महाराज संस्थान व मालगे यांच्या गणपतीचीसुद्धा या सोहळ्यात सहभाग होता. मानाच्या मठाच्या गणपती विसर्जनानंतर गावातील सर्व मंडळांचे व घरगुती गणपती विसर्जित करण्यात आले.

सोहळ्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, मोठ्या मिरवणुका निघू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरखेडचे ठाणेदार विक्रांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल ठाकरे, पोलीस पाटील राजेश राऊत, बीट अंमलदार श्याम चुंगडा, किरण लाकडे, नीलेश देशमुख, मनोज टप्पे, रामेश्वर इंगोले यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज होती. मिरवणुकीत शांतता टिकून राहावी, यासाठी शांतता कमिटीचे सदस्य, सरपंच सविता खोडस्कर, पंचायत समितीच्या उपसभापती सोनाली नवले यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदींनी परिश्रम घेतले.

----------------

तरुणांनी घेतली जबाबदारी

विसर्जन मार्गाची गावातील ‘माझे गाव माझी जबाबदारी’ या तरुणाच्या संघटनेने संपूर्ण साफसफाई केली तसेच गावातील गणेश मंडळांनी मूर्तीसोबतचे निर्माल्य गोळा करून नदी व पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला.

मुस्लिम बांधवांकडून फुलांचा वर्षाव

गावात विविध ठिकाणी फराळाची सोय करण्यात आली होती तसेच येथील मुस्लिम बांधवांच्यावतीने गणरायावर फुलांचा वर्षाव करीत गणरायाला निरोप देण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.