शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

नेरपिंगळाई येथील ऐतिहासिक श्रीगणेशाचे जल्लोषात विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST

लोटांगण प्रथा कायम, मुस्लिम बांधवांकडून स्वागत नेरपिंगळाई : येथील पौराणिक व पारंपरिक गुरू गंगाधर स्वामी मठाच्या गणपतीचे सोमवारी विसर्जन ...

लोटांगण प्रथा कायम, मुस्लिम बांधवांकडून स्वागत

नेरपिंगळाई : येथील पौराणिक व पारंपरिक गुरू गंगाधर स्वामी मठाच्या गणपतीचे सोमवारी विसर्जन झाले. दरवर्षी ढोल-ताशांच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण, यंदा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने गणरायाला निरोप दिला.

रविवारी रात्री १२ वाजता सुरू झालेला विसर्जन सोहळा सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत मंगलमय शांततेच्या वातावरणात पूर्ण झाला. या वर्षी कोरोनामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे विसर्जन करण्यात आले. दरवर्षी ढोल-ताशे व तृतीयपंथीयांच्या नृत्यासाठी प्रसिद्ध असणारा हा सोहळा मिरवणुकीशिवाय पार पडला. धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक व सर्वधर्म समभावाची भूमिका असणाऱ्या मठाच्या गणपतीचे मुस्लिम बांधवांकडून पूजा करून स्वागत करण्यात आले. मानाच्या गणपतीसोबतच गुलाबपुरी महाराज संस्थान व मालगे यांच्या गणपतीचीसुद्धा या सोहळ्यात सहभाग होता. मानाच्या मठाच्या गणपती विसर्जनानंतर गावातील सर्व मंडळांचे व घरगुती गणपती विसर्जित करण्यात आले.

सोहळ्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, मोठ्या मिरवणुका निघू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरखेडचे ठाणेदार विक्रांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल ठाकरे, पोलीस पाटील राजेश राऊत, बीट अंमलदार श्याम चुंगडा, किरण लाकडे, नीलेश देशमुख, मनोज टप्पे, रामेश्वर इंगोले यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज होती. मिरवणुकीत शांतता टिकून राहावी, यासाठी शांतता कमिटीचे सदस्य, सरपंच सविता खोडस्कर, पंचायत समितीच्या उपसभापती सोनाली नवले यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदींनी परिश्रम घेतले.

----------------

तरुणांनी घेतली जबाबदारी

विसर्जन मार्गाची गावातील ‘माझे गाव माझी जबाबदारी’ या तरुणाच्या संघटनेने संपूर्ण साफसफाई केली तसेच गावातील गणेश मंडळांनी मूर्तीसोबतचे निर्माल्य गोळा करून नदी व पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला.

मुस्लिम बांधवांकडून फुलांचा वर्षाव

गावात विविध ठिकाणी फराळाची सोय करण्यात आली होती तसेच येथील मुस्लिम बांधवांच्यावतीने गणरायावर फुलांचा वर्षाव करीत गणरायाला निरोप देण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.