शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकृषिक जागांना तातडीने परवानगी द्या

By admin | Updated: December 31, 2015 00:11 IST

जिल्ह्यात अकृषिक जागांना परवानगी मागण्यासाठी प्राप्त अर्जावर सकारात्मक कार्यवाही करुन संपुर्ण प्रकरणे तातडीने निकाली काढावीत.

पालकमंत्री : रमाई आवास योजना बैठकीत निर्देशअमरावती : जिल्ह्यात अकृषिक जागांना परवानगी मागण्यासाठी प्राप्त अर्जावर सकारात्मक कार्यवाही करुन संपुर्ण प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. अशा प्रकरणात अनावश्यक आक्षेप काढुन नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी अडवणूक करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अकृषिक जागांना परवानगी देणे, रमाई आवास योजना संदर्भात झालेल्या कामांचा आढावा ना. पोटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपजिल्हाधिकारी शिरसुद्धे, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, नगररचना, महानगरपालिका आदी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.ना. पोटे म्हणाले की, शासन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. अकृषिक प्रकरणात कृषिवर आधारित उद्योग उभारणार असून यातून रोजगार प्राप्त होणार आहे. यासाठी संबंधित विभागांनी अकृषिक वापर सुरु करण्याची तातडीने परवानगी द्यावी. या कामात अडवणूक करणाऱ्या किंवा अनावश्यक आक्षेप काढणाऱ्यांवर सक्तीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.रमाई आवास योजनेंतर्गत झालेल्या घरकुल कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात १,७३९ घरकुले पुर्ण असुन १,१८६ घरकुलांचे काम प्रगतीपथवार आहे. तसेच महापालिका क्षेत्रात १,१५६ घरकुलांचे काम पुर्ण असुन १,०६३ कामे प्रगतीपथावर आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी २० कोटी रुपये निधीची आवश्यकता लागणार आहे. तसेच ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत १,१७८ घरकुलांचे काम पुर्ण झाले असुन ४,३२४ घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे चव्हाण यांनी दिली. अनुसुचित जाती, भटक्या जमातीच्या निराधार लोकांना तसेच कमी उत्पन्न गटातील लोकांना येत्या दोन ते तीन वर्षात घरकुले देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा. नगरपरिषद प्रशासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडे येणारी अकृषिक व घरकुल वाटपाची प्रकरणे सकारात्मकतेने निकाली काढावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.