शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

...अन् संतप्त विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांनाच काढले कार्यालयाबाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 10:43 IST

वसतिगृह व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : स्वच्छ पिण्याच्या पाण्याअभावी विद्यार्थी पडताहेत आजारी

अमरावती : आदिवासी विकास विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आदिवासी वसतिगृहात स्वच्छ पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्याने विद्यार्थी आजारी पडत आहेत, तसेच इतरही आवश्यक सोयी- सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी मंगळवारी शहरातील दस्तूरनगर येथील आदिवासी शासकीय वसतिगृहाच्या कार्यालयामध्ये आंदोलन केले. आम्ही आदिवासी असल्यानेच आमच्यावर अन्याय होत असल्याची संतप्त भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. तब्बल तीन ते चार तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढत संताप व्यक्त केला.

आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शहरी भागात उच्चशिक्षण घेता यावे, याकरिता एक हजार विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह चालविण्यात येत आहे. या वसतिगृहामध्ये शासनाच्या २०११ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक वसतिगृहात स्वतंत्र ग्रंथालय, दहा विद्यार्थ्यांमागे एक कॉम्प्युटर व इंटरनेट सुविधा, प्रत्येक वसतिगृहात स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर बसविणे, दर महिन्यातून एक वेळा विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करणे, व्यायामासाठी जीमची व्यवस्था करणे, दररोज वसतिगृहाची स्वच्छता, स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकांची सुविधा, त्याचबरोबर चार ते पाच वृत्तपत्रे, अशा सुविधा देणे अपेक्षित आहे; परंतु शहरातील आदिवासी वसतिगृहात यापैकी कोणत्याच सुविधा नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

यासंदर्भात अनेक वेळा विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन व आंदोलन करून सुविधा देण्याची मागणी केली; परंतु तरीही कार्यालयाकडून सपशेल दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ४० ते ५० विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विकास परिषदेच्या नेतृत्वात शहरातील दस्तूरनगरातील मुख्य कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन केले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

आमचे प्रश्न सोडवू शकत नसाल, तर कार्यालय सोडा

दस्तूरनगर येथील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या मुख्य कार्यालयात संतप्त विद्यार्थी पोहोचल्यानंतर येथील कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक वादही झाला, तसेच एका कर्मचाऱ्याला विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची घटनाही याठिकाणी घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी संबंधित कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांना जर तुम्ही प्रश्न सोडवू शकत नाही, तर तुम्हाला कार्यालयात राहण्याचाही अधिकार नाही, असे म्हणत कर्मचाऱ्यांना बाहेर हाकलूनही लावले.

शहरातील वसतिगृहे ही भाड्याच्या जागेत सुरू आहेत, त्यामुळे काही प्रमाणात अडचणी असतील. मी दीड महिन्यापूर्वीच जबाबदारी स्वीकारली असून, विद्यार्थ्यांचे हे पहिलेच निवेदन मला मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल.

- प्रताप वाडजे, गृहप्रमुख आदिवासी वसतिगृह

टॅग्स :Studentविद्यार्थीAmravatiअमरावती