शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

...अन् संतप्त विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांनाच काढले कार्यालयाबाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 10:43 IST

वसतिगृह व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : स्वच्छ पिण्याच्या पाण्याअभावी विद्यार्थी पडताहेत आजारी

अमरावती : आदिवासी विकास विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आदिवासी वसतिगृहात स्वच्छ पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्याने विद्यार्थी आजारी पडत आहेत, तसेच इतरही आवश्यक सोयी- सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी मंगळवारी शहरातील दस्तूरनगर येथील आदिवासी शासकीय वसतिगृहाच्या कार्यालयामध्ये आंदोलन केले. आम्ही आदिवासी असल्यानेच आमच्यावर अन्याय होत असल्याची संतप्त भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. तब्बल तीन ते चार तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढत संताप व्यक्त केला.

आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शहरी भागात उच्चशिक्षण घेता यावे, याकरिता एक हजार विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह चालविण्यात येत आहे. या वसतिगृहामध्ये शासनाच्या २०११ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक वसतिगृहात स्वतंत्र ग्रंथालय, दहा विद्यार्थ्यांमागे एक कॉम्प्युटर व इंटरनेट सुविधा, प्रत्येक वसतिगृहात स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर बसविणे, दर महिन्यातून एक वेळा विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करणे, व्यायामासाठी जीमची व्यवस्था करणे, दररोज वसतिगृहाची स्वच्छता, स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकांची सुविधा, त्याचबरोबर चार ते पाच वृत्तपत्रे, अशा सुविधा देणे अपेक्षित आहे; परंतु शहरातील आदिवासी वसतिगृहात यापैकी कोणत्याच सुविधा नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

यासंदर्भात अनेक वेळा विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन व आंदोलन करून सुविधा देण्याची मागणी केली; परंतु तरीही कार्यालयाकडून सपशेल दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ४० ते ५० विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विकास परिषदेच्या नेतृत्वात शहरातील दस्तूरनगरातील मुख्य कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन केले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

आमचे प्रश्न सोडवू शकत नसाल, तर कार्यालय सोडा

दस्तूरनगर येथील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या मुख्य कार्यालयात संतप्त विद्यार्थी पोहोचल्यानंतर येथील कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक वादही झाला, तसेच एका कर्मचाऱ्याला विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची घटनाही याठिकाणी घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी संबंधित कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांना जर तुम्ही प्रश्न सोडवू शकत नाही, तर तुम्हाला कार्यालयात राहण्याचाही अधिकार नाही, असे म्हणत कर्मचाऱ्यांना बाहेर हाकलूनही लावले.

शहरातील वसतिगृहे ही भाड्याच्या जागेत सुरू आहेत, त्यामुळे काही प्रमाणात अडचणी असतील. मी दीड महिन्यापूर्वीच जबाबदारी स्वीकारली असून, विद्यार्थ्यांचे हे पहिलेच निवेदन मला मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल.

- प्रताप वाडजे, गृहप्रमुख आदिवासी वसतिगृह

टॅग्स :Studentविद्यार्थीAmravatiअमरावती