शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल; तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:09 IST

Amravati : वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना होणार ऑनलाईन दंड, दरमहा ११ लाख वाहने धावतात

अमरावती : राज्याच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या समृद्धी महामार्गावर दरमहा ११ लाख लहान-मोठी वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. मात्र, या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता नागपूर ते मुंबई या दरम्यान ७०१ किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढलेली असून, कार किमान १२० तर ट्रकसाठी ८० च्या वेगाने धावण्याची मुभा दिली आहे. तथापि, या महामार्गावर वाहनांचे अपघात वाढल्याने ‘समृद्धी’वर बोट ठेवले असले, तरी आता नागपूर ते मुंबईपर्यंत ७०१ किमीचा प्रवास अवघ्या ८ तासांत पूर्ण होत आहे. त्यामुळे या महामार्गावर कर्नाटक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील वाहने मोठ्या प्रमाणात धावताना दिसत आहेत. कुठेही गतिरोधक आणि वळण नसलेल्या समृद्धी महामार्गावर हळूहळू सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, यवतमाळ, अकोला, संभाजीनगर, अहिल्यानगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. या महामार्गावर वाहनांची गर्दीदेखील वाढल्याचे वास्तव आहे.

तिसरा डोळा ठेवणार नजरसमृद्धी महामार्गावर लहान-मोठ्या वाहनांची वेगमर्यादा किती? यावर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. प्रत्येक किमी अंतरावर एक कॅमेरा बसवला जाणार आहे. किमान एक हजार कॅमेरे या महामार्गावर लागणार असून, त्याकरिता एमएसआरडीसीने दोन नामांकित कंपनीसोबत करार केला आहे. अत्यंत अत्याधुनिक असे हे कॅमेरे असतील.

तर होणार ऑनलाईन दंडनागपूर ते मुंबई दरम्यान महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बारीकसारीक लक्ष ठेवणार आहेत. एक कॅमेरा ५०० मीटर परिघातील सर्व काही बघणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रूम तयार करून बघितली जाणार आहे. ‘समृद्धी’वर याठिकाणी वाहने थांबवू नयेत, असा आदेश झुगारणारे चालक, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याचा ‘वॉच’ असणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास अशा चालकांना ऑनलाईन दंड निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे यापुढे आता वाहनचालकांना मनमर्जी करता येणार नाही. तसेच अपघात झाल्यास त्वरेने मदत मिळणे शक्य होणार आहे.

दरमहा ११ लाख वाहने धावतातसमृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथून नागपूरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने धावत आहेत. कमी काळात या महामार्गावरून वाहनांची वर्दळ वाढली असून, लहान-मोठी अशी दरमहा ११ लाख वाहने धावत असल्याचा अंदाज आहे. इतर महामार्गांच्या तुलनेत अवजड वाहनांसाठी जादा टोल असताना सुद्धा कमी वेळेत गंतव्य ठिकाणी पोहोचता येत असल्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याची माहिती नागपूर येथील एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता गजानन पळसकर यांनी दिली.

टॅग्स :AmravatiअमरावतीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग