शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल; तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:09 IST

Amravati : वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना होणार ऑनलाईन दंड, दरमहा ११ लाख वाहने धावतात

अमरावती : राज्याच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या समृद्धी महामार्गावर दरमहा ११ लाख लहान-मोठी वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. मात्र, या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता नागपूर ते मुंबई या दरम्यान ७०१ किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढलेली असून, कार किमान १२० तर ट्रकसाठी ८० च्या वेगाने धावण्याची मुभा दिली आहे. तथापि, या महामार्गावर वाहनांचे अपघात वाढल्याने ‘समृद्धी’वर बोट ठेवले असले, तरी आता नागपूर ते मुंबईपर्यंत ७०१ किमीचा प्रवास अवघ्या ८ तासांत पूर्ण होत आहे. त्यामुळे या महामार्गावर कर्नाटक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील वाहने मोठ्या प्रमाणात धावताना दिसत आहेत. कुठेही गतिरोधक आणि वळण नसलेल्या समृद्धी महामार्गावर हळूहळू सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, यवतमाळ, अकोला, संभाजीनगर, अहिल्यानगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. या महामार्गावर वाहनांची गर्दीदेखील वाढल्याचे वास्तव आहे.

तिसरा डोळा ठेवणार नजरसमृद्धी महामार्गावर लहान-मोठ्या वाहनांची वेगमर्यादा किती? यावर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. प्रत्येक किमी अंतरावर एक कॅमेरा बसवला जाणार आहे. किमान एक हजार कॅमेरे या महामार्गावर लागणार असून, त्याकरिता एमएसआरडीसीने दोन नामांकित कंपनीसोबत करार केला आहे. अत्यंत अत्याधुनिक असे हे कॅमेरे असतील.

तर होणार ऑनलाईन दंडनागपूर ते मुंबई दरम्यान महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बारीकसारीक लक्ष ठेवणार आहेत. एक कॅमेरा ५०० मीटर परिघातील सर्व काही बघणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रूम तयार करून बघितली जाणार आहे. ‘समृद्धी’वर याठिकाणी वाहने थांबवू नयेत, असा आदेश झुगारणारे चालक, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याचा ‘वॉच’ असणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास अशा चालकांना ऑनलाईन दंड निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे यापुढे आता वाहनचालकांना मनमर्जी करता येणार नाही. तसेच अपघात झाल्यास त्वरेने मदत मिळणे शक्य होणार आहे.

दरमहा ११ लाख वाहने धावतातसमृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथून नागपूरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने धावत आहेत. कमी काळात या महामार्गावरून वाहनांची वर्दळ वाढली असून, लहान-मोठी अशी दरमहा ११ लाख वाहने धावत असल्याचा अंदाज आहे. इतर महामार्गांच्या तुलनेत अवजड वाहनांसाठी जादा टोल असताना सुद्धा कमी वेळेत गंतव्य ठिकाणी पोहोचता येत असल्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याची माहिती नागपूर येथील एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता गजानन पळसकर यांनी दिली.

टॅग्स :AmravatiअमरावतीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग