शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल; तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:09 IST

Amravati : वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना होणार ऑनलाईन दंड, दरमहा ११ लाख वाहने धावतात

अमरावती : राज्याच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या समृद्धी महामार्गावर दरमहा ११ लाख लहान-मोठी वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. मात्र, या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता नागपूर ते मुंबई या दरम्यान ७०१ किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढलेली असून, कार किमान १२० तर ट्रकसाठी ८० च्या वेगाने धावण्याची मुभा दिली आहे. तथापि, या महामार्गावर वाहनांचे अपघात वाढल्याने ‘समृद्धी’वर बोट ठेवले असले, तरी आता नागपूर ते मुंबईपर्यंत ७०१ किमीचा प्रवास अवघ्या ८ तासांत पूर्ण होत आहे. त्यामुळे या महामार्गावर कर्नाटक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील वाहने मोठ्या प्रमाणात धावताना दिसत आहेत. कुठेही गतिरोधक आणि वळण नसलेल्या समृद्धी महामार्गावर हळूहळू सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, यवतमाळ, अकोला, संभाजीनगर, अहिल्यानगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. या महामार्गावर वाहनांची गर्दीदेखील वाढल्याचे वास्तव आहे.

तिसरा डोळा ठेवणार नजरसमृद्धी महामार्गावर लहान-मोठ्या वाहनांची वेगमर्यादा किती? यावर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. प्रत्येक किमी अंतरावर एक कॅमेरा बसवला जाणार आहे. किमान एक हजार कॅमेरे या महामार्गावर लागणार असून, त्याकरिता एमएसआरडीसीने दोन नामांकित कंपनीसोबत करार केला आहे. अत्यंत अत्याधुनिक असे हे कॅमेरे असतील.

तर होणार ऑनलाईन दंडनागपूर ते मुंबई दरम्यान महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बारीकसारीक लक्ष ठेवणार आहेत. एक कॅमेरा ५०० मीटर परिघातील सर्व काही बघणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रूम तयार करून बघितली जाणार आहे. ‘समृद्धी’वर याठिकाणी वाहने थांबवू नयेत, असा आदेश झुगारणारे चालक, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याचा ‘वॉच’ असणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास अशा चालकांना ऑनलाईन दंड निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे यापुढे आता वाहनचालकांना मनमर्जी करता येणार नाही. तसेच अपघात झाल्यास त्वरेने मदत मिळणे शक्य होणार आहे.

दरमहा ११ लाख वाहने धावतातसमृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथून नागपूरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने धावत आहेत. कमी काळात या महामार्गावरून वाहनांची वर्दळ वाढली असून, लहान-मोठी अशी दरमहा ११ लाख वाहने धावत असल्याचा अंदाज आहे. इतर महामार्गांच्या तुलनेत अवजड वाहनांसाठी जादा टोल असताना सुद्धा कमी वेळेत गंतव्य ठिकाणी पोहोचता येत असल्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याची माहिती नागपूर येथील एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता गजानन पळसकर यांनी दिली.

टॅग्स :AmravatiअमरावतीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग