शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पीक विम्यासाठी जादा पैसे घ्याल, तर परवाना कायमस्वरूपी गमवाल

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 9, 2023 21:19 IST

महसूल, कृषी विभागाचे निर्देश : क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे नियमित तपासणीची जबाबदारी

अमरावती : पीक विमा योजनेत शेतकरी नोंदणीसाठी एक रुपयापेक्षा जास्त रकमेची आकारणी होत असल्याने, आता महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रिय यंत्रणेद्वारा नियमित तपासणी होणार आहे. तसे आदेश महसूल व कृषी विभागाने अधिनस्त यंत्रणेला दिले आहेत. केंद्र चालकांकडून जादा रकमेची मागणी झाल्यास त्या केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेत केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना सहभागी होता येते. राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे. शेतकरी हिस्सा आता राज्य शासन भरणा करणार आहे. शेतकऱ्यांना यासाठी सामूहिक सेवा केंद्रात जावे लागते. मात्र, यासाठी काही केंद्र चालकांकडून एक रुपयाऐवजी १०० ते २०० रुपयांची आकारणी होत आहे. प्रत्यक्षात प्रत्येक शेतकरी अर्जासाठी सीएससी सेंटरला कंपनीद्वारे ४० रुपये मिळणार आहे. तरीही शेतकऱ्यांची लूट होत असल्याने ‘लोकमत’द्वारा शासनादेशाची प्रत्यक्षात काही केंद्राला भेटी देऊन खातरजमा करण्यात आली व याबाबतचे वृत्त जनदरबारात मांडण्यात आले.

याची गंभीर दखल जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी घेतली. याविषयी दोन्ही विभागांच्या क्षेत्रिय यंत्रणेला निर्देशित करण्यात आलेले आहे. यानुसार या अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारा सीएससी केंद्राला भेटी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून जादा शुल्काची आकारणी होत असल्याचे निदर्शनात आल्यास संबंधित केंद्रांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे.केंद्राच्या दर्शनी भागात ‘ते’ पत्रक लावापंतप्रधान पीक विमा योजनेत एक रुपयात शेतकऱ्यांची नोंदणी करून सहभाग घेता येणार असल्याबाबत राज्याच्या कृषी आयुक्तांचे पत्र प्रत्येक सीएससी केंद्रांच्या दर्शनी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व कृषी विभागाने दिले आहेत. या अनुषंगाने आता दोन्ही विभागांचे अधिकारी आता सीएससी केंद्रांची नियमित तपासणी करणार आहेत.क्षेत्रिय कर्मचारी सीएससी केंद्रांची नियमित तपासणी करतील. यामध्ये एक रुपयापेक्षा जास्त शुल्काची मागणी केल्याचे निदर्शनास आल्यास त्या केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा असा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल.राहुल सातपुते,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Farmerशेतकरी