शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

परीक्षेत दहा कॉपीबहाद्दर पकडल्यास ‘ते’ केंद्र रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 11:20 IST

दहावी- बारावीच्या परीक्षेत वाढते गैरप्रकार रोखण्यासाठी एका पेपरला दहा कॉपीबहाद्दर पकडले गेल्यास ते परीक्षा कें द्र रद्द केले जाईल. सदर परीक्षा केंद्राची अनुदान कपात आणि मान्यतादेखील काढून घेतली जाणार आहे, असा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देशासनाचा निर्णयअनुदान कपात अन् मान्यताही काढणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दहावी- बारावीच्या परीक्षेत वाढते गैरप्रकार रोखण्यासाठी एका पेपरला दहा कॉपीबहाद्दर पकडले गेल्यास ते परीक्षा कें द्र रद्द केले जाईल. सदर परीक्षा केंद्राची अनुदान कपात आणि मान्यतादेखील काढून घेतली जाणार आहे, असा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालये आणि शाळा संचालकांची भंबेरी उडाली आहे.२१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कॉपी करण्याचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारीहून दिसून येते. शुक्रवार, १ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहे. एकाचवेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाल्यामुळे परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकाचीदेखील परीक्षा ठरणार आहे. पेपरफुटीचे प्रकार घडल्यास कनिष्ठ महाविद्यालय, शाळांने अनुदान, मान्यतेवर परिणाम होणार आहे. कोणत्याही केंद्रावर पेपरफुटीचे आणि कॉपी करण्याचे प्रकार आढळल्यास त्याच केंद्राला दोषी ठरवावे, असा निर्णय समितीच्या शिफारशीनुसार घेण्यात आला आहे.अशी होणार कारवाईदहावी, बारावीच्या पेपरमध्ये कॉपी अथवा पेपरफुटीचे प्रकार निदर्शनास आल्यास केंद्र प्रमुख, केंद्र चालक जबाबदार राहतील. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. खासगी शाळा सेवाशर्ती अधिनियम १९९७ अंतर्गत वेतनवाढ रोखण्यात येईल. खालच्या पदावर आणण्याची कारवाई दोषी आढळल्यास करण्याची तरतूद आहे.एकाच पेपरला किमान १० कॉपी बहाद्दर पकडण्यात आले तर त्या शाळेच्या केंद्र रद्द केले जाईल. पुढच्या टप्प्यात अनुदान कपात आणि शाळेची मान्यता काढली जाईल. कॉपीमुक्त अभियानासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल.- शरद गोसावी,अध्यक्ष, शिक्षण मंडळ, अमरावती.

टॅग्स :examपरीक्षा